शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

राणेंवरची टीका नडली, शिवसेना तोंडावर आपटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:36 IST

Nilesh Rane Sindhudurgnews- नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याएवढे मतदार दूधखुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची तत्त्वे धुळीस मिळविल्याने त्याचा जनता मतदानातून राग काढत आहे.

ठळक मुद्देराणेंवरची टीका नडली, शिवसेना तोंडावर आपटलीभाजपला भविष्यातही यश :निलेश राणे

मालवण : नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याएवढे मतदार दूधखुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची तत्त्वे धुळीस मिळविल्याने त्याचा जनता मतदानातून राग काढत आहे.

पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर यांची विकास करण्याची कुवत नसल्यानेच त्यांना नाकारत कोकणातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तोंडावर आपटले, अशी टीका भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी केली.मालवण येथील निलरत्न निवासस्थानी राणे यांची पत्रकार परिषद झाली. गयावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दीपक पाटकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, नगरसेवक गणेश कुशे, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर आदी उपस्थित होते.राणे यांनी निवडणुकीतील विजयाचे श्रेय मालवणच्या पदाधिकाऱ्यांना दिले. जनतेने पुन्हा एकदा राणे व भाजपवर विश्वास ठेवला. रत्नागिरीतही ३०१ सदस्य भाजपचे निवडून आले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपलाच यश मिळेल, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.राणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकणचा विकास करण्यास अपयशी ठरले. आमदार नाईकला आमदारकी समजत नाही. त्यामुळे उदय सामंत आणि विनायक राऊत यांनी त्यांचा पद्धतशीर गेम केला आहे. आम्हांला कोरोना दिसला. मात्र, दीपक केसरकर कुठे दिसलेच नाहीत. वैभव नाईकची २०२४ ची निवडणूक शेवटची असेल.

खासदाराची अंगणवाडी सुरू करण्याची कुवत नाही. त्याला केवळ राणेंवर भुंकण्याचे काम मातोश्रीने दिले आहे. चिपी विमानतळाच्या परवानग्या तसेच कराराच्या प्रक्रिया पूर्ण व्हायच्या असून विमानतळ आम्हीच सुरू करू, सत्ताधारी केवळ तारखा जाहीर करत आहेत, असेही ते म्हणाले.उदय सामंत हे पोर्तुगीजांप्रमाणे बोलबच्चनउदय सामंत पोर्तुगीजांप्रमाणे बोलबच्चन आहेत. रत्नागिरीतील दरोडेखोरीची संस्कृती त्यांनी सिंधुदुर्गात आणली आहे.जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे ठेके त्यांच्या भावाने घेतले असून डांबरचोर जनतेच्या पैशांवर दरोडा टाकत आहेत. यात विनायक राऊत व त्याच्या मुलाचा वेगळा मीटर सुरू केला आहे. त्यामुळे या डांबरचोरांकडून जनतेने कोणत्या अपेक्षा ठेवायच्या? असा सवाल करत राणेंनी कोकणचा विकास आम्हीच करू, असे सांगितले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग