शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राणेंवरची टीका नडली, शिवसेना तोंडावर आपटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:36 IST

Nilesh Rane Sindhudurgnews- नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याएवढे मतदार दूधखुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची तत्त्वे धुळीस मिळविल्याने त्याचा जनता मतदानातून राग काढत आहे.

ठळक मुद्देराणेंवरची टीका नडली, शिवसेना तोंडावर आपटलीभाजपला भविष्यातही यश :निलेश राणे

मालवण : नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याएवढे मतदार दूधखुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची तत्त्वे धुळीस मिळविल्याने त्याचा जनता मतदानातून राग काढत आहे.

पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर यांची विकास करण्याची कुवत नसल्यानेच त्यांना नाकारत कोकणातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तोंडावर आपटले, अशी टीका भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी केली.मालवण येथील निलरत्न निवासस्थानी राणे यांची पत्रकार परिषद झाली. गयावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दीपक पाटकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, नगरसेवक गणेश कुशे, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर आदी उपस्थित होते.राणे यांनी निवडणुकीतील विजयाचे श्रेय मालवणच्या पदाधिकाऱ्यांना दिले. जनतेने पुन्हा एकदा राणे व भाजपवर विश्वास ठेवला. रत्नागिरीतही ३०१ सदस्य भाजपचे निवडून आले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपलाच यश मिळेल, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.राणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकणचा विकास करण्यास अपयशी ठरले. आमदार नाईकला आमदारकी समजत नाही. त्यामुळे उदय सामंत आणि विनायक राऊत यांनी त्यांचा पद्धतशीर गेम केला आहे. आम्हांला कोरोना दिसला. मात्र, दीपक केसरकर कुठे दिसलेच नाहीत. वैभव नाईकची २०२४ ची निवडणूक शेवटची असेल.

खासदाराची अंगणवाडी सुरू करण्याची कुवत नाही. त्याला केवळ राणेंवर भुंकण्याचे काम मातोश्रीने दिले आहे. चिपी विमानतळाच्या परवानग्या तसेच कराराच्या प्रक्रिया पूर्ण व्हायच्या असून विमानतळ आम्हीच सुरू करू, सत्ताधारी केवळ तारखा जाहीर करत आहेत, असेही ते म्हणाले.उदय सामंत हे पोर्तुगीजांप्रमाणे बोलबच्चनउदय सामंत पोर्तुगीजांप्रमाणे बोलबच्चन आहेत. रत्नागिरीतील दरोडेखोरीची संस्कृती त्यांनी सिंधुदुर्गात आणली आहे.जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे ठेके त्यांच्या भावाने घेतले असून डांबरचोर जनतेच्या पैशांवर दरोडा टाकत आहेत. यात विनायक राऊत व त्याच्या मुलाचा वेगळा मीटर सुरू केला आहे. त्यामुळे या डांबरचोरांकडून जनतेने कोणत्या अपेक्षा ठेवायच्या? असा सवाल करत राणेंनी कोकणचा विकास आम्हीच करू, असे सांगितले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग