शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राणेंवरची टीका नडली, शिवसेना तोंडावर आपटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:36 IST

Nilesh Rane Sindhudurgnews- नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याएवढे मतदार दूधखुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची तत्त्वे धुळीस मिळविल्याने त्याचा जनता मतदानातून राग काढत आहे.

ठळक मुद्देराणेंवरची टीका नडली, शिवसेना तोंडावर आपटलीभाजपला भविष्यातही यश :निलेश राणे

मालवण : नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याएवढे मतदार दूधखुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची तत्त्वे धुळीस मिळविल्याने त्याचा जनता मतदानातून राग काढत आहे.

पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर यांची विकास करण्याची कुवत नसल्यानेच त्यांना नाकारत कोकणातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तोंडावर आपटले, अशी टीका भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी केली.मालवण येथील निलरत्न निवासस्थानी राणे यांची पत्रकार परिषद झाली. गयावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दीपक पाटकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, नगरसेवक गणेश कुशे, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर आदी उपस्थित होते.राणे यांनी निवडणुकीतील विजयाचे श्रेय मालवणच्या पदाधिकाऱ्यांना दिले. जनतेने पुन्हा एकदा राणे व भाजपवर विश्वास ठेवला. रत्नागिरीतही ३०१ सदस्य भाजपचे निवडून आले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपलाच यश मिळेल, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.राणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकणचा विकास करण्यास अपयशी ठरले. आमदार नाईकला आमदारकी समजत नाही. त्यामुळे उदय सामंत आणि विनायक राऊत यांनी त्यांचा पद्धतशीर गेम केला आहे. आम्हांला कोरोना दिसला. मात्र, दीपक केसरकर कुठे दिसलेच नाहीत. वैभव नाईकची २०२४ ची निवडणूक शेवटची असेल.

खासदाराची अंगणवाडी सुरू करण्याची कुवत नाही. त्याला केवळ राणेंवर भुंकण्याचे काम मातोश्रीने दिले आहे. चिपी विमानतळाच्या परवानग्या तसेच कराराच्या प्रक्रिया पूर्ण व्हायच्या असून विमानतळ आम्हीच सुरू करू, सत्ताधारी केवळ तारखा जाहीर करत आहेत, असेही ते म्हणाले.उदय सामंत हे पोर्तुगीजांप्रमाणे बोलबच्चनउदय सामंत पोर्तुगीजांप्रमाणे बोलबच्चन आहेत. रत्नागिरीतील दरोडेखोरीची संस्कृती त्यांनी सिंधुदुर्गात आणली आहे.जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे ठेके त्यांच्या भावाने घेतले असून डांबरचोर जनतेच्या पैशांवर दरोडा टाकत आहेत. यात विनायक राऊत व त्याच्या मुलाचा वेगळा मीटर सुरू केला आहे. त्यामुळे या डांबरचोरांकडून जनतेने कोणत्या अपेक्षा ठेवायच्या? असा सवाल करत राणेंनी कोकणचा विकास आम्हीच करू, असे सांगितले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग