शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

...तर राज ठाकरे पुन्हा करणार नाणार परिसराचा दौरा - नितीन सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 17:57 IST

नाणार प्रकल्पाला विरोध असला तर तो प्रकल्प गुजरात जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे म्हणजे दुर्दैव आहे. देशात एवढी राज्ये असताना मुख्यमंत्र्यांना गुजरातच का दिसते, असा सवाल मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केला. राज ठाकरे यांनी एकदा नाणारला भेट दिलीच आहे. पण गरज पडल्यास आणखी एकदा भेट देतील, असेही यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

- अनंत जाधवसावंतवाडी - नाणार प्रकल्पाला विरोध असला तर तो प्रकल्प गुजरात जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे म्हणजे दुर्दैव आहे. देशात एवढी राज्ये असताना मुख्यमंत्र्यांना गुजरातच का दिसते, असा सवाल मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केला. राज ठाकरे यांनी एकदा नाणारला भेट दिलीच आहे. पण गरज पडल्यास आणखी एकदा भेट देतील, असेही यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले.मनसे नेते नितीन सरदेसाई हे शुक्रवारी पदाधिकाºयांच्या बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. यावेळी कामगार नेते मनोज चव्हाण, कोकणचे संपर्क नेते शिरिष सावंत, माजी नगरसेविका स्रेहल जाधव, जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, तालुकाप्रमुख गुरू गवडे, चैताली भेंडे आदी उपस्थित होते.मनसेचे नेते सरदेसाई म्हणाले, आम्ही सर्वजण सध्या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत आहोत. मी स्वत: पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक तालुक्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या संपूर्ण दौ-याचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपूर्द करणार असून, पक्ष संघटनेत फेरबदल करायचे का? याचा सर्वस्वी निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. या बैठकीत आम्ही फक्त पदाधिका-यांचे म्हणणे ऐकून घेतले. कोणतीही भाषणबाजी केली नाही, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चार वर्षापूर्वी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गायले होते. मग आता काय झाले, यावर सरदेसाई म्हणाले, गुजरातमधील विकास आम्ही बघितला होता. तो बरा वाटला. मोदी देशात काही तरी चांगले करतील, असे वाटत होते. पण मागील चार वर्षात आमचाच नव्हे, तर देशाचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. सर्व उद्योग गुजरातमध्ये नेण्याचे काम सुरू आहे. त्याला आमचा विरोध आहे. मोदी गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. तसे त्यांनी काम करणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी सरदेसाई यांनी व्यक्त केले.नाणार प्रकल्पाला विरोध आहे. तो यापूर्वीच पक्षाध्यक्षांनी जाहीर केला आहे. त्यानंतर मुंबईत त्याची प्रतिकियाही उमटली. त्यामुळे नाणार होणार नाही. पण मुख्यमंत्री नाणारला विरोध असल्यास प्रकल्प गुजरातला जाईल, असे सांगत आहेत. त्यांना देशातील इतर राज्ये का दिसत नाहीत? गुजरातच का दिसते? असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी गुजरातवरच प्रेम करू नये, असा सल्लाही यावेळी सरदेसाई यांनी दिला. तसेच यापूर्वी नाणारला राज ठाकरे येऊन गेले आहेत. मुंबईतही प्रकल्पग्रस्त भेटले. पण गरज पडल्यास पुन्हा एकदा राज ठाकरे नाणारमध्ये येतील, असेही यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र स्वाभिमानशी युतीचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतीलस्थानिक निवडणुकीत कोणाशी युती करायची याचा अधिकार हा स्थानिक पातळीवर घेतला जातो. तसा निर्णय पिंगुळीतील निवडणुकीबाबत घेण्यात आला. याचा अर्थ सर्वच निवडणुकीत मनसे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी युती करेल असे नाही. मात्र याचे सर्व निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे घेत असतात. मोठ्या निवडणुकीत काय करायचे ते पक्षप्रमुखच ठरवतील, असे यावेळी मनसे नेते सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेNitin Sardesaiनितीन सरदेसाईMaharashtraमहाराष्ट्र