शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

...तर राज ठाकरे पुन्हा करणार नाणार परिसराचा दौरा - नितीन सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 17:57 IST

नाणार प्रकल्पाला विरोध असला तर तो प्रकल्प गुजरात जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे म्हणजे दुर्दैव आहे. देशात एवढी राज्ये असताना मुख्यमंत्र्यांना गुजरातच का दिसते, असा सवाल मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केला. राज ठाकरे यांनी एकदा नाणारला भेट दिलीच आहे. पण गरज पडल्यास आणखी एकदा भेट देतील, असेही यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

- अनंत जाधवसावंतवाडी - नाणार प्रकल्पाला विरोध असला तर तो प्रकल्प गुजरात जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे म्हणजे दुर्दैव आहे. देशात एवढी राज्ये असताना मुख्यमंत्र्यांना गुजरातच का दिसते, असा सवाल मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केला. राज ठाकरे यांनी एकदा नाणारला भेट दिलीच आहे. पण गरज पडल्यास आणखी एकदा भेट देतील, असेही यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले.मनसे नेते नितीन सरदेसाई हे शुक्रवारी पदाधिकाºयांच्या बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. यावेळी कामगार नेते मनोज चव्हाण, कोकणचे संपर्क नेते शिरिष सावंत, माजी नगरसेविका स्रेहल जाधव, जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, तालुकाप्रमुख गुरू गवडे, चैताली भेंडे आदी उपस्थित होते.मनसेचे नेते सरदेसाई म्हणाले, आम्ही सर्वजण सध्या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत आहोत. मी स्वत: पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक तालुक्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या संपूर्ण दौ-याचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपूर्द करणार असून, पक्ष संघटनेत फेरबदल करायचे का? याचा सर्वस्वी निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. या बैठकीत आम्ही फक्त पदाधिका-यांचे म्हणणे ऐकून घेतले. कोणतीही भाषणबाजी केली नाही, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चार वर्षापूर्वी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गायले होते. मग आता काय झाले, यावर सरदेसाई म्हणाले, गुजरातमधील विकास आम्ही बघितला होता. तो बरा वाटला. मोदी देशात काही तरी चांगले करतील, असे वाटत होते. पण मागील चार वर्षात आमचाच नव्हे, तर देशाचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. सर्व उद्योग गुजरातमध्ये नेण्याचे काम सुरू आहे. त्याला आमचा विरोध आहे. मोदी गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. तसे त्यांनी काम करणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी सरदेसाई यांनी व्यक्त केले.नाणार प्रकल्पाला विरोध आहे. तो यापूर्वीच पक्षाध्यक्षांनी जाहीर केला आहे. त्यानंतर मुंबईत त्याची प्रतिकियाही उमटली. त्यामुळे नाणार होणार नाही. पण मुख्यमंत्री नाणारला विरोध असल्यास प्रकल्प गुजरातला जाईल, असे सांगत आहेत. त्यांना देशातील इतर राज्ये का दिसत नाहीत? गुजरातच का दिसते? असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी गुजरातवरच प्रेम करू नये, असा सल्लाही यावेळी सरदेसाई यांनी दिला. तसेच यापूर्वी नाणारला राज ठाकरे येऊन गेले आहेत. मुंबईतही प्रकल्पग्रस्त भेटले. पण गरज पडल्यास पुन्हा एकदा राज ठाकरे नाणारमध्ये येतील, असेही यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र स्वाभिमानशी युतीचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतीलस्थानिक निवडणुकीत कोणाशी युती करायची याचा अधिकार हा स्थानिक पातळीवर घेतला जातो. तसा निर्णय पिंगुळीतील निवडणुकीबाबत घेण्यात आला. याचा अर्थ सर्वच निवडणुकीत मनसे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी युती करेल असे नाही. मात्र याचे सर्व निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे घेत असतात. मोठ्या निवडणुकीत काय करायचे ते पक्षप्रमुखच ठरवतील, असे यावेळी मनसे नेते सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेNitin Sardesaiनितीन सरदेसाईMaharashtraमहाराष्ट्र