शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

‘जैतापूर’साठी जनजागृती

By admin | Updated: April 24, 2017 21:43 IST

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यांसाठी व्हॅन दाखल

नांदगाव : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होणार हे जवळपास निश्चित झाले असून फ्रान्सच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर डिसेंबर २०१८ पासून हा प्रकल्प सुरू होण्याचे संकेत आहेत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प व्हावा यासाठी अणुऊर्जाचे महत्त्व व याबाबतचे असलेले गैरसमज दूर करण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्गात अणुऊर्जा जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. याबाबत माहिती दर्शविणारी एलईडी व्हॅन सध्या जनजागृती करीत आहे. कासार्डे येथे याबाबत माहिती देण्यात आली. भारत सरकारच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे. जैतापूर प्रकल्पाला होत असलेला स्थानिकांचा विरोध तसेच याला असणारा राजकीय नेते व पक्षाचा पाठिंबा यामुळे गेली अनेक वर्षे हा प्रकल्प निर्माण होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. सध्या राज्यात व केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर जैतापूर प्रकल्पाचे काम वेग घेणार असल्याचे दिसत असून केंद्र सरकारच्यावतीने पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून फ्रान्सचे परराष्ट्र सचिव ख्रिश्चन मॅसे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा विभागाचे सचिव अरविंंद सिंह, फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झायग्लेट यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यावर या कामांना वेग मिळत आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत निर्माण होणाऱ्या शंका व अडचणी यावर मात करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने अणुऊर्जा जागरुकता अभियान हाती घेण्यात आले आहे. याबाबत माहिती दर्शविणारी एलईडी व्हॅन रत्नागिरी व सिंधुदुर्गात फिरत आहे. प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयामार्फत गावांची निवड केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावात जनजागृती करून ही व्हॅन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली आहे. वैभववाडी व कणकवली तालुक्यातील विविध गावात जाऊन जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जनजागृती केली जाणार आहे. जैतापूर प्रकल्पात दहा हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचमुळे या प्रकाल्पाच्या सुरक्षेसंदर्भातही जनजागृती करावी, राजकीय पक्षांच्या प्रचार व्हॅन तयार करण्यात येतात तशाप्रकारे जैतापूर प्रकल्पाची जागृती व्हावी यासाठी ही व्हॅन तयार करण्यात आली आहे. (वार्ताहर)अणुऊर्जा, सौरऊर्जा दोनच पर्याय : प्रज्वल नागपूरकरया जनजागृती व्हॅनचे प्रमोटर प्रज्वल नागपूरकर म्हणाले, आम्ही गावागावात जाऊन जैतापूर प्रकल्पाविषयी जनजागृती करीत आहोत. यामध्ये हा प्रकल्प कसा उपयोगी आहे याबाबत एलईडी चित्रफिती, नकाशे, घोषवाक्य यामार्फत माहिती देत आहोत. अणुऊर्जा प्रकल्प हा युरेनियमवर आधारित असून, देशाच्या विकासाचा वेग लक्षात घेता २०५० साली लागणारी वीज व त्याचा पुरवठा यात विजेची तूट राहणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी परंपरागत ऊर्जा प्रकल्पाद्वारेच वीजनिर्मिती करायची झाल्यास मोठ्या प्रमाणात कोळसा व तेल आयात करावे लागेल. १ कोटी ६० लाख टन कोळसा एकतर रोज उपलब्ध होऊ शकणार नाही. यामुळे कोळशावर व तेलावर चालणारी इतर कामे कोलमडून पडतील. यामुळे अणुऊर्जा व सौरऊर्जेचे हे दोनच पर्याय असून, सौरऊर्जेसाठी लागणारे महाकाय आरसे व बॅटरी बसविणे अव्यवहार्य आहे. अणुविद्युत केंद्रातून बाहेर पडणारे उत्सर्जन मेगावॅट उत्सर्जनाच्या तुलनेत नगण्य असते. विविध प्रकारचे नकाशे, कार्टून्स, फोटो व इतर माध्यमाच्या सहाय्याने या व्हॅनमधून अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जनजागृती केली जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.