शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

‘जैतापूर’साठी जनजागृती

By admin | Updated: April 24, 2017 21:43 IST

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यांसाठी व्हॅन दाखल

नांदगाव : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होणार हे जवळपास निश्चित झाले असून फ्रान्सच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर डिसेंबर २०१८ पासून हा प्रकल्प सुरू होण्याचे संकेत आहेत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प व्हावा यासाठी अणुऊर्जाचे महत्त्व व याबाबतचे असलेले गैरसमज दूर करण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्गात अणुऊर्जा जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. याबाबत माहिती दर्शविणारी एलईडी व्हॅन सध्या जनजागृती करीत आहे. कासार्डे येथे याबाबत माहिती देण्यात आली. भारत सरकारच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे. जैतापूर प्रकल्पाला होत असलेला स्थानिकांचा विरोध तसेच याला असणारा राजकीय नेते व पक्षाचा पाठिंबा यामुळे गेली अनेक वर्षे हा प्रकल्प निर्माण होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. सध्या राज्यात व केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर जैतापूर प्रकल्पाचे काम वेग घेणार असल्याचे दिसत असून केंद्र सरकारच्यावतीने पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून फ्रान्सचे परराष्ट्र सचिव ख्रिश्चन मॅसे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा विभागाचे सचिव अरविंंद सिंह, फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झायग्लेट यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यावर या कामांना वेग मिळत आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत निर्माण होणाऱ्या शंका व अडचणी यावर मात करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने अणुऊर्जा जागरुकता अभियान हाती घेण्यात आले आहे. याबाबत माहिती दर्शविणारी एलईडी व्हॅन रत्नागिरी व सिंधुदुर्गात फिरत आहे. प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयामार्फत गावांची निवड केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावात जनजागृती करून ही व्हॅन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली आहे. वैभववाडी व कणकवली तालुक्यातील विविध गावात जाऊन जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जनजागृती केली जाणार आहे. जैतापूर प्रकल्पात दहा हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचमुळे या प्रकाल्पाच्या सुरक्षेसंदर्भातही जनजागृती करावी, राजकीय पक्षांच्या प्रचार व्हॅन तयार करण्यात येतात तशाप्रकारे जैतापूर प्रकल्पाची जागृती व्हावी यासाठी ही व्हॅन तयार करण्यात आली आहे. (वार्ताहर)अणुऊर्जा, सौरऊर्जा दोनच पर्याय : प्रज्वल नागपूरकरया जनजागृती व्हॅनचे प्रमोटर प्रज्वल नागपूरकर म्हणाले, आम्ही गावागावात जाऊन जैतापूर प्रकल्पाविषयी जनजागृती करीत आहोत. यामध्ये हा प्रकल्प कसा उपयोगी आहे याबाबत एलईडी चित्रफिती, नकाशे, घोषवाक्य यामार्फत माहिती देत आहोत. अणुऊर्जा प्रकल्प हा युरेनियमवर आधारित असून, देशाच्या विकासाचा वेग लक्षात घेता २०५० साली लागणारी वीज व त्याचा पुरवठा यात विजेची तूट राहणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी परंपरागत ऊर्जा प्रकल्पाद्वारेच वीजनिर्मिती करायची झाल्यास मोठ्या प्रमाणात कोळसा व तेल आयात करावे लागेल. १ कोटी ६० लाख टन कोळसा एकतर रोज उपलब्ध होऊ शकणार नाही. यामुळे कोळशावर व तेलावर चालणारी इतर कामे कोलमडून पडतील. यामुळे अणुऊर्जा व सौरऊर्जेचे हे दोनच पर्याय असून, सौरऊर्जेसाठी लागणारे महाकाय आरसे व बॅटरी बसविणे अव्यवहार्य आहे. अणुविद्युत केंद्रातून बाहेर पडणारे उत्सर्जन मेगावॅट उत्सर्जनाच्या तुलनेत नगण्य असते. विविध प्रकारचे नकाशे, कार्टून्स, फोटो व इतर माध्यमाच्या सहाय्याने या व्हॅनमधून अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जनजागृती केली जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.