शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पंतप्रधानांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी चांगली सुविधा द्या: नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:38 IST

Nitesh Rane Internet Sindhudurg- केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी भारत नेट हा महत्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला आहे. त्या प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे करा आणि जनतेला चांगली सुविधा उपलब्ध करून द्या. अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी भारत नेटचे लोकेश श्रीवास्तव व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना केली.

ठळक मुद्दे पंतप्रधानांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी चांगली सुविधा द्या: नितेश राणेभारत नेटचे लोकेश श्रीवास्तव व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सूचना

कणकवली : केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी भारत नेट हा महत्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला आहे. त्या प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे करा आणि जनतेला चांगली सुविधा उपलब्ध करून द्या. अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी भारत नेटचे लोकेश श्रीवास्तव व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना केली.कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारत नेट फायबर ऑप्टिकल केबलने जोडलेल्या कनेक्शनच्या समस्या तसेच बीएसएनएलच्या त्रूटी संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आमदार नितेश राणे यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला केंद्रिय अधिकारी लोकेश श्रीवास्तव,बीएसएनएलचे सुभाष कांबळे, भारत नेटचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत राणे, श्रीकृष्ण धुरी,चेतन गावकर,सम्राट गावडे,गुरुनाथ शिर्के आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांनी संबधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.यावेळी केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी भारत नेट या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) म्हणजे (आपले सरकार सेवा केंद्र) यांच्यामार्फत केली जात आहे. त्या अनुषंगाने बीएसएनएल व सीएससी यांचा संयुक्तिक करार झालेला असून त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही सीएससीकडे सोपविण्यात आलेली आहे. अशी माहिती देण्यात आली.बीएसएनएल व सीएससी यानी भारत नेट कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एकूण ३६१ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या आहेत. त्यापैकी २९७ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा बीबीएनएल व सिएससी मार्फत कार्यान्वित झालेली आहेत.

इंटरनेट सेवा ज्या ग्रामपंचायतींमध्ये सीएससी मार्फत कार्यान्वित आहे त्या ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा सुरू झालेल्या दिवसापासून पुढील एक वर्ष पुर्णपणे मोफत असणार आहे. उर्वरित ग्रामपंचायतींचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत क्षेत्रातिल इतर ५ सरकारी आस्थापनामध्येही इंटरनेटची जोडणी या प्रकल्पा अंतर्गत केली जात आहे,अशी माहिती लोकेश श्रीवास्तव यांनी दिली.यावेळी जिल्ह्यातील अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. गावागावात नेटवर्क मिळत नाही. इंटरनेटची सोया नाही , याची कारणे काय ?याबाबत डिजिटल इंडियाच्या समन्वयकांशी चर्चा करण्यात आली. अखेर ज्या समस्या आहेत त्या दिल्लीत मांडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारत नेट इंटरनेट सेवा चांगल्याप्रकारे देण्यासंदर्भात लागणारी यंत्रणा व व्यवस्थेची मागणी केंद्रीय मंत्री यांच्याकडे करणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.त्यानंतर दर महिन्याला डिजिटल इंडियाच्या बाबत अहवाल आमच्या कार्यालयाला द्या तसेच ज्या ठिकाणी आता फायबर केबल जोडली आहे पण इंटरनेट सुविधा बंद आहे त्या दुरुस्त करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक मदत लागेल त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.तसेच जिल्ह्यात बीएसएनएलचे नेटवर्क कुठे आहे? ग्रामपंचायतमध्ये फायबर केबलने भारत नेट जोडलात तर मग ते बंद का ? नरेंद्र मोदी यांचे स्वप्न केव्हा साकार होणार ? सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, नेटवर्क नसेल तर पर्यटक कसे येणार ? अशी विचारणा बीएसएनएलचे अधिकारी व डिजिटल इंडिया भारत नेटच्या स्थानिक अधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी केली.त्यावर श्रीवास्तव यांनी येत्या महिन्याभरात सेवा सुरळीत करून देण्यासंदर्भात आश्वासन दिले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे KankavliकणकवलीInternetइंटरनेटsindhudurgसिंधुदुर्ग