शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

कोकणात गणेशोत्सव परतीच्या प्रवासाची एसटीकडून सज्जता

By admin | Updated: August 29, 2014 23:10 IST

के.बी. देशमुख : ८१० गाड्यांचे आरक्षण$

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असल्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर गावाकडे परतली आहेत. मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी एस. टी.कडून सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत परतीच्या ८१० गाड्यांचे आरक्षण झाले असल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी यावेळी दिली. गणेशोत्सव म्हणजे सर्व सणांचा राजा. त्यामुळे गणेशभक्तांच्या प्रवासात कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी एस. टी. प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. यावर्षी कोकणात १९१३ जादा गाड्या आल्या असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी २१३ गाड्या अधिक आल्या आहेत. रत्नागिरी विभागामध्ये १४०० गाड्या आल्या आहेत. अवजड वाहनांसाठी मुंबई-गोवा महामार्ग बंद केल्याने त्यांचा मोर्चा स्वाभाविकच पुणे, सातारा, कोल्हापूर मार्गावर वळला असला तरी गणपतीसाठी कोकणात खासगी कार, गाड्याने येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने महामार्गावर गर्दी दिसूून येत आहे. एस. टी.ची वाहतूक मात्र नेहमीच्याच मार्गावरून सुरू आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी आणण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथून १९१३ जादा गाड्या प्रवाशांना घेऊन आल्या आहेत. गणेशोत्सवानंतर मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी ८१० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे.दररोजच्या १५० गाड्यावगळता दि. ४ ते १० सप्टेंबरअखेर ८१० गाड्यांचे एस. टी. प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. दि. ४ रोजी ८१, दि. ५ रोजी २००, दि. ६ रोजी २९०, दि. ७ रोजी १५०, दि. ८ रोजी ५०, दि. ९ रोजी ३०, दि.१० रोजी ९ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. दि. ६ रोजी सर्वाधिक गाड्या मुंबईकडे सोडण्यात येणार आहेत. प्रत्येकाला तिकीट मिळण्याची सुविधा राज्य परिवहन महामंडळाने केली आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त मुंबईहून तसेच बाहेरून येणार, हे गृहित धरून एस. टी. प्रशासनाने भक्तांसाठी येणाऱ्या व परतीच्या गाड्यांचे चोख नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)तारीखजादा गाड्या ४ सप्टेंबर८१५ सप्टेंबर२००६ सप्टेंबर२९०७ सप्टेंबर १५०८ सप्टेंबर५०९ सप्टेंबर३०१० सप्टेंबर९