शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा-बाळा नांदगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 8:40 PM

मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला आपण सर्वांनी बळ देणे गरजेचे आहे. शासन सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देवागदे येथे मनसेचा मेळावा

कणकवली: मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला आपण सर्वांनी बळ देणे गरजेचे आहे. शासन सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मनसैनिकानी जनतेच्या मनात शासन विरोधातील नाराजी पोहचवली पाहिजे. वेळप्रसंगी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी कार्यकर्त्यानी ठेवावी. असे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.वागदे येथील एन.के. मंगल कार्यालयात रविवारी मनसेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मनसे नेते शिरीष सावंत, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर , राज्य उपाध्यक्ष सत्यवान दळवी, महिला आघाडी उपाध्यक्षा स्नेहल जाधव, अनिषा माजगावकर , जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, धीरज परब, चैताली भेंडे आदी उपस्थित होते.बाळा नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे यांनी सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाची उभारणी केली .जनतेची कामे आताच्या शासनाकडून होत नसल्याने जनतेच्या मनात चीड आहे. अशावेळी मनसेकडे आशेने पाहिले जाते. याचा विचार करा आणि कामाला लागा.परशुराम उपरकर म्हणाले, राज्य व केंद्र शासनाने जनतेची घोर निराशा केली आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेले युती शासन आता पुन्हा युती करून जनतेसमोर निवडणुकीच्या माध्यमातून येणार आहेत. मात्र, जनता त्याना थारा देणार नाही. जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहेत. आतापर्यंत मनसेने त्यांच्यावर वचक ठेवला आहे. परंतु जनतेने मतदानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्याना त्यांचे अपयश दाखवून द्यावे.सत्यवान दळवी म्हणाले , महाराष्ट्रात रस्ते टोलमुक्त हवेत. अशी मागणी सर्वात प्रथम राज ठाकरे यांनी केली. मात्र, कोकणात होत असलेल्या महामार्गावर टोल नाके उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे मनसैनिकानी आम्ही टोल भरणार नाही.अशी भूमिका घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. आम्ही काम धंद्यानिमित्त मुंबईत असलो तरी कोकणवासीयांच्या प्रश्नासाठी कायमच तुमच्या सोबत आहोत.असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यानी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजन दाभोलकर यांनी केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBala Nandgaonkarबाळा नांदगावकर