शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

सिंधुदुर्गचा विकास करण्यात सत्ताधारी अपयशी : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 4:39 PM

सिंधुदुर्गचा विकास करण्यात हे सत्ताधारी अपयशी ठरले आहेत हे सिद्ध होत आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देसिंधुदुर्गचा विकास करण्यात सत्ताधारी अपयशी : परशुराम उपरकरआयुष रुग्णालयासाठी सिंधुदुर्गातून प्रस्तावच नाही

कणकवली : शिवसेना तसेच भाजप या सत्ताधारी पक्षातील आमदार व पदाधिकाऱ्यांनी जनतेला दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या घोषणांचा पाठपुरावा करण्यातही ते कमी पडले असून त्याचेच उदाहरण म्हणजे आयुष रुग्णालयासाठी सिंधुदुर्गातून प्रस्तावच पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्गचा विकास करण्यात हे सत्ताधारी अपयशी ठरले आहेत हे सिद्ध होत आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केली.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आडाळी येथील एमआयडीसी तसेच आयुष रुग्णालय याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली, अतुल काळसेकर यांनी अनेकवेळा घोषणा केल्या आहेत. त्याला अनुसरुन पाठपुरावा करणे आवश्यक होते. तो करण्यात आलेला नाही. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सिंधुदुर्गचा आयुष रुग्णालयाच्या बाबतीतील प्रकल्प केंद्र शासनाकडे गेलेलाच नाही, असे सांगितले आहे.दोडामार्ग येथे जनतेला आरोग्य सेवेसाठी आक्रोश आंदोलन करावे लागले. यावेळी गोवा येथील बांबुळीतील रुग्णालयाला सिंधुदुर्गातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अडीच कोटी रुपये देण्यात येतील अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. ती फसवीच ठरली आहे. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.आता पुन्हा एकदा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे जनतेला भुलविण्यासाठी या सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जातील. त्यापासून जनतेने सावध रहावे. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच केलेली ७५००० पदांच्या भरती बाबतची घोषणाही फसवीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोषणेला बळी पडून नोकरी स्वीकारणारे त्यांची नोकरी गेल्यावर अधांतरीच राहणार आहेत.

या सर्व घोळात नोकरीसाठी असलेली त्यांची वयोमर्यादा संपल्यावर ते बरबाद होणार आहेत. त्यामुळे मनसेच्यावतीने यापुढील काळात शासनाच्या फसव्या घोषणा जनतेसमोर आणण्यात येतील. तसेच कोणत्याही परिस्थितीत जनतेची फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही उपरकर यांनी यावेळी सांगितले.पालकमंत्री अपयशीजिल्ह्याचे पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. ते निष्क्रिय असून जिल्ह्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधणार असे त्यांनी घोषित केले होते. त्याचे काय झाले? जिल्ह्यातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे जनता त्रस्त आहे. त्यांना जिल्ह्यातील जनतेबद्दल काही देणे घेणे नाही. अशी स्थिती आहे. असे उपरकर म्हणाले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसे