शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : तहसीलच्या अभिलेख कक्षाला गळती, साडेचार लाख कागदपत्रांवर प्लास्टिकचे आच्छादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:17 IST

वैभववाडी तालुक्याचा महसुली दस्तऐवज ठेवलेल्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला गळती लागली आहे. त्यामुळेच सुमारे साडेचार लाख कागदपत्रे प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आली असून त्याच गळतीत कागदपत्राच्या संगणकीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या किंमती महसुली दस्तऐवजाच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ठळक मुद्देसाडेचार लाख कागदपत्रांवर प्लास्टिकचे आच्छादन तहसीलच्या अभिलेख कक्षाला गळती, तीन वर्षे पत्रव्यवहार

वैभववाडी : तालुक्याचा महसुली दस्तऐवज ठेवलेल्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला गळती लागली आहे. त्यामुळेच सुमारे साडेचार लाख कागदपत्रे प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आली असून त्याच गळतीत कागदपत्राच्या संगणकीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या किंमती महसुली दस्तऐवजाच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या इमारतीच्या गळतीबाबत तीन वर्षे पत्रव्यवहार करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष द्यायला तयार नसल्याची खंत तहसीलदार संतोष जाधव यांनी व्यक्त केली.जुने सातबारा, ८ अ, हक्क नोंदणी उतारा, इनामदार पत्रके, जन्म मृत्यू रजिस्टर, कुळ रजिस्टर, जमाबंदी पत्रक, अकृषक परवाने, वाटप पत्रक आदी १९५४-५५ पासूनचे २५ प्रकारचे दस्तऐवज अभिलेख कक्षात ठेवण्यात आले आहेत. या सर्व कागदपत्रांची संख्या ४ लाख ३८ हजार इतकी आहे. अभिलेख कक्षातील या किंमती दस्तऐवजांचे संगणकीकरणाद्वारे अद्ययावतीकरण अद्याप सुरु आहे.अभिलेख कक्षात छताला सर्वत्र गळती लागली आहे. त्यामुळे संपूर्ण दस्तऐवजावर प्लास्टिकचे आच्छादन करण्यात आले आहे. त्या प्लास्टिकवरुन पाणी साचले आहे. त्यामुळे अभिलेख कक्षात दलदल निर्माण झाली आहे.छताची गळती आणि फरशीवरच्या दलदलीत बसून दस्तऐवजाच्या संगणकीकरणाचे काम सुरु असल्याने संगणक परिचालकांना त्रास होत आहे. परंतु, संपूर्ण वैभववाडी तालुक्याचा महसुली दस्तऐवज पाण्यात असताना त्याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे या किंमती दस्तऐवजाचे भवितव्य धोक्यात आले आहे.सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष : तहसीलदारअभिलेख कक्षाच्या छतावर पत्र्याची शेड उभारण्याबाबत गेले तीन वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार सुरु आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे गळती सुरु होताच दस्तऐवजांचे पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर प्लास्टिक घातले आहे.

आता पुन्हा बांधकामला स्मरणपत्र काढून जागे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार संतोष जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRainपाऊसTahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग