शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

लेकींसाठीची योजना कागदावरच

By admin | Updated: May 15, 2015 23:34 IST

खेड तालुका : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील पहिल्या दोन मुलींना होणार लाभ

खेड : सध्या मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत झपाट्याने कमी होत आहे. मुलीपेक्षा मुलांकडेच जास्त लक्ष दिले जाते. मुलींची सातत्याने कमी होत असलेली संख्या वाढवण्यासाठी व आता लेकींना सर्वार्थाने संरक्षण देण्यासाठी राज्य सरकार आता दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील पालकांच्या पहिल्या दोन मुलींना त्या सज्ञान झाल्यानंतर १ लाख रूपये देणार आहे. याकरिता राज्य सरकारने ‘सुकन्या’ नावाने आता नवा जागर मांडला असून, लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील, अशी आशा महिलांमधून व्यक्त होऊ लागली आहे. मात्र, या योजनेची योग्य अंमलबजावणी न झाल्याने अपवाद वगळल्यास ही योजना केवळ कागदावर राहिली आहे.पालकांना विविध कारणांनी मुलीच्या भवितव्याची चिंता सतावत असते. अशातच पुरेशा आर्थिक स्थितीअभावी मुलींचे संगोपन करणे पालकांना जड जाते. याचा परिणाम मुलींच्या वैवाहीक जीवनात पदोपदी जाणवतो. सामाजिक परंपरा, रूढी, चालीरिती, गरिबी व अनिष्ठ प्रथा आदी कारणांमुळे बहुसंख्य पालकांना मुली नको असतात. यामुळे स्त्रीभ्रूण हत्या, जन्मानंतरची तिची हेळसांड, तिच्या संगोपनाकडे दुर्लक्ष, स्त्री शिक्षणाकडे कानाडोळा करणे आदी प्रकारांमुळे मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी आहे.याकरिता मुलींची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील पालकांसाठी १ जानेवारी २०१४पासून ‘सुकन्या योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत यातील पहिल्या दोन मुलींच्या नावे २१ हजार २०० रूपये रक्कम १८ वर्षाकरिता जीवन विमा गुंतवणार आहे. याच गुंतवणुकीतून प्रत्येक मुलीला वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर १ लाख रूपये मिळणार आहेत.दोन मुलींच्या नावे विमा योेजनेत स्वतंत्र गुंतवणूक करण्यात येणार आहे. मात्र, हा लाभ १८ वर्षांनंतर मुलीला मिळणार आहे.यामुळे पालकांची चिंता काहीशी कमी झाली आहे. सरकारच्या या बहुआयामी निर्णयामुळे दारिद्र्यरेषेखालील पालकांनी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ही योजना अधिक प्रभाविपणे राबविल्यास सावित्रीच्या लेकींना खराखुरा लाभ मिळण्यास मदतच होणार आहे. सध्यातरी या योजनेला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. राज्यात हे अभियान अधिक गतीने राबविण्यासाठी जागृती होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)लेकीच्या संरक्षणासाठी जागर...राज्य सरकारतर्फे सुकन्या नावाने योजना तयार करण्यात आली असून, सध्या मुलींची संख्या कमी होत असल्याने मुलींकडे जास्त लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. राज्य शासनातर्फे हे अभियान राबविले जात असून, ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला साथ मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.