शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोकणातून उध्दवसेनेला जनतेने हद्दपार केले, नितेश राणे यांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: June 5, 2024 16:14 IST

काहीजणांचा हिशोब व्याजासहित चुकता करणार

कणकवली : गेल्या १० वर्षात विकास कामे न केल्याने विनायक राऊत यांना लोकांनी ठरवून घरी बसवले आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी गेली ४० वर्षे आपले सर्वस्व पणाला लावत सिंधुदुर्गवासियांची सेवा केली. त्यामुळे जनतेने मतदानाच्या रुपाने त्यांना आशिर्वाद दिले आहेत. तर येथील विकास करू शकणाऱ्या प्रकल्पांना कायम विरोध करणाऱ्या उध्दवसेनेला जनतेने कोकणातून हद्दपार केले आहे. असे सांगतानाच काहीजणांचे हिशोब चुकते करायचे असून आगामी काळात ते व्याजासहीत चुकते केले जातील असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे म्हणाले, आता रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेत आपल्या हक्काचा खासदार निवडून आला आहे. गेल्या वर्षभरात भाजपाचे नेते सातत्याने सांगत होते. ते म्हणजे यापुढचा खासदार हा कमळ या चिन्हाचा असेल. कारण येथील जनतेने ठरवेल होते. विनायक राऊत यांना घरी बसवायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले समर्थन देण्यासाठी जनतेने हा निकाल दिला आहे. त्यामुळे या मतदार संघातील लोकांचे आभार मानतो. दीपक केसरकर यांनी कृतीतून करुन दाखविले पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पालक कसा असावा? हे समजते. एक नेतृत्व काय करु शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भाजपा पक्ष आणि महायुती कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले. त्यामुळे यश प्राप्त झाले आहे. या निकालात मॅन ऑफ द मॅच देण्यासारखे काम शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कृतीतून करुन दाखविले आहे. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला. तसेच महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि त्यांचा पक्ष आमच्या पाठीशी राहिला आहे. उद्धवसेनेच्या अदृश्य हातांचे आभार परंतु या निवडणूकीत काही कटू अनुभव आले. त्याची चर्चा महायुतीच्या बैठकीत होईल. महायुतीच्या नेत्यांनी उद्धवसेनेला  या मतदार संघात राजकीय शत्रू समजून काम केले पाहिजे. अन्यथा महायुतीकडे ताकद असून देखील पुढील निवडणुका अवघड जातील. उद्धवसेनेच्या अदृश्य हातांचे मी आभार मानतो, त्यांच्या  मदतीमुळे आमचा हा विजय सुकर झाला. बाळासाहेबांना मानणा-या शिवसैनिकांनी  राणेंना मदत केली. आता जिल्ह्यातील उद्धवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते की पक्ष राहतो, हे यापुढे आम्हाला कळेलच.लोकसभेत या मतदार संघात ४२ हजारांचे लीड दिले त्याबद्दल समाधान व्यक्त करतो. उद्धव ठाकरे यांची कणकवलीत सभा झाली. त्यात आम्हाला त्यांनी शिव्या शाप दिले तेव्हाच मी सांगितले होते की, मतदार त्याचा वचपा काढतील. ते या निकालातून दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीत ३० हजाराचे लीड मला होते ते ४२ हजार झाले आहे. वैभव नाईकांचा पराभव अटळ!वैभव नाईक यांच्या मतदार संघात आम्हाला मिळालेल्या मताधिक्याने पुन्हा एकदा कुडाळ आणि मालवण मध्ये जनता राणे आणि भाजपच्या पाठीशी राहिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांचा पराभव अटळ असल्यानचेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेना