शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शाळा स्थलांतरणास आमचा विरोधच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 17:50 IST

Kankavli School Sindhudurg- सदगुरु भालचंद्र महाराज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतर व हस्तांतरण करण्यास आमचा तीव्र विरोध आहे,अशी भूमिका कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीच्यावतीने नामानंद मोडक , विष्णू राणे , गणपत मालंडकर , संजय मालंडकर यांच्यासह अन्य नागरिकांनी बुधवारी स्पष्ट केली. तसेच हा विरोध तीव्र करण्यासाठी नागरिकांमध्ये सह्याची मोहीम राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .

ठळक मुद्देशाळा स्थलांतरणास आमचा विरोधच ! कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीची भूमिका

कणकवली : सदगुरु भालचंद्र महाराज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतर व हस्तांतरण करण्यास आमचा तीव्र विरोध आहे,अशी भूमिका कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीच्यावतीने नामानंद मोडक , विष्णू राणे , गणपत मालंडकर , संजय मालंडकर यांच्यासह अन्य नागरिकांनी बुधवारी स्पष्ट केली. तसेच हा विरोध तीव्र करण्यासाठी नागरिकांमध्ये सह्याची मोहीम राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .

ही जिल्हा परिषदेची चांगली चालणारी शाळा अस्थिर करण्याचा हेतू काय ? जवळच्या हायस्कूलचा प्राथमिक विभाग पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी ही प्राथमिक शाळा अस्थिर केली जात आहे का ? आमचा संस्थानला विरोध नाही मात्र , शाळा तिथेच राहू देत. ती स्थलांतरित करू देणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास आमचा विरोध कायम राहील, अशी भूमिका कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीने  स्पष्ट केली.कणकवली कांबळेगल्ली येथील पाटकर कॉम्प्लेक्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ बचाव समितीचे बाळकृष्ण कांबळे , सायली राणे , दिलीप मालंडकर , गणपत मालंडकर , प्रशांत गवळी , रवि सावंत , अमित मांडवकर , सुरेश राणे , अनिल अणावकर , विवेक पाटकर , सुमित पाटकर , रंजना पाटकर आदी उपस्थित होते .यावेळी नामानंद मोडक म्हणाले, शाळा व्यवस्थापन समितीने इमारत जीर्ण झाल्याबद्दल दुरुस्ती ठराव मांडला का ? तो नसेल तर शाळा स्थलांतरित करण्याची चर्चा तरी का ? शाळा व्यवस्थापन समितीला आजपर्यत कधीही संस्थानने विश्वासात घेतले नाही.तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली ही शाळा अस्थिर करायची आणि सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा बंद पाडायच्या , असा हा प्रयत्न आहे.शहरातील अवस्था पाहता आतापर्यंत अनेक शाळा बंद पडल्या आहेत.त्यामुळे चांगले शिक्षण देणाऱ्या या शाळेच्या बाबतीत घडणारा हा सर्व प्रकार म्हणजे शाळा बंद कराण्याचा घाट आहे.त्याला आमचा विरोध आहे.संजय मालंडकर म्हणाले, भालचंद्र महाराज भक्त निवास बांधायचे असेल तर ते शाळेच्या पुढिल जागेत बांधावे. तसेच आमदार , खासदार निधी देत असतील , तर सध्या असलेली शाळाच दुरुस्त करावी.आम्ही त्याला समर्थन देवू . शाळा व्यवस्थापन समितीला गेल्या ४ वर्षात एकदाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला जात आहे.कोणत्याही प्रकारची चर्चा समितीबरोबर केलेली नाही.या शाळेला कोणीच वाली नाही अशी भावना भालचंद्र महाराज संस्थानची झाली असल्याचा आरोप यावेळी बचाव समितीने केला .दरम्यान, ही शाळा आहे , तिथेच राहावी अशी आमची भूमिका आहे.ही जागा शाळेसाठी मारुती हरी आचरेकर यांनी दिली . ती व्यक्ती मोलमजुरी करणारी होती.शाळेसाठीच ही जागा वापरावी म्हणून त्यांनी जागा दिली होती.मग ती जमीन इतर कामासाठी कशी देणार ? असे मतही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले .

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रKankavliकणकवलीSchoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग