शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

शाळा स्थलांतरणास आमचा विरोधच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 17:50 IST

Kankavli School Sindhudurg- सदगुरु भालचंद्र महाराज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतर व हस्तांतरण करण्यास आमचा तीव्र विरोध आहे,अशी भूमिका कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीच्यावतीने नामानंद मोडक , विष्णू राणे , गणपत मालंडकर , संजय मालंडकर यांच्यासह अन्य नागरिकांनी बुधवारी स्पष्ट केली. तसेच हा विरोध तीव्र करण्यासाठी नागरिकांमध्ये सह्याची मोहीम राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .

ठळक मुद्देशाळा स्थलांतरणास आमचा विरोधच ! कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीची भूमिका

कणकवली : सदगुरु भालचंद्र महाराज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ स्थलांतर व हस्तांतरण करण्यास आमचा तीव्र विरोध आहे,अशी भूमिका कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीच्यावतीने नामानंद मोडक , विष्णू राणे , गणपत मालंडकर , संजय मालंडकर यांच्यासह अन्य नागरिकांनी बुधवारी स्पष्ट केली. तसेच हा विरोध तीव्र करण्यासाठी नागरिकांमध्ये सह्याची मोहीम राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .

ही जिल्हा परिषदेची चांगली चालणारी शाळा अस्थिर करण्याचा हेतू काय ? जवळच्या हायस्कूलचा प्राथमिक विभाग पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी ही प्राथमिक शाळा अस्थिर केली जात आहे का ? आमचा संस्थानला विरोध नाही मात्र , शाळा तिथेच राहू देत. ती स्थलांतरित करू देणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास आमचा विरोध कायम राहील, अशी भूमिका कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ बचाव समितीने  स्पष्ट केली.कणकवली कांबळेगल्ली येथील पाटकर कॉम्प्लेक्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ बचाव समितीचे बाळकृष्ण कांबळे , सायली राणे , दिलीप मालंडकर , गणपत मालंडकर , प्रशांत गवळी , रवि सावंत , अमित मांडवकर , सुरेश राणे , अनिल अणावकर , विवेक पाटकर , सुमित पाटकर , रंजना पाटकर आदी उपस्थित होते .यावेळी नामानंद मोडक म्हणाले, शाळा व्यवस्थापन समितीने इमारत जीर्ण झाल्याबद्दल दुरुस्ती ठराव मांडला का ? तो नसेल तर शाळा स्थलांतरित करण्याची चर्चा तरी का ? शाळा व्यवस्थापन समितीला आजपर्यत कधीही संस्थानने विश्वासात घेतले नाही.तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली ही शाळा अस्थिर करायची आणि सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा बंद पाडायच्या , असा हा प्रयत्न आहे.शहरातील अवस्था पाहता आतापर्यंत अनेक शाळा बंद पडल्या आहेत.त्यामुळे चांगले शिक्षण देणाऱ्या या शाळेच्या बाबतीत घडणारा हा सर्व प्रकार म्हणजे शाळा बंद कराण्याचा घाट आहे.त्याला आमचा विरोध आहे.संजय मालंडकर म्हणाले, भालचंद्र महाराज भक्त निवास बांधायचे असेल तर ते शाळेच्या पुढिल जागेत बांधावे. तसेच आमदार , खासदार निधी देत असतील , तर सध्या असलेली शाळाच दुरुस्त करावी.आम्ही त्याला समर्थन देवू . शाळा व्यवस्थापन समितीला गेल्या ४ वर्षात एकदाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला जात आहे.कोणत्याही प्रकारची चर्चा समितीबरोबर केलेली नाही.या शाळेला कोणीच वाली नाही अशी भावना भालचंद्र महाराज संस्थानची झाली असल्याचा आरोप यावेळी बचाव समितीने केला .दरम्यान, ही शाळा आहे , तिथेच राहावी अशी आमची भूमिका आहे.ही जागा शाळेसाठी मारुती हरी आचरेकर यांनी दिली . ती व्यक्ती मोलमजुरी करणारी होती.शाळेसाठीच ही जागा वापरावी म्हणून त्यांनी जागा दिली होती.मग ती जमीन इतर कामासाठी कशी देणार ? असे मतही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले .

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रKankavliकणकवलीSchoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग