शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी यांत्रिकीकरणाचे फक्त ११२ प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 10:29 IST

Kankavli panchayat samiti sindhudurg -कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कोरोनामुळे मागील वर्षी सोडत काढण्यात अडचणी आल्या. मात्र, आयुक्‍त स्तरावर झालेल्या ऑनलाईन सोडतीमध्ये यातील केवळ ११२ प्रस्तावांची निवड करण्यात आल्याने पंचायत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

ठळक मुद्दे कणकवली पंचायत समिती सभेत माहिती उघड कृषी विभागाच्या प्रश्‍नांवर स्वतंत्र बैठक : मनोज रावराणे

कणकवली: कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत मागील वर्षी कणकवली तालुक्यातून विविध औजारांसाठी सुमारे १२९० प्रस्ताव प्राप्त झाले होते. कोरोनामुळे मागील वर्षी सोडत काढण्यात अडचणी आल्या. मात्र, आयुक्‍त स्तरावर झालेल्या ऑनलाईन सोडतीमध्ये यातील केवळ ११२ प्रस्तावांची निवड करण्यात आल्याने पंचायत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. तसेच उर्वरित प्रस्ताव नाकारताना देण्यात आलेल्या कारणांची माहिती आम्हाला द्या. अशी मागणी केली.कणकवली पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात सभापती मनोज रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती प्रकाश पारकर, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण आदी उपस्थित होते.या सभेत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत किती प्रस्ताव मंजूर झाले? अशी विचारणा सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी केली असता, १२९०प्रस्तावांपैकी ११२ लाभार्थ्यांची निवड झाल्याचे कृषी अधिकार्‍यांनी सांगितले. मग उर्वरित प्रस्तावांचे काय करणार? अशी विचारणा सदस्य गणेश तांबे यांनी केली.भातपिक विमा योजनेचा किती शेतकर्‍यांना फायदा झाला आहे? अशी विचारणा सदस्य मंगेश सावंत यांनी केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा, काजू बागायतींच्या नुकसानीचे काय? अशी विचारणा केल्यानंतर कृषी विभागाशी संबंधित असलेल्या सर्वच प्रश्‍नांवर स्वतंत्र बैठक घेऊन त्याचा निपटारा केला जाईल असे सभापती मनोज रावराणे यांनी सांगितले.पंचायत समिती सेसमधून शेतकर्‍यांना ताडपत्री वितरित केल्या जाणार असून त्यांचे प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावेत. असे गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी यावेळी सांगितले. कोविड लसीकरणाचा आढावा घेताना तालुक्यात १८९९ लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १७०० जणांना कोविड लसीकरण झाले असून हे प्रमाण ९० टक्के इतके आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.तालुक्याचा पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये नळयोजना विशेष दुरूस्तीची १८ कामे, तात्पुरती पुरक नळयोजनेची २ कामे, नवीन विंधन विहिरी ६३, विहिर खोल करणे व गाळ काढणे २१ कामे अशा १०४ कामांसाठी १ कोटी ११ लाख ८७ हजाराचा प्रस्तावित आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.कणकवली तालुक्याचा विकास करताना लोकप्रतिनिधींबरोबरच अधिकारीही सहभागी व्हायला हवेत. त्यामुळे येत्या काळात सर्वांनी एकत्रितपणे काम करत तालुक्याच्या विकासाला गती द्यावी असे आवाहन उपसभापती प्रकाश पारकर यांनी केले.

कार्यकारिणीचा कार्यकाळ एक वर्षे शिल्लक असून या काळात प्रलंबित सर्व प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल असे मनोज रावराणे यांनी सांगितले. सभेत कणकवली तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.फक्त ४७ शेतकऱ्यांनाच मोबदलाभातपीक विमा योजनेमध्ये ३१३पैकी फक्त ४७ शेतकर्‍यांना मोबदला देण्यात आल्याने इतरांचे काय ? अशी विचारणा या सभेत सदस्यांमधून करण्यात आली. यावेळी कृषी विभागा अंतर्गत विविध प्रलंबित प्रश्‍नांवर स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेश सभापती मनोज रावराणे यांनी दिले.

टॅग्स :Kankavliकणकवलीpanchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग