शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग : नियम धाब्यावर बसवित आठवडा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 16:50 IST

corona virus Market sindhudurg -संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती असतानाच सावंतवाडीत मात्र आठवडा बाजार सुरू असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. विरोधी नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांंनी प्रशासनावर संताप व्यक्त करीत कोरोनाची लागण सावंतवाडीत व्हावी, अशी इच्छा आहे का? असा सवाल केला. या आठवडा बाजारावर मात्र जिल्हा प्रशासनही मूग गिळून गप्प असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल आता होऊ लागला आहे.

ठळक मुद्देना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग : नियम धाब्यावर बसवित आठवडा बाजार जयेंद्र परुळेकर यांचा सावंतवाडीच्या बाजाराला आक्षेप

सावंतवाडी : संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती असतानाच सावंतवाडीत मात्र आठवडा बाजार सुरू असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. विरोधी नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांंनी प्रशासनावर संताप व्यक्त करीत कोरोनाची लागण सावंतवाडीत व्हावी, अशी इच्छा आहे का? असा सवाल केला. या आठवडा बाजारावर मात्र जिल्हा प्रशासनही मूग गिळून गप्प असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल आता होऊ लागला आहे.संपूर्ण राज्यात सध्या वाढत्या कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्ण कमी व्हावेत म्हणून शासन स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कडक उपाययोजना आखण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. छोटे-मोठे कार्यक्रम कुठेही असले तर त्यावर बंदी घालण्यात येत आहे. लग्न समारंभासाठी परवानगी देत असताना नियम काटेकोरपणे पाळा असे प्रशासन सांगत आहे. हे सर्व सुरू असतना दुसरीकडे मात्र सावंतवाडी नगरपालिकेने जिल्हा प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसून येत आहे.सावंतवाडीत कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत. अशातच नगरपालिकेने कुठे तरी पुढाकार घेऊन आठवडा बाजार बंद करणे गरजेचे असताना मंगळवारचा आठवडा बाजार सुुरूच ठेवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एरव्ही छोट्या-छोट्या टपऱ्यावर धाड घालणारे मुख्याधिकारी राज्य शासनाने आखून दिलेले नियम कसे काय मोडतात, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.विरोधी नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांनीही नगरपालिकेच्या कारभारावर बोट ठेवले असून, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक ठिकाणी रुग्ण मृत्युमुखी पडत असताना सावंतवाडी नगरपालिकेला बाजारातून एवढे किती उत्पादन मिळते की अन्य काय? असा सवाल उपस्थित केला आहे.तसेच मुख्याधिकारी हे वेळोवेळी मटक्यावर धाडी टाकतात. मग तेव्हा आपत्कालीन व आता हे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात तेव्हा काय? असा सवाल उपस्थित करीत मुख्याधिकारी यांची कृती चुकीची असल्याचे सांगितले. तसेच या विरोधात आपण जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे डॉ. परुळेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग