शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग : नियम धाब्यावर बसवित आठवडा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 16:50 IST

corona virus Market sindhudurg -संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती असतानाच सावंतवाडीत मात्र आठवडा बाजार सुरू असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. विरोधी नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांंनी प्रशासनावर संताप व्यक्त करीत कोरोनाची लागण सावंतवाडीत व्हावी, अशी इच्छा आहे का? असा सवाल केला. या आठवडा बाजारावर मात्र जिल्हा प्रशासनही मूग गिळून गप्प असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल आता होऊ लागला आहे.

ठळक मुद्देना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग : नियम धाब्यावर बसवित आठवडा बाजार जयेंद्र परुळेकर यांचा सावंतवाडीच्या बाजाराला आक्षेप

सावंतवाडी : संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती असतानाच सावंतवाडीत मात्र आठवडा बाजार सुरू असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. विरोधी नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांंनी प्रशासनावर संताप व्यक्त करीत कोरोनाची लागण सावंतवाडीत व्हावी, अशी इच्छा आहे का? असा सवाल केला. या आठवडा बाजारावर मात्र जिल्हा प्रशासनही मूग गिळून गप्प असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल आता होऊ लागला आहे.संपूर्ण राज्यात सध्या वाढत्या कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्ण कमी व्हावेत म्हणून शासन स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कडक उपाययोजना आखण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. छोटे-मोठे कार्यक्रम कुठेही असले तर त्यावर बंदी घालण्यात येत आहे. लग्न समारंभासाठी परवानगी देत असताना नियम काटेकोरपणे पाळा असे प्रशासन सांगत आहे. हे सर्व सुरू असतना दुसरीकडे मात्र सावंतवाडी नगरपालिकेने जिल्हा प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसून येत आहे.सावंतवाडीत कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत. अशातच नगरपालिकेने कुठे तरी पुढाकार घेऊन आठवडा बाजार बंद करणे गरजेचे असताना मंगळवारचा आठवडा बाजार सुुरूच ठेवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एरव्ही छोट्या-छोट्या टपऱ्यावर धाड घालणारे मुख्याधिकारी राज्य शासनाने आखून दिलेले नियम कसे काय मोडतात, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.विरोधी नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांनीही नगरपालिकेच्या कारभारावर बोट ठेवले असून, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक ठिकाणी रुग्ण मृत्युमुखी पडत असताना सावंतवाडी नगरपालिकेला बाजारातून एवढे किती उत्पादन मिळते की अन्य काय? असा सवाल उपस्थित केला आहे.तसेच मुख्याधिकारी हे वेळोवेळी मटक्यावर धाडी टाकतात. मग तेव्हा आपत्कालीन व आता हे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात तेव्हा काय? असा सवाल उपस्थित करीत मुख्याधिकारी यांची कृती चुकीची असल्याचे सांगितले. तसेच या विरोधात आपण जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे डॉ. परुळेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग