शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

Konkan Politics : शिवसेनेकडून अपेक्षाच उरल्या नाहीत : निलेश राणेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 16:13 IST

Konkan Politics : शिवसेनेने कोकणाला मतांच्या बदल्यात काय दिले? आठ दिवसांनंतरही वादळग्रस्तांना मदत नाही. वैभव नाईक यांना प्रशासनात काडीची किंमत नाही. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षाच नाहीत. त्यामुळे शक्य तेवढी मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप करीत आहे. भाजप म्हणून आम्ही जनतेसोबत आहोत, असा विश्वास भाजप नेते, प्रदेश सचिव निलेश राणे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देशिवसेनेकडून अपेक्षाच उरल्या नाहीत : निलेश राणेंची टीका मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर होत नाही ही शोकांतिकाच

मालवण : शिवसेनेने कोकणाला मतांच्या बदल्यात काय दिले? आठ दिवसांनंतरही वादळग्रस्तांना मदत नाही. वैभव नाईक यांना प्रशासनात काडीची किंमत नाही. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षाच नाहीत. त्यामुळे शक्य तेवढी मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप करीत आहे. भाजप म्हणून आम्ही जनतेसोबत आहोत, असा विश्वास भाजप नेते, प्रदेश सचिव निलेश राणे यांनी व्यक्त केला.तौक्ते चक्रीवादळानंतर नुकसान झालेल्या मालवण, देवबाग, वायरी व अन्य परिसराची भाजप नेते निलेश राणे यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना पत्रे, ताडपत्री व जीवनावश्यक वस्तू, आदी मदतीचे थेट वाटप केले. नुकसानग्रस्तांना कौलांचेही वितरण केले जाईल. आम्ही आपद्ग्रस्तांसोबत आहोत, असा विश्वासही राणे यांनी दिला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, विक्रांत नाईक, भाई मांजरेकर, जॅक्सन फर्नांडिस, अवी सामंत, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.वीजपुरवठा सुरळीत होण्यामागे स्थानिक जनतेलाच श्रेय जाते. सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. प्रशासनावर अंकुश नसल्याने मालवण अजूनही अंधारात आहे. मात्र, आम्ही सतत प्रशासनाच्या संपर्कात आहोत.वीज साहित्याची असलेली कमतरता दूर केली जाणार आहे. भाजप जनतेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.पत्रे विकणे आमदारांचा धंदा !, मंत्री नुसती आश्वासने देत आहेतवादळ, भूकंप झाला की आमदार वैभव नाईक यांचा सिझन चालू होतो. त्यांचा पत्र्याचा धंदा आहे. लाज वाटली पाहिजे शिवसेनेच्या आमदाराला. या आपत्ती काळात पत्रे विकणे सुरू आहे. ज्यावेळी जनतेला मदत पाहिजे, तेव्हा हे व यांचे मंत्री नुसती आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री येऊनही जनतेला मदत जाहीर होत नाही ही शोकांतिका आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली. मुख्यमंत्री यांच्याशी बोललेल्या क्लिप व्हायरल केल्यानंतर एसडीआरएफचा निधी आला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणkonkanकोकणNilesh Raneनिलेश राणे Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाShiv Senaशिवसेना