शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

Konkan Politics : शिवसेनेकडून अपेक्षाच उरल्या नाहीत : निलेश राणेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 16:13 IST

Konkan Politics : शिवसेनेने कोकणाला मतांच्या बदल्यात काय दिले? आठ दिवसांनंतरही वादळग्रस्तांना मदत नाही. वैभव नाईक यांना प्रशासनात काडीची किंमत नाही. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षाच नाहीत. त्यामुळे शक्य तेवढी मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप करीत आहे. भाजप म्हणून आम्ही जनतेसोबत आहोत, असा विश्वास भाजप नेते, प्रदेश सचिव निलेश राणे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देशिवसेनेकडून अपेक्षाच उरल्या नाहीत : निलेश राणेंची टीका मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर होत नाही ही शोकांतिकाच

मालवण : शिवसेनेने कोकणाला मतांच्या बदल्यात काय दिले? आठ दिवसांनंतरही वादळग्रस्तांना मदत नाही. वैभव नाईक यांना प्रशासनात काडीची किंमत नाही. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षाच नाहीत. त्यामुळे शक्य तेवढी मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप करीत आहे. भाजप म्हणून आम्ही जनतेसोबत आहोत, असा विश्वास भाजप नेते, प्रदेश सचिव निलेश राणे यांनी व्यक्त केला.तौक्ते चक्रीवादळानंतर नुकसान झालेल्या मालवण, देवबाग, वायरी व अन्य परिसराची भाजप नेते निलेश राणे यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना पत्रे, ताडपत्री व जीवनावश्यक वस्तू, आदी मदतीचे थेट वाटप केले. नुकसानग्रस्तांना कौलांचेही वितरण केले जाईल. आम्ही आपद्ग्रस्तांसोबत आहोत, असा विश्वासही राणे यांनी दिला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, विक्रांत नाईक, भाई मांजरेकर, जॅक्सन फर्नांडिस, अवी सामंत, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.वीजपुरवठा सुरळीत होण्यामागे स्थानिक जनतेलाच श्रेय जाते. सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. प्रशासनावर अंकुश नसल्याने मालवण अजूनही अंधारात आहे. मात्र, आम्ही सतत प्रशासनाच्या संपर्कात आहोत.वीज साहित्याची असलेली कमतरता दूर केली जाणार आहे. भाजप जनतेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.पत्रे विकणे आमदारांचा धंदा !, मंत्री नुसती आश्वासने देत आहेतवादळ, भूकंप झाला की आमदार वैभव नाईक यांचा सिझन चालू होतो. त्यांचा पत्र्याचा धंदा आहे. लाज वाटली पाहिजे शिवसेनेच्या आमदाराला. या आपत्ती काळात पत्रे विकणे सुरू आहे. ज्यावेळी जनतेला मदत पाहिजे, तेव्हा हे व यांचे मंत्री नुसती आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री येऊनही जनतेला मदत जाहीर होत नाही ही शोकांतिका आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली. मुख्यमंत्री यांच्याशी बोललेल्या क्लिप व्हायरल केल्यानंतर एसडीआरएफचा निधी आला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणkonkanकोकणNilesh Raneनिलेश राणे Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाShiv Senaशिवसेना