शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, सेवाशर्ती लागू करण्यासाठी आग्रह धरणार, नितेश राणे यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 16:23 IST

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनस्तरावर मांडून वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. यापुर्वी शासनाकडे ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अहवाल ज्या समित्यांनी दिलेला आहे. त्याचाही विचार शासनाला करायला भाग पाडू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देमागण्यांचा अहवाल ज्या समित्यांनी दिला आहे, त्याचाही विचार करायला भाग पाडू संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार नीतेश राणे यांची भेट

कणकवली : सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनस्तरावर मांडून वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. यापुर्वी शासनाकडे ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अहवाल ज्या समित्यांनी दिलेला आहे. त्याचाही विचार शासनाला करायला भाग पाडू असेही त्यांनी यावेळी सांगितले.येथील ओमगणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय शिंदे, कार्यवाह महेंद्र पटेल, अनिल शिवडावकर, पुनम नाईक, जान्हवी जोशी, राजन ठाकूर, सिद्धी हरयाण, दिक्षा नेरुरकर, रंजना पेठेकर, सुकन्या देसाई आदी पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदन दिले.ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांची भेट घेतली. यावेळी शासनाकडून वेतनश्रेणी व सेवाशर्तीची पुर्तता केली जावी अशी मागणी केली. यासाठी शासनाला यापुर्वी पागे समिती, प्रभाराव व व्यंकप्पा समिती यांनी जो अहवाल दिलेला आहे तो स्वीकारावा व त्यांच्या शिफारशी आपल्याला लागु कराव्यात अशा मागणीचे निवेदन दिले.

मागील काही वर्षात दर पाच वर्षांनी ग्रंथालयांचे अनुदान शासनाने सरसकट दुप्पट केले आहे. परंतु, २००४ नंतर या अनुदानात केवळ ५० टक्के वाढ केलेली आहे. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा प्रश्न येतो. त्यावेळी मात्र निधीचे कारण पुढे केले जाते.

वाढत चाललेल्या महागाईत ५०० ते २००० एवढ्या तुटपुंज्या पगारावर काम करणाºया ग्रथालय कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा. त्यांना महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढ दिली जावी.

१०० टक्के अनुदानाची मागणी पुर्ण करावी जेणेकरून त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार नाही. ग्रंथालय कायद्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत . परंतु या चळवळीची स्थिती शासनाच्या नाकर्तेपणामुळे चिंताजनक बनली असल्याची कैफियत कर्मचाऱ्यांनी मांडली.

 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग