शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 18:23 IST

मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले

Bharat Gogavale VS Nitesh Rane: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी सिंधुदुर्ग मधल्या भाषणामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांचे कौतुक करता करता एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नारायण राणे यांना एवढ्या उंचीवर जाण्याचे यश सहजासहजी मिळालेलं नाही, अंगावरती केसेस घेतल्या, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केली असं वक्तव्य गोगावले यांनी केलं. गोगावले यांच्या या वक्ताव्यावर आता मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मर्डरबाबत नारायण राणेंविरोधात पोलीस रेकॉर्ड नाही, भेटल्यावरती भरत गोगावले यांच्या ज्ञानात भर टाकेन असं नितेश राणे म्हणालेत.

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याची बैठक कुडाळ पावशी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं. सिंधुदुर्गामध्ये भाषणादरम्यान गोगावले यांनी नारायण राणेंनी मारामाऱ्या, मर्डर केल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकारण चांगलेच तापलं आहे. यावर मंत्री नितेश राणे यांनी गोगावलेंना प्रत्युत्तर दिलं.

"मी भरत गोगावले यांचे भाषण ऐकलेलं नाही. नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मर्डर केसबाबत असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या विरोधात नाही. कदाचित गोगावले यांना पूर्ण माहिती नसेल. आज संध्याकाळी चहापानाच्या निमित्ताने ते माझ्या खांद्याला खांदा लावून उभे असतील. नारायण राणे यांनी शिवसेना वाढवली. ते प्रत्येक शिवसैनिकाच्या बरोबर राहिले म्हणून बाळासाहेबांनी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद दिले. भरत गोगावले हे त्यांचे जुने सहकारी आहेत. आज भेटल्यानंतर त्यांच्या ज्ञानात मी थोडीशी भर टाकेन," असं नितेश राणे यांनी म्हटलं.

काय म्हणाले भरत गोगावले?

"नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालं. वेगळं सांगायची आवश्यकता नाही," असं भरत गोगावले म्हणाले.

"सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण गेले अनेक वर्ष पाहतोय. निलेश राणेंच्या रुपाने सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली. भानगडी केला नाही तो शिवसैनिक नव्हे. केसरकर भानगडी करणारे नाहीत त्यामुळे अडचण होते. मात्र निलेश राणे  जशास तसं उत्तर देणारे आहेत. पण आता भानगडी करायचे दिवस संपले आहेत. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालवायचं आहे," असंही भरत गोगावले यांनी म्हटलं.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा