शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

कोकणातील सेतू कार्यालये चालवण्याचे कंत्राट गुजरातच्या कंपनीला; नितेश राणे म्हणाले, "मी इथे बसलोय ना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:16 IST

सिंधुदुर्ग जिह्यातील सेतू सुविधा केंद्रे चालवण्याचे कंत्राट महायुती सरकारने गुजरातमधील कंपनीला दिले आहे.

Sindhudurg Setu Suvidha Kendra: राज्यातील उद्योगधंदे गुजरातला जात असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू कार्यालय गुजरातमधील कंपनी चालवणार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्राचा कंत्राट गुजरात येथील एका कंपनीला देण्यात आल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. यावर बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी स्थानिकांवर अन्याय होऊ देणार नाही असं म्हटलं. गुजरातवर टीका करणाऱ्या लोकांच्या मालकाचा मुलगा गुजराती लोकांच्या लग्नात नाचत असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नऊ तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र चालवण्याची जबाबदारी गुजरातची कंपनी असलेल्या गुजरात इन्फोटेककडे देण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी याच कंपनीकडे सेतू कार्यालय चालवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.  त्यामुळे सेतू सुविधा केंद्र गुजराती कंपनीमार्फत चालवण्यात येणार ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिला आहे. तर सत्ताधारी गुजरातच्या अधिपत्त्याखाली असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

"सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुजरात इन्फोटेकला हे काम देण्यात आलं आहे. इथल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. आता त्यांच्याकडून कमी पगारावर काम करणाऱ्यांना नेमण्यात येणार आहे. त्यामुळे हे सर्व आता गुजरातला देण्याचा डाव शासनाचा आहे. इथल्या सत्ताधाऱ्यांनी जमलं तर त्याकडे लक्ष द्यावं. कारण ते सुद्धा गुजरातच्या अधिपत्याखाली राजकारणामध्ये काम करत आहेत," अशी टीका वैभव नाईक यांनी केली. वैभव नाईक आणि विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपांना पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"ते कार्यालय चालवणारे मराठी आहेत. मी इथे बसलेलो आहे ना. माझ्या इथल्या लोकांना त्याचा फायदा कसा मिळवून द्यायचा, रोजगार कसा मिळवून द्यायचा त्यासाठी नितेश राणे पालकमंत्री म्हणून सक्षम आहेत. माझ्या स्थानिक भूमीपुत्रांवर कोणीही अन्याय करू शकणार नाही. जे गुजरातवर आक्षेप घेत आहेत त्यांनी त्यांच्या मालकांना पहिले जाऊन सांगावं की त्यांच्या मुलाला गुजराती लोकांच्या लग्नामध्ये नाचायला बंद करायला सांगावं. मी जिल्ह्यातल्या जनतेला विश्वास देतो कंपनी कुठलीही असो जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनाच त्या सेतू केंद्रामध्ये प्राधान्य दिले जाईल," असं मंत्री नितेश राणे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Vinayak Rautविनायक राऊत Vaibhav Naikवैभव नाईक