शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

नव्या पॅसेंजरची वेळ गैरसोयीची

By admin | Updated: April 3, 2015 00:46 IST

कोकण रेल्वे : जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याचीच स्थिती-- समस्या कोकण रेल्वेची - भाग १

रजनीकांत कदम - कुडाळ --कोकण रेल्वेच्या मार्गावर कोकणातील व गोव्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर या रेल्वेचे वेळापत्रक पाहता ही रेल्वे खरोखरच प्रवाशांच्या फायद्याची ठरेल काय, असा प्रश्न निर्माण होत असून, या रेल्वेचे वेळापत्रक पाहता पुन्हा एकदा कोकण रेल्वे प्रशासनाने येथील जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याचे चित्र दिसून येत आहे. गेली अनेक वर्षे रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व गोवा राज्यातील जनतेची स्वतंत्र मडगाव- रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे म्हणून कोकण रेल्वेने सुरू केली असून, या रेल्वेचा प्रारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मडगाव येथे केला. मात्र, या रेल्वेचा खरोखरच प्रवाशांना फायदा होईल काय, हे पाहणे गरजेचे आहे. कारण रत्नागिरी प्रवाशांकरिता सोडण्यात आलेली दादर-रत्नागिरी ५०१०३ पॅसेंजर ट्रेन रत्नागिरीसाठी मर्यादित न ठेवता २०१३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या रत्नागिरी-मडगाव या नवीन गाडीच्या गोंडस नावाखाली रेल्वे मंत्रालयाच्या आदेशाचा आधार घेऊन दादर -रत्नागिरी हीच ५०१०३ पॅसेंजर ट्रेन रत्नागिरी-मडगाव ५०१०१ या नंबरने मडगावपर्यंत सोडून कोकण रेल्वे प्रशासन महाराष्ट्रातील कोकण रेल्वेचे अस्तित्व गोवा राज्यात प्रस्थापित करून रेल्वे बोर्डाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करीत आहेत, असे मत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर यांनी व्यक्त केले आहे. ही दादर-रत्नागिरी ५०१०३ पॅसेंजर ट्रेन रत्नागिरी येथे रात्री २४.१५ वाजता येईल व २४.१५ ते ०३.२० पर्यंत रत्नागिरीत थांबून हीच ट्रेन ५०१०१ या नंबरने ०३.२० ला मडगावला रवाना होईल. मडगाव येथे सकाळी ०९.५० ला पोहोचेल व मडगाव येथे या गाडीचा मेन्टर्न्स होऊन हीच गाडी ५०१०२ या नंबरने १९.१० वाजता मडगाव येथून रवाना होईल व रत्नागिरी येथे ००.१५ वाजता पोहोचेल. ००.१५ ते ०५.५० पर्यंत रत्नागिरी येथे थांबून ५.५० ला रत्नागिरी येथून दादरसाठी रवाना होईल. २०१३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या रत्नागिरी-मडगाव या नवीन गाडीसाठी तीन डब्यांची (पूर्वीप्रमाणे) स्वतंत्र गाडी सोडता आली असती; पण १८ डब्यांची गाडी रात्री ०३ वाजता सोडून १ दिवस मडगावला फिरवून आणून तोट्यात असलेल्या रेल्वेला अजून तोट्यात का घालण्यात येत आहे? दादर-रत्नागिरी गाडी रत्नागिरीत थांबून पुन्हा रत्नागिरीतूनच सुटत असल्यामुळे त्या गाडीचा मेंटनन्स रत्नागिरीतल्या डेपोतच होत होता. आता गाडी थांबतच नसल्यामुळे व या गाडीचा मेंटनन्स मडगाव येथे होणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे भविष्यात रत्नागिरी येथील मेंटनन्स डेपो गोव्यात स्थलांतरित करून कोकण रेल्वे प्रशासन कोकण रेल्वेचे मुख्यालय मडगाव येथे करण्याच्या दृष्टीने डाव रचत आहे. भविष्यात रत्नागिरीसाठी असलेली गाडी मडगाव येथे नेऊन मडगाव येथून मुुख्यालय मडगाव येथे करण्याच्या दृष्टीने डाव रचत आहे. रेल्वेफेरी दिवसाची आवश्यकमडगाव-रत्नागिरी पॅसेंजर ही स्वतंत्र रेल्वे कोकण रेल्वेने देणे गरजेचे असून, ती सकाळी रत्नागिरीहून किंवा मडगावहून सुटणे गरजेचे आहे व दुपारी पुन्हा ती माघारी फिरणे गरजेचे आहे. तरच या रेल्वेचा फायदा रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व गोवा राज्यातील प्रवाशांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.रत्नागिरीच्या नंतर काही रेल्वेस्थानकांवर ही गाडी पहाटे ४.४५ व ६.०० वाजता येणार आहे. या वेळेत कोणत्या प्रवाशांना याचा फायदा होणार, हा प्रश्न पडत असून, कोकण रेल्वे मात्र ही पॅसेंजर तोट्यात चालवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पहाटे तीन वाजता प्रवासी मिळणार का?भविष्यात रत्नागिरीसाठी असलेली गाडी मडगाव येथून परत येताना जर भरून आली, तर रत्नागिरीच्या प्रवाशांनी काय करावे, हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. १८ डब्यांची ट्रेन पहाटे ३.२० वाजता मडगाव येथे जात असताना पहाटे ३ वाजता प्रवासी मिळणार का, याचे उत्तर आजच्या क्षणाला नाही.