शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

नियोजनबद्ध विकासासाठी आराखड्याची गरज

By admin | Updated: October 8, 2015 00:33 IST

विद्याधर देशपांडे : कणकवलीत विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन

कणकवली : दिवसेंदिवस महाराष्ट्रात शहरीकरणाचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविताना प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत शहराचा सर्वांगीण तसेच नियोजनबद्ध विकास व्हायचा असेल तर विकास आराखड्याची नितांत गरज आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे नगर विकास विभागाचे माजी संचालक विद्याधर देशपांडे व्यक्त केले.येथील नगरवाचनालयाच्या पू. आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात बुधवारी डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्ट आणि कणकवली नगरपंचायतीच्यावतीने नगर विकास आराखडा लोकजागृती विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या विश्वस्त निला पटवर्धन, विकास आराखडा विषयाचे अभ्यासक गजानन खातू, रमाकांत पाटील, अ‍ॅड. सुरेखा दळवी, अर्पिता मुंबरकर, हरिहर वाटवे, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह अन्य नागरिक व नगरसेवक उपस्थित होते.यावेळी विद्याधर देशपांडे म्हणाले की, गेल्या ५० ते ६० वर्षात शहरात राहणाऱ्यांची संख्या २० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे शहराचा कारभार करणाऱ्या नगरपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविताना अतिरिक्त ताण येत आहे. रहदारीसाठी रस्त्यांची संख्या कमी पडत आहे. प्रदूषणाबरोबरच रस्त्यांवरील अपघातांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत सामान्य जनतेला सुविधा पुरविणे सुलभ व्हावे यासाठी शहर विकास आराखड्याची गरज आहे. हा आराखडा बनविण्याची महत्वाची जबाबदारी नगरपंचायतीवर असते. त्यांनी ही जबाबदारी पार पडली नाही तर शासन जनहिताच्या भूमिकेतून नगरपंचायतीचे अधिकार काढून घेऊन आपण ते काम करू शकते. पुणे तसेच इतर ठिकाणी असे घडले आहे.कणकवली शहराचा परिपूर्ण विकास आराखडा तयार करायला सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. हा आराखडा तयार करताना नागरिकांनी सतर्क राहून आपल्या हरकती नोंदवायला हव्यात. शहरातील सामाजिक संस्थांनीही त्यासाठी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.अ‍ॅड. सुरेखा दळवी म्हणाल्या, संपूर्ण देशातील राज्यांमध्ये शहरीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. ग्रामीण भागातही छोटी शहरे साकारत आहेत. मात्र, नियोजनाअभावी शहरांच्या बकालपणात वाढ होत आहे. त्यामुळे शहरांचे अभ्यासपूर्ण विकास आराखडे तयार करणे गरजेचे आहे. गजानन खातू, रमाकांत पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन पद्मावती गुप्ते यांनी केले. निला पटवर्धन यांनी डॉ. मंडलिक ट्रस्टच्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत तुकडोजी महाराज रचित गीत लीला आपटे यांनी सादर केले. यावेळी काही नागरिकांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी कणकवली शहराचा परिपूर्ण विकास आराखडा बनविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले. (वार्ताहर)नुकसानीची भीती नकोशहर विकासासाठी आपली जागा घेतली जाईल. जागेवर आरक्षण पडेल आणि आपले नुकसान होईल अशी भीती अनेक नागरिकांना असते. मात्र, शासनाने नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जागा मालकांनी घाबरण्याचे कारण नाही.नागरिकांचा विरोध टाळण्यासाठी लँड पुलिंग टेक्निकसारख्या पद्धती अलिकडे विकास प्रकल्पासाठी जागा घेताना वापरल्या जातात.त्याचा सर्वच नागरिकांना फायदा होतो. गुजरातसारख्या राज्यात तर लोकांकडून टाऊन प्लॅनिंगचे स्वागत करण्यात येत असल्याचेही विद्याधर देशपांडे म्हणाले.