शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा, जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:43 IST

केंद्र तसेच राज्यातील शिवसेना- भाजप युतीचे शासन सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊन या शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. कणकवली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खड्डेमय रस्ते, वीज समस्या या बरोबरच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारीही वाढतच चालली आहे, अशा समस्यांकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी निवासी नायब तहसिलदार रविंद्र कडुलकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देजनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरु : राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा कणकवलीत निवासी नायब तहसिलदाराना निवेदन कणकवल तहसील कार्यालयात पोलिस बंदोबस्त !

कणकवली : केंद्र तसेच राज्यातील शिवसेना- भाजप युतीचे शासन सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊन या शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. कणकवली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खड्डेमय रस्ते, वीज समस्या या बरोबरच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारीही वाढतच चालली आहे, अशा समस्यांकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी निवासी नायब तहसिलदार रविंद्र कडुलकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयाला मंगळवारी भेट देवून हे निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राजेश पाताड़े, तालुकाध्यक्ष विलास गावकर, ग्राहक सरंक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे, शहर अध्यक्ष इम्रान शेख, युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, तालुका उपाध्यक्ष सागर वारंग, अमित केतकर, गणेश चौगुले, सचिन अडुळकर, सचिन सदडेकर, सत्यवान कानडे, धनंजय पाताड़े, दीपेश सावंत, अभय गावकर, अंकुश मेस्त्री, बाळू मेस्त्री, जहीर फकीर आदी उपस्थित होते.यावेळी निवासी नायब तहसिलदारांकडे राष्ट्रवादीच्यावतीने म्हणणे मांडताना अबिद नाईक म्हणाले, तालुक्या बरोबरच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. शासकीय रुग्णालयात औषध पुरवठा नाही. महागाई गगनाला भिडली आहे. गॅस, पेट्रोलच्या किंमतींसह रोजच्या वापरातील जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढतच चालले आहे. गुन्हेगारीही वाढत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली आहे.

रस्त्यांवरील खड्डे हे नेहमीचेच दुखणे बनले आहे. यासह विज समस्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा अनेक समस्या आहेत. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत आमच्या भावना शासन दरबारी पोहोचवाव्यात. नाहीतर येत्या काही दिवसात जनतेच्या समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या साथीने संघर्ष करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.तहसील कार्यालयात पोलिस बंदोबस्त !राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शासनाचा निषेध करीत कणकवली शहरातून मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिस प्रशासनाने जमाव बंदीचा आदेश असल्याचे कारण सांगून मोर्चाची परवानगी नाकारली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसिलदाराना निवेदन देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपनिरीक्षक सचिन नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात मंगळवारी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNCPराष्ट्रवादी काँग्रेस