शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा, जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:43 IST

केंद्र तसेच राज्यातील शिवसेना- भाजप युतीचे शासन सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊन या शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. कणकवली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खड्डेमय रस्ते, वीज समस्या या बरोबरच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारीही वाढतच चालली आहे, अशा समस्यांकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी निवासी नायब तहसिलदार रविंद्र कडुलकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देजनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरु : राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा कणकवलीत निवासी नायब तहसिलदाराना निवेदन कणकवल तहसील कार्यालयात पोलिस बंदोबस्त !

कणकवली : केंद्र तसेच राज्यातील शिवसेना- भाजप युतीचे शासन सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊन या शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. कणकवली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खड्डेमय रस्ते, वीज समस्या या बरोबरच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारीही वाढतच चालली आहे, अशा समस्यांकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी निवासी नायब तहसिलदार रविंद्र कडुलकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयाला मंगळवारी भेट देवून हे निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राजेश पाताड़े, तालुकाध्यक्ष विलास गावकर, ग्राहक सरंक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे, शहर अध्यक्ष इम्रान शेख, युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, तालुका उपाध्यक्ष सागर वारंग, अमित केतकर, गणेश चौगुले, सचिन अडुळकर, सचिन सदडेकर, सत्यवान कानडे, धनंजय पाताड़े, दीपेश सावंत, अभय गावकर, अंकुश मेस्त्री, बाळू मेस्त्री, जहीर फकीर आदी उपस्थित होते.यावेळी निवासी नायब तहसिलदारांकडे राष्ट्रवादीच्यावतीने म्हणणे मांडताना अबिद नाईक म्हणाले, तालुक्या बरोबरच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. शासकीय रुग्णालयात औषध पुरवठा नाही. महागाई गगनाला भिडली आहे. गॅस, पेट्रोलच्या किंमतींसह रोजच्या वापरातील जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढतच चालले आहे. गुन्हेगारीही वाढत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली आहे.

रस्त्यांवरील खड्डे हे नेहमीचेच दुखणे बनले आहे. यासह विज समस्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा अनेक समस्या आहेत. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत आमच्या भावना शासन दरबारी पोहोचवाव्यात. नाहीतर येत्या काही दिवसात जनतेच्या समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या साथीने संघर्ष करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.तहसील कार्यालयात पोलिस बंदोबस्त !राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शासनाचा निषेध करीत कणकवली शहरातून मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिस प्रशासनाने जमाव बंदीचा आदेश असल्याचे कारण सांगून मोर्चाची परवानगी नाकारली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसिलदाराना निवेदन देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपनिरीक्षक सचिन नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात मंगळवारी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNCPराष्ट्रवादी काँग्रेस