शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा, जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:43 IST

केंद्र तसेच राज्यातील शिवसेना- भाजप युतीचे शासन सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊन या शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. कणकवली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खड्डेमय रस्ते, वीज समस्या या बरोबरच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारीही वाढतच चालली आहे, अशा समस्यांकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी निवासी नायब तहसिलदार रविंद्र कडुलकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देजनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरु : राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा कणकवलीत निवासी नायब तहसिलदाराना निवेदन कणकवल तहसील कार्यालयात पोलिस बंदोबस्त !

कणकवली : केंद्र तसेच राज्यातील शिवसेना- भाजप युतीचे शासन सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊन या शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. कणकवली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. खड्डेमय रस्ते, वीज समस्या या बरोबरच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारीही वाढतच चालली आहे, अशा समस्यांकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी निवासी नायब तहसिलदार रविंद्र कडुलकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयाला मंगळवारी भेट देवून हे निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राजेश पाताड़े, तालुकाध्यक्ष विलास गावकर, ग्राहक सरंक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे, शहर अध्यक्ष इम्रान शेख, युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, तालुका उपाध्यक्ष सागर वारंग, अमित केतकर, गणेश चौगुले, सचिन अडुळकर, सचिन सदडेकर, सत्यवान कानडे, धनंजय पाताड़े, दीपेश सावंत, अभय गावकर, अंकुश मेस्त्री, बाळू मेस्त्री, जहीर फकीर आदी उपस्थित होते.यावेळी निवासी नायब तहसिलदारांकडे राष्ट्रवादीच्यावतीने म्हणणे मांडताना अबिद नाईक म्हणाले, तालुक्या बरोबरच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. शासकीय रुग्णालयात औषध पुरवठा नाही. महागाई गगनाला भिडली आहे. गॅस, पेट्रोलच्या किंमतींसह रोजच्या वापरातील जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढतच चालले आहे. गुन्हेगारीही वाढत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली आहे.

रस्त्यांवरील खड्डे हे नेहमीचेच दुखणे बनले आहे. यासह विज समस्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा अनेक समस्या आहेत. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत आमच्या भावना शासन दरबारी पोहोचवाव्यात. नाहीतर येत्या काही दिवसात जनतेच्या समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या साथीने संघर्ष करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.तहसील कार्यालयात पोलिस बंदोबस्त !राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शासनाचा निषेध करीत कणकवली शहरातून मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिस प्रशासनाने जमाव बंदीचा आदेश असल्याचे कारण सांगून मोर्चाची परवानगी नाकारली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसिलदाराना निवेदन देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपनिरीक्षक सचिन नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात मंगळवारी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNCPराष्ट्रवादी काँग्रेस