शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शिवसेनेचे वस्त्रहरण करणार- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 21:00 IST

मालवण (सिंधुदुर्ग) : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पक्ष स्थापनेनंतरची पहिलीच जाहीर सभा कोल्हापूर येथे शुक्रवार ८ रोजी होत आहे.

मालवण (सिंधुदुर्ग) : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पक्ष स्थापनेनंतरची पहिलीच जाहीर सभा कोल्हापूर येथे शुक्रवार ८ रोजी होत आहे. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागून राहिले असतानाच सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर असलेल्या राणे यांनी गुरुवारी मालवण येथे कोल्हापूर येथील सभेत आपला शिवसेनेवर थेट निशाणा असणार असल्याचे स्पष्ट केले.शिवाय सत्तेत बसलेल्या रंग बदलू शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून अग्रलेख लिहिले. पक्षप्रमुखांनी ठिकठिकाणी सरकारविरोधी भाषणे ठोकली. मात्र सत्तेवर लाथ मारण्याची धमक त्यांच्यात नाही. त्यामुळे सत्तेसाठी लाचार असणा-या शिवसेनेचे वस्त्रहरण करणार असल्याचे सांगितले. मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार निलेश राणे, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, मंदार केणी, अशोक सावंत, संदीप कुडतरकर, सुदेश आचरेकर, बाबा परब, ममता वराडकर, मोहन वराडकर, महानंदा खानोलकर, सहदेव बापर्डेकर, संजय लुडबे, राजू परुळेकर, राजू बिडये, आबा हडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना सत्तेतून बाहेर पडायचे धाडस करत नसली तरी लवकरच १५ ते ३० आमदार बाहेर पडतील, असेही राणेंनी सांगत काँग्रेस पक्षातील आमदारही आता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ऐकत नसल्याचा हल्लाबोल केला.यावेळी राणे म्हणाले, १९९० साली मी आमदार झाल्यानतर देवबाग गावाला संरक्षक बंधारा बांधून दिला. मात्र या बंधा-याची दुरुस्ती तीन वर्षातील सत्ताधा-यांनी केली नाही. बंधा-याची डागडुजी करण्यात आली नसल्याने देवबाग येथील ग्रामस्थांच्या घरात पाणी घुसत आहेत. येथील मच्छीमार भयभीत झाले आहेत. याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांना सोयरसुतक नाही. याउलट ते देवबागला सीआरझेड लागू असल्याने बंधारा बांधून शकत नाही, असे अज्ञान प्रकट करून ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत.सीआरझेड भागात बंधारे बांधता येतात. त्यामुळे देवबाग गाव नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यातून वाचविण्यासाठी खाडी व समुद्रात बंधारा बांधणे आवश्यक असून, याबाबत परिपूर्ण प्रस्ताव बनवून शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच ओकी वादळातील नुकसानग्रस्त मच्छिमारांना नुकसान भरपाई मीच मिळवून देणार आहे.भ्रष्टाचार बोकाळलाय, बेकारी वाढलीमी मंत्री असताना जिल्ह्यात विविध विकास प्रकल्प आणले. मात्र तीन वर्षे झाल्यानंतर सत्ताधिकारी ते प्रकल्प सुरू करू शकले नाहीत. स्थानिक युवकांना हजारो नोक-या उपलब्ध करून देणारे सी-वर्ल्ड, विमानतळ, रेडीबंदर, दोडामार्ग एमआयडीसी आदी प्रकल्प ठप्प केल्याने जिल्ह्यात बेकारी वाढली आहे. विकासाचे व्हिजन नसलेल्या लोकप्रतिनिधी जनतेची विकासाच्या नावाने दिशाभूल करत आहे. स्वत:च कामे घ्यायची. ठेकेदाराकडून पैसे उकळायचे अशी कामे करून लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात विकासकामे ठप्प करून भ्रष्टाचार बोकाळलाय आहे. ओखी वादळातील नुकसानग्रस्त मच्छीमारांना पुरावे दाखवून नुकसानभरपाई देण्याची माहिती दिली. मात्र, मी मंत्री असताना फयानच्यावेळी नुकसानग्रस्तांना सरसकट मदत केली होती.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे kolhapurकोल्हापूर