शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

सावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा नारायण राणेकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 6:31 PM

कुडाळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत घेतला गेला नाही. उलट सभागृहात गदारोळ करण्यात आला. ...

ठळक मुद्देसावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा नारायण राणेकडून निषेधमुख्यमंत्र्यांना थंडी वाजत होती की लाज?

कुडाळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत घेतला गेला नाही. उलट सभागृहात गदारोळ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थंडी लागत होती की, त्यांना लाज वाटत होती? असा खडा सवाल माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या सावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा त्यांनी यावेळी जाहीर निषेध केला.लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.खासदार राणे म्हणाले, सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. दोन वेळा जन्मठेपेची शिक्षाही भोगली. अनेक वर्षे तुरुंगवासही भोगला. अशा राष्ट्रपुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत आमच्या भाजपाच्या आमदारांनी मांडला. मात्र, नियमात बसत नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव विधानसभेत येऊ दिला नाही. अशावेळी मुख्यमंत्री ठाकरे काय करीत होते? त्यांना थंडी वाजत होती की, लाज वाटत होती? सभागृहात सावरकरांच्या योगदानाएवढे कोणाचे योगदान आहे का? असे सवाल राणेंनी उपस्थित केले. खरेतर सभागृहात अनेक नियमात नसणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टींवर यापूर्वी अनेकदा चर्चा करण्यात आली. सावरकर यांच्याही अभिवादनाचा ठराव घेतला पाहिजे होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.मात्र शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्हीही पक्ष एकत्र आले ते राज्याच्या भल्यासाठी नाहीतर केवळ सत्तेसाठी व पैसे लाटण्यासाठी आले आहेत. यांना राष्ट्रपुरुषांबद्दल कोणतीही आस्था नाही, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.केवळ मासे कसे खायचे याची माहिती असणाऱ्या मत्स्यमंत्र्यांना मच्छिमारांचे प्रश्न, मासेमारी याबाबतचे प्रश्न माहीत नाहीत आणि ते मत्स्य दुष्काळ नाही असे जाहीर करतात, हे अत्यंत चुकीचे असून येथील मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.मागील साडेसोळा कोटी रुपयांची नुकसान भरपाई अजूनही हे सरकार मच्छिमारांना देऊ शकले नाहीत. मच्छिमारांचे प्रश्न या सरकारला माहीत नाहीत. मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे सरकारने केले आहे. आता मत्स्यदुष्काळ जाहीर करत नाही तोपर्यंत विरोधीपक्ष शांत बसणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला.उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची घोषणा फसवीशेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे ठणकावून सांगणारे मुख्यमंत्री ठाकरे कर्जमाफीची फक्त घोषणा करून शांत बसले आहेत. तर शेतकरी कर्जमाफी कधी मिळणार याची पाहताहेत वाट पाहत आहेत. पण उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची घोषणा फसवी आहे.राज्याची तिजोरी रिकामी असताना पर्यटन मंत्री निधी देणार असल्याची घोषणा कशाच्या आधारे करतात? घोषणा करण्यापूर्वी त्यांनी अर्थमंत्र्यांना तरी विचारले का? असाही सवाल राणेंनी उपस्थित करीत हे सरकार व ठाकरे काहीच करू शकत नाहीत, असा टोलाही लगावला.आता विमानतळ १ मे रोजी सुरू होतो का ते पाहणार आहे. जिल्ह्यातील प्रकल्प, विकासकामे बंदावस्थेत असून गेल्या पाच वर्षात खासदार विनायक राऊत यांनी एकही विकासकाम केले नाही. उलट ते ठेकेदारांजवळ पैसे मागत आहेत. म्हणूनच ठेकेदार पळवून जात असून राऊत ज्या ठेकेदारांजवळ पैसे मागताहेत त्याची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा राणेंनी राऊत यांना दिला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेsindhudurgसिंधुदुर्गVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर