शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

Narayan Rane: अर्थमंत्री येऊन पराभव करुन जातात, ही यांची अक्कल; नारायण राणेंचा अजित पवारांना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 16:33 IST

Narayan Rane: संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती.

सिंधुदुर्ग-

संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती. त्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. सिंधुदुर्ग मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज भाजपानं बाजी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत राणेंनी ठाकरे सरकार आणि अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

"सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक कायद्याचा आणि पोलिसांचा गैरवापर करुन जिंकण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलीस यंत्रणेला हाताळी बाळगून निवडणूक जिंकण्याचा मानस कोकणवासियांनी फोल ठरवला आहे. नितेश राणेंचा जामीन अर्ज चार चार दिवस कोर्टात चालतो. माझ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. इथं डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थमंत्री येऊन अक्कल काढतात आणि पक्षाचा पराभव करुन जातात", असा टोला नारायण राणे यांनी लगावला. 

"आम्ही अक्कल वापरुच निवडणूक जिंकली. जनतेनं पण अक्कल वापरुनच मतदान केलं आणि अक्कल असणाऱ्यांनाच सत्ता दिली. तर अक्कल नसलेल्यांचा पराभव झाला", असाही खोचक वार नारायण राणे यांनी अजित पवारांचं नाव न घेता केला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात आले होते. यावेळी त्यांनी बँक आणि संस्था चालवण्यासाठी, टिकवण्यासाठी अक्कल लागते, असं विधान केलं होतं. याच विधानाचा राणेंनी आज निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत समाचार घेतला. 

अमित शहांना सर्व रिपोर्ट देणारगेल्या चार दिवसांत कोकणात काय काय झालं. कसा सत्तेचा, कायद्याचा आणि पोलिसांचा गैरवापर केला गेला याची इत्यंभूत माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देणार असल्याचंही नारायण राणे यावेळी म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून जो काही प्रकार सुरू होता त्यातून महाविकास आघाडी सरकार किती अस्वस्थ आहे हेच दिसून येत होतं. अखेर आज त्यांना त्यांची जागा कळाली आहे, असंही राणे म्हणाले. 

राज्याला भाजपाचा मुख्यमंत्री हवाआता आमचं टार्गेट महाराष्ट्र सरकार, असं म्हणत नारायण राणे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, असं विधान केलं. सध्याचा कोरोना काळ, खुंटलेली आर्थिक प्रगती यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी चांगला मुख्यमंत्री आणि चांगलं सरकार गरजेचं आहे. आम्हाला आता भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, यांच्यासारखी 'लगान' टीम नको, असा टोला नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Ajit Pawarअजित पवारsindhudurgसिंधुदुर्ग