शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Narayan Rane: अर्थमंत्री येऊन पराभव करुन जातात, ही यांची अक्कल; नारायण राणेंचा अजित पवारांना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 16:33 IST

Narayan Rane: संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती.

सिंधुदुर्ग-

संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती. त्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. सिंधुदुर्ग मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज भाजपानं बाजी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत राणेंनी ठाकरे सरकार आणि अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

"सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक कायद्याचा आणि पोलिसांचा गैरवापर करुन जिंकण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलीस यंत्रणेला हाताळी बाळगून निवडणूक जिंकण्याचा मानस कोकणवासियांनी फोल ठरवला आहे. नितेश राणेंचा जामीन अर्ज चार चार दिवस कोर्टात चालतो. माझ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. इथं डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थमंत्री येऊन अक्कल काढतात आणि पक्षाचा पराभव करुन जातात", असा टोला नारायण राणे यांनी लगावला. 

"आम्ही अक्कल वापरुच निवडणूक जिंकली. जनतेनं पण अक्कल वापरुनच मतदान केलं आणि अक्कल असणाऱ्यांनाच सत्ता दिली. तर अक्कल नसलेल्यांचा पराभव झाला", असाही खोचक वार नारायण राणे यांनी अजित पवारांचं नाव न घेता केला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात आले होते. यावेळी त्यांनी बँक आणि संस्था चालवण्यासाठी, टिकवण्यासाठी अक्कल लागते, असं विधान केलं होतं. याच विधानाचा राणेंनी आज निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत समाचार घेतला. 

अमित शहांना सर्व रिपोर्ट देणारगेल्या चार दिवसांत कोकणात काय काय झालं. कसा सत्तेचा, कायद्याचा आणि पोलिसांचा गैरवापर केला गेला याची इत्यंभूत माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देणार असल्याचंही नारायण राणे यावेळी म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून जो काही प्रकार सुरू होता त्यातून महाविकास आघाडी सरकार किती अस्वस्थ आहे हेच दिसून येत होतं. अखेर आज त्यांना त्यांची जागा कळाली आहे, असंही राणे म्हणाले. 

राज्याला भाजपाचा मुख्यमंत्री हवाआता आमचं टार्गेट महाराष्ट्र सरकार, असं म्हणत नारायण राणे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, असं विधान केलं. सध्याचा कोरोना काळ, खुंटलेली आर्थिक प्रगती यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी चांगला मुख्यमंत्री आणि चांगलं सरकार गरजेचं आहे. आम्हाला आता भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, यांच्यासारखी 'लगान' टीम नको, असा टोला नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Ajit Pawarअजित पवारsindhudurgसिंधुदुर्ग