शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नाणार प्रकल्प होणार...; मालवण येथे भाजपच्या आनंद मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 12:17 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर पंचतारांकित हॉटेल होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

मालवण : महाराष्ट्र राज्यातील आमचे युतीचे सरकार कोकणाकडे विशेष लक्ष देणार आहे. यामुळेच काही दिवसांनी जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भरभरून तरतूद केली जाईल. कोकणातील बेरोजगारी दूर होण्यासाठी नाणार प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आयोजित आनंद मेळाव्यात केले. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला सुदृढ बनविणारा नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत आमचे सरकार साकारणार आहे. कोकणातील बेरोजगारी दूर करावयाची असल्यास नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणे गरजेचे आहे. हे स्वप्न आमचे सरकार पूर्ण करील. सिंधुदुर्गात चिपी विमानतळ साकारला याचे पूर्ण श्रेय नारायण राणे यांना दिले पाहिजे. आपण मुख्यमंत्री असताना या विमानतळातील त्रुटी दूर केल्या व हा प्रकल्प सुरू केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या विमानतळासाठी काहीही न करता विमानतळाचे दुसऱ्यांदा उद्घाटन मात्र केले. कोकणात क्यार वादळात कोट्यवधींचे नुकसान झाले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काहीही मदत दिली नाही. आपण मुख्यमंत्री असताना कोकणातील रस्ते, मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला. इथला काजू बोंड फुकट जात आहे. त्यावर प्रक्रिया उद्योग या जिल्ह्यात आणला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.मेळाव्यात केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

पंचतारांकित हॉटेल ! सिंधुदुर्ग जिल्ह्यात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर पंचतारांकित हॉटेल होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा