शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणुका सिंधुदुर्गात; आॅनलाईन अर्ज भरण्याची पद्धत चांगली - जे. एस. सहारिया  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 10:10 PM

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

कुडाळ : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. ते कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यात ४६ सरपंच व ९२६ ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे असे सांगत अर्ज भरण्यासाठी आॅनलाईनची पद्धत चांगली असल्याचे मत व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ आॅक्टोबरला ४२५ पैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी राज्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्त सहारिया व सचिव शेखर चन्ने सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. सोमवारी सायंकाळी एमआयडीसीच्या विश्रामगृहावर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राज्य निवडणूक सचिव चन्ने, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी व इतर अधिकारी उपस्थित होते.सहारिया म्हणाले, राज्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहेत. ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून दोन्हीही पदांसाठी एकूण ६ हजार ५०० उमेदवारी अर्ज आले होते. अर्ज छाननीनंतर सरपंचपदासाठी ८३७ व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ३ हजार ६६१ एवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत व चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे नियोजन व तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात पोलीस यंत्रणेमार्फत ४५ विभाग करण्यात आले असून २० ठिकाणी नाका तपासणी पथके सीसीटीव्ही यंत्रणेसहीत कार्यान्वित असणार आहेत. भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकता वाटल्यास भरारी पथके वाढविण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात येणारे रस्ते, रेल्वे, समुद्र्री व हवाई मार्ग या ठिकाणीही चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.निवडणुका जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत १०१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यामध्ये विविध ठिकाणी पकडलेल्या सुमारे ४६ लाख रुपयांच्या अवैध दारूच्या तसेच विनापरवाना शस्त्रास्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. ४६ सरपंच, ९२६ सदस्य बिनविरोध : सहारियानिवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सरपंचांपैकी ४६ सरपंच बिनविरोध झाल्याने २७९ सरपंचपदासाठी, तर ९२६ सदस्य बिनविरोध झाल्यामुळे १ हजार ७३५ ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे, असे सहारिया यांनी सांगितले. जिल्ह्यात ४ लाख २ हजार मतदार असून १ हजार २९ मतदान केंद्र्रांसाठी ६१९ इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्वात जास्त मतदान केंद्रे कणकवली तालुक्यात असल्याचेही सहारिया यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूक