शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

ही तर शिवसेनेकडून बेरोजगारांची थट्टाच : नितेश राणे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:43 IST

शिवसेनेने कणकवलीत आयोजित केलेला रोजगार मेळावा खासदार विनायक राऊत यांनी अचानक रद्द करून जिल्ह्यातील तरुणांची एकप्रकारे थट्टाच केली आहे. यानिमित्ताने शिवसेनेने बेरोजगारांची फसवणूक केली आहे. शिवसेनेच्या या फसव्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

ठळक मुद्देही तर शिवसेनेकडून बेरोजगारांची थट्टाच : नितेश राणे रोजगार मेळावा रद्द प्रकरणी नितेश यांची टीका

कणकवली : शिवसेनेने कणकवलीत आयोजित केलेला रोजगार मेळावा खासदार विनायक राऊत यांनी अचानक रद्द करून जिल्ह्यातील तरुणांची एकप्रकारे थट्टाच केली आहे. यानिमित्ताने शिवसेनेने बेरोजगारांची फसवणूक केली आहे. शिवसेनेच्या या फसव्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमान पक्ष कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सावंत , युवक स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, महेश लाड, कलमठ सरपंच देविका गुरव , जितेंद्र कांबळी, ग्रामपंचायत सदस्या हेलन कांबळी , संजीवनी पवार आदी उपस्थित होते.आमदार नितेश राणे म्हणाले, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सकाळी प्रसिद्धीमाध्यमांसमोर रोजगार मेळाव्याची घोषणा केली होती. तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रोजगार मेळाव्याच्या मंडप उभारणीचा नारळही फोडला होता. पण कंपन्यांनी नकार दिल्यामुळे रोजगार मेळावा रद्द करण्याची नामुष्की संध्याकाळी शिवसेनेवर ओढवली.एकीकडे शिवसेनेचे पदाधिकारी रोजगार मेळावा जाहीर करतात तर दुसरीकडे रद्द झालेल्या या मेळाव्याबद्दल बेरोजगारांची साधी दिलगिरीही व्यक्त करत नाहीत.याला काय म्हणावे ? असा प्रश्न आमदार राणे यांनी यावेळी उपस्थित केला.ते पुढे म्हणाले, खासदार राऊत यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांना सत्तेचा माज आला आहे. काहीही केले तरी आम्हालाच मते मिळणार अशा गुर्मीत शिवसेनावाले आहेत. ते जनतेला गृहीत धरीत आहेत. राज्याचे उद्योगमंत्री शिवसेनेचे असतानाही त्यांना रोजगार मेळावा रद्द करावा लागतो ही नामुष्की आहे. यातूनच खासदार राऊत यांची पात्रता जिल्हावासीयांना दिसून आली आहे. राणे कुटुंबियांवर फक्त टीका करून मातोश्रीच्या कृपेने आपली खासदारकी टिकवायची एवढेच काम ते करीत आहेत.मागील ५ वर्षांत विनायक राऊत यांनी रोजगाराभिमुख एकही प्रकल्प सिंधुदुर्गात आणलेला नाही. तसेच एखादा कारखाना किंवा प्रस्तावित असलेली दोडामार्ग आडाळी येथील एम.आय.डी.सी.ही ते आणू शकलेले नाहीत.

सिंधुदुर्गात शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार, आमदार असताना आणि त्यांना सत्ता देऊनही सिंधुदुर्गवासीयांना नेमके काय मिळाले ? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. मागे झालेल्या डंपर आंदोलनात कर्जात बुडालेल्या डंपर मालकांनाही शिवसेनेने वाऱ्यावर सोडले होते. त्यांना कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याने संरक्षण दिले नाही.खंबाटा प्रकरणात तर विनायक राऊत यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी तसेच न्याय मिळण्यासाठी कामगार इकडून तिकडे धावपळ करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता याचा हिशोब चुकता केल्याशिवाय रहाणार नाही. असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.नाणार रद्दचे श्रेय शिवसेनेने घेऊ नये!नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याचे श्रेय शिवसेनेने घेण्या अगोदर जैतापूर प्रकल्पाच्या बाबतीत काय झाले होते? याचा आधी विचार करावा. राजापूर तसेच देवगड तालुक्यातील ग्रामस्थांनी एकजूट दाखवून हा प्रकल्प रद्द करून घेतला आहे. तो कोणी रद्द केलेला नाही. या प्रकल्पासाठी जागा विनायक राऊत यांनीच सुचविली होती.

तसेच तेथील प्रकल्पबाधितांना योग्य प्रमाणात मोबदला मिळावा यासाठी आमदार राजन साळवी शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते. मग हा प्रकल्प कोणाला हवा होता हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे प्रकल्प रद्द होणे हा जनतेचा विजय आहे. त्याचे श्रेय शिवसेनेने घेऊ नये. असे यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले.आम्ही 'वेट अँड वॉच' च्या भूमिकेत !शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यापूर्वीही नाणार प्रकल्प रद्दची घोषणा केली होती. मात्र, त्यांनंतरही भूमिसंपादनाचे काम थांबले नव्हते. आताही तसेच होऊ शकते. एन्रॉनप्रकल्पासारखेही परत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनतेने विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न आहे. आम्हीही 'वेट अँड वॉच' च्या भूमिकेत आहोत. नाणारसाठी घेतलेल्या जमिनीवरील शेरा उठला पाहिजे.तरच प्रकल्प खऱ्या अर्थाने रद्द झाला असे म्हणता येईल.असेही नितेश राणे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग