शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वीज बिलांबाबत मनसे खळखट्याक आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 13:29 IST

sindhudurg, mahavitaran, mns, kankavli सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज बिल माफी करणार अशी घोषणा करून ऐनवेळी जनतेची फसवणूक राज्यकर्त्यांनी केली आहे. त्याविरोधात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अल्टीमेटम सरकारला दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे आदेश देतील त्यानुसार जिल्ह्यात आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे वीज बिलांबाबत मनसे खळखट्याक आंदोलन छेडणार जनतेच्या प्रश्नांसाठी राज ठाकरेंच्या आदेशानुसार होणार आंदोलन : उपरकर

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज बिल माफी करणार अशी घोषणा करून ऐनवेळी जनतेची फसवणूक राज्यकर्त्यांनी केली आहे. त्याविरोधात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अल्टीमेटम सरकारला दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे आदेश देतील त्यानुसार जिल्ह्यात आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.ते म्हणाले, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांबाबत निवेदन दिल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे येत्या काळात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर जनतेच्या प्रश्नांसाठी मनसे खळखट्याक आंदोलन छेडणार आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शैलेश अंधारी, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, विनोद सांडव, सुनील गवस, चंदन तेली, सनी बागकर, विनायक गावडे, राजू गुरव आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक कणकवलीत झाली. त्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सरकारला सोमवारपर्यंत राज ठाकरे यांनी अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर मोर्चा किंवा अन्य आंदोलन केले जाईल. हे वीज बिल माफी आंदोलन जनतेला घेऊन केले जाईल.सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना निवेदन दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. गोवा बनावटीची दारू, मटका, जुगार, अवैध गुटखा विक्री होत आहे. त्यावर निवेदन देऊनही ते चालूच आहेत.मोठ्या प्रमाणात होतेय अवैध वाळू वाहतूकगोवा बनावटीच्या दारुची विक्री करणाऱ्यांना पोलीस साथ देत आहेत. तसेच अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. गोव्यात ओव्हरलोड वाळू वाहतूक होत आहे. यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी व आरटीओ यांना भेटून ओव्हरलोड वाळू गोव्यात जाते कशी? सीसीटीव्ही लावले आहेत त्याठिकाणी तपासणी का होत नाही? दारू आणि गुटख्याची मुख्य सेंटर बांद्यात आहेत. त्याबाबत आम्ही आवाज उठवित आहोत. पोलिसांनी कारवाई न केल्यास मनसेचे कार्यकर्ते धाडी टाकतील, असा इशाराही परशुराम उपरकर यांनी यावेळी दिला.

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरणKankavliकणकवली