शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कंपनीची मेहरबानी नाही, ओसरगाव टोल माफीवरुन मनसे नेते परशुराम उपरकरांनी दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 17:29 IST

कंपनीच्या मेहरबानीचे पत्र जे आमदार दाखवतात ,त्यांच्याच मतदारसंघातील जनतेला या टोलचा सर्वाधिक भुर्दंड

सुधीर राणे

कणकवली: सिंधुदुर्ग मधील जनतेला ओसरगाव येथील टोल नाक्यावरून टोल माफी देण्याचे पत्र जिल्हाधिकारी किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने द्यायला हवे. स्थानिक आमदारांकडून टोल वसुलीचा ठेका घेतलेल्या ठेकेदार कंपनीकडून गणेशोत्सव कालावधीत टोल माफी मिळवून दिल्याचे भासविले जात आहे. तर दुसरीकडे टोल वसुलीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत असल्याचेही दिसत आहे. जिल्ह्यातील जनतेने याचा निषेध करायला हवा. अशा प्रकारे टोल वसुली सुरू झाल्यास मनसे आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा इशारा मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.याबाबत उपरकरांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ज्या ठेकेदार कंपनीकडून स्थानिक आमदार पत्र घेत गणेशोत्सव कालावधीत कंपनी एम एच ०७ च्या सफेद नंबर प्लेट असलेल्या गाड्यांना टोल माफी देत मेहरबानी करत असल्याचे भासवत आहेत. मुळात संबंधित कंपनीला तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हा ठेका देण्यात आला होते. त्याची मुदत आठवड्याभराने संपणार आहे. आठवड्याभरात मुदत संपत असताना गणेशोत्सव कालावधीत टोल माफी देत असल्याचे कंपनीचे म्हणणे व स्थानिक आमदारांचा त्याला दुजोरा हे संशयास्पद आहे. मुळात राज्यभरातील टोलनाक्यांवर गणेशोत्सव कालावधीत कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफी मिळते ती राज्य सरकारकडून, त्यात कुठल्याही कंपनीची मेहरबानी नाही.पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील चाळकवाडी येथे असलेल्या टोल नाक्यावरून स्थानिक वाहनांसाठी पूर्णतः टोल फ्रीचे आदेश तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. अशाच प्रकारे ओसरगाव येथील टोलनाक्यावर सिंधुदुर्ग मधील जनतेला टोल माफी मिळायलाच हवी अशी आमची मागणी आहे. कंपनीच्या मेहरबानीचे पत्र जे आमदार दाखवतात ,त्यांच्याच मतदारसंघातील जनतेला या टोलचा सर्वाधिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. असे असतानाही हे आमदार कंपनीच्या बाजूने असल्याचे दाखवून मतदार संघातील व जिल्ह्यातील जनतेचा विश्वासघात करत आहेत. अशांना जनतेने योग्य जागा दाखवण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर अशा प्रकारे टोल वसुली सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास मनसे गप्प बसणार नाही असेही परशुराम उपरकरांनी म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाकाMNSमनसे