शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महिलेवर सामूहिक अत्याचार : सबळ पुराव्याअभावी पाचजण निर्दोष मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 7:27 PM

एका महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणातून कणकवली येथील कृष्णा उर्फ बंड्या नाईक, रमेश पावसकर, वैभव मालंडकर, स्वप्नील पाटील आणि मयूर चव्हाण या पाचही जणांना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे.

ठळक मुद्देमहिलेवर सामूहिक अत्याचार : पाचजण निर्दोष मुक्तकणकवली तालुक्यातील प्रकरण

सिंधुदुर्गनगरी : एका महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणातून कणकवली येथील कृष्णा उर्फ बंड्या नाईक, रमेश पावसकर, वैभव मालंडकर, स्वप्नील पाटील आणि मयूर चव्हाण या पाचही जणांना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे.तक्रारदार व तिची मुलगी ही कणकवली तालुक्यातील एका गावात ज्या खोलीत भाड्याने राहत होती ती खोली खाली करण्यास मालकाने सांगितल्याने १५ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ८ वाजता तक्रारदार आणि तिचा मित्र कणकवली शहरात भाड्याने खोली पाहण्यास फिरत होते. ते कणकवली एसटी स्टँड येथे आले असता तक्रारदाराच्या मोबाईलवर कृष्णा उर्फ बंड्या नाईक (४०, रा. बिजलीनगर, कणकवली) याचा फोन आला आणि तुमची काय अडचण आहे असे त्यांना विचारले. यावेळी त्यांनी आपली आई आजारी असून आपल्याला पाच हजार रुपयांची गरज आहे असे सांगितले. यावर कृष्णा याने पैसे देण्यास आपण तयार आहोत, पण आपल्यासोबत यावे लागेल असे सांगितले. त्यानंतर रमेश विष्णू पावसकर (३६, रा. कलमठ बाजारपेठ) याने आपल्या दुचाकीवरून तक्रारदार हिला शहरातील हॉटेलमागे एका घरामध्ये घेऊन गेला आणि संशयित आरोपी कृष्णा व रमेश यांनी तक्रारदारावर बलात्कार केला.त्यानंतर १८ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार व तिचा मित्र साक्षीदार हे जेवण करून चालत असताना वैभव चंद्रकांत मालंडकर (२८, रा. कांबळेगल्ली कणकवली), स्वप्नील सुभाष पाटील (३२, रा. परबवाडी, कणकवली) आणि मयूर विश्वनाथ चव्हाण (३१, रा. बाजारपेठ, कणकवली) या तिघांनी चारचाकी गाडी घेऊन तक्रारदार व साक्षीदार यांना या गाडीमध्ये जबरदस्तीने बसविले आणि बराच वेळ शहरात फिरविले.त्यानंतर मुडेडोंगरी येथे नेऊन तक्रारदार महिलेवर बलात्कार केला व कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार त्याच रात्री तक्रारदार महिलेने कणकवली पोलीस स्थानकात दिली होती.चौदा साक्षीदार तपासलेया तक्रारीनुसार पोलिसांनी पाचही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून या पाचही जणांना रात्रीच ताब्यात घेतले होते. या पाचही जणांना प्रथम पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी होऊन हे सध्या जामिनावर मुक्त होते. या प्रकरणाची सुनावणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात पार पडली. यामध्ये एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र साक्षीदारांच्या साक्षीमधील तफावत तसेच ठोस वैद्यकीय पुरावा नसणे आदींमध्ये या पाचही जणांना संशयाचा फायदा देत न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. याप्रकरणी संशयितांच्यावतीने वकील संग्राम देसाई, उमेश सावंत, अश्पाक शेख, सुहास साटम यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयsindhudurgसिंधुदुर्ग