शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवतेय : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:02 IST

: मराठा समाजाला शासन आरक्षण देवू शकते. मात्र, तसे न करता आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजातील तरुणांवर विनाकारण 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवत आहे. असा आरोप कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.

ठळक मुद्देमराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवतेय  : नीतेश राणेआर्थिक निकषावर आरक्षण देणे संविधान विरोधी !

कणकवली : मराठा समाजाला शासन आरक्षण देवू शकते. मात्र, तसे न करता आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजातील तरुणांवर विनाकारण 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवत आहे. असा आरोप कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नीतेश राणे म्हणाले, शासनाने मराठा समाजाचे आंदोलन शांत करायचे सोडून पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही सुरु केली आहे. 307 सारखे गुन्हे दाखल करून तरुणांचे भविष्य संपविले जात आहे. हे खपवून घेतले जाणार नाही.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विविध मार्ग माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले आहेत. त्यानुसार आरक्षण देता येईल. शासनाने त्या मार्गाचा अवलंब करावा.राज्य शासनाकडे सर्व ताकद आहे. त्यामुळे त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली जरी असली तरी इच्छा शक्तिचा वापर करून तत्काळ निर्णय घ्यावा. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात तातडीने प्रतिज्ञा पत्र सादर करावे. तसेच न्यायालयात हा दावा कसा चालेल व लवकर निर्णय कसा लागेल हे पहावे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निकाली निघू शकेल.मराठा आरक्षणासाठी सिंधुदुर्गात गुरुवारी बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनात पोलिसांनी काही तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री हे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांच्या अखत्यारित पोलीस खाते येते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल होत असताना तरी त्यांनी हस्तक्षेप करावा. जनतेचे नाही पण स्वतःच्या पक्षाचे तरी भले करावे.असा टोलाही आमदार नीतेश राणे यांनी यावेळी लगावला.आर्थिक निकषावर आरक्षण देणे संविधान विरोधी !आर्थिक निकषावर आरक्षण देणे ही बाब संविधानाच्या विरोधात होईल. त्यासाठी संविधान बदलावे लागेल. त्यामुळे शासनाने जर असा आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर ते संविधानाला मानत नाहीत असा त्याचा अर्थ होईल. असेही आमदार राणे यावेळी म्हणाले.आमदारानी मैदान सोडु नये !मराठा आरक्षणासाठी काही आमदार राजीनामा देत आहेत. मात्र, त्यानी असे करु नये. राजीनामा देवून आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कुठल्याच आमदारानी आता मैदान सोडून जावू नये. धनगर, मुस्लिम , मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सभागृहात लढा द्यावा लागेल.

यावेळी जर संबधित समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आमदारच विधिमंडळात नसतील तर त्या समाजाची बाजू कोण मांडणार ? ही बाब या आमदारानी लक्षात घ्यावी आणि सभागृहात आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करावा .असे आमदार नीतेश राणे यावेळी म्हणाले.अरेरावी सहन करणार नाही !मराठा आंदोलना दरम्यान पोलिस जर आन्दोलकांशी अरेरावी करत असतील . तसेच अधिकारी आमदारानाही किंमत देत नसतील तर ही अरेरावी कुठल्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. शासनाला याबाबत अधिवेशनात निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल. असे आमदार राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग