शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
4
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
5
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
6
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
7
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
8
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
9
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
11
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
12
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
13
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
14
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
15
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
16
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
17
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
19
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...

Maratha Kranti Morcha : मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवतेय : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:02 IST

: मराठा समाजाला शासन आरक्षण देवू शकते. मात्र, तसे न करता आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजातील तरुणांवर विनाकारण 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवत आहे. असा आरोप कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.

ठळक मुद्देमराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवतेय  : नीतेश राणेआर्थिक निकषावर आरक्षण देणे संविधान विरोधी !

कणकवली : मराठा समाजाला शासन आरक्षण देवू शकते. मात्र, तसे न करता आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजातील तरुणांवर विनाकारण 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवत आहे. असा आरोप कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नीतेश राणे म्हणाले, शासनाने मराठा समाजाचे आंदोलन शांत करायचे सोडून पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही सुरु केली आहे. 307 सारखे गुन्हे दाखल करून तरुणांचे भविष्य संपविले जात आहे. हे खपवून घेतले जाणार नाही.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विविध मार्ग माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले आहेत. त्यानुसार आरक्षण देता येईल. शासनाने त्या मार्गाचा अवलंब करावा.राज्य शासनाकडे सर्व ताकद आहे. त्यामुळे त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली जरी असली तरी इच्छा शक्तिचा वापर करून तत्काळ निर्णय घ्यावा. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात तातडीने प्रतिज्ञा पत्र सादर करावे. तसेच न्यायालयात हा दावा कसा चालेल व लवकर निर्णय कसा लागेल हे पहावे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निकाली निघू शकेल.मराठा आरक्षणासाठी सिंधुदुर्गात गुरुवारी बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनात पोलिसांनी काही तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री हे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांच्या अखत्यारित पोलीस खाते येते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल होत असताना तरी त्यांनी हस्तक्षेप करावा. जनतेचे नाही पण स्वतःच्या पक्षाचे तरी भले करावे.असा टोलाही आमदार नीतेश राणे यांनी यावेळी लगावला.आर्थिक निकषावर आरक्षण देणे संविधान विरोधी !आर्थिक निकषावर आरक्षण देणे ही बाब संविधानाच्या विरोधात होईल. त्यासाठी संविधान बदलावे लागेल. त्यामुळे शासनाने जर असा आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर ते संविधानाला मानत नाहीत असा त्याचा अर्थ होईल. असेही आमदार राणे यावेळी म्हणाले.आमदारानी मैदान सोडु नये !मराठा आरक्षणासाठी काही आमदार राजीनामा देत आहेत. मात्र, त्यानी असे करु नये. राजीनामा देवून आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कुठल्याच आमदारानी आता मैदान सोडून जावू नये. धनगर, मुस्लिम , मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सभागृहात लढा द्यावा लागेल.

यावेळी जर संबधित समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आमदारच विधिमंडळात नसतील तर त्या समाजाची बाजू कोण मांडणार ? ही बाब या आमदारानी लक्षात घ्यावी आणि सभागृहात आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करावा .असे आमदार नीतेश राणे यावेळी म्हणाले.अरेरावी सहन करणार नाही !मराठा आंदोलना दरम्यान पोलिस जर आन्दोलकांशी अरेरावी करत असतील . तसेच अधिकारी आमदारानाही किंमत देत नसतील तर ही अरेरावी कुठल्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. शासनाला याबाबत अधिवेशनात निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल. असे आमदार राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग