शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

आंबा हंगामावर पावसाचे पाणी, शेतकरी-बागायतदार अडचणीत; दर घसरले कर्जाचे हप्ते फेडायचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 19:16 IST

मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका आंबा व्यवसायाला बसला होता. त्या काळात आंबा व्यावसायिकांनी विक्रीचे नवनवीन प्रयोग करून त्यातून कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांच्या नाकीदम आणले.

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसात बदललेल्या नैसर्गिक वातावरणाचा फटका मोठ्या प्रमाणावर सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरूवारी रात्री जिल्ह्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या आंब्याच्या हंगामावर पाणी पडले आहे.गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्यात अवकाळी पाउस पडला आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळून पडलेला अवकाळी पाऊस हा डोकेदुखी ठरतो. गेल्या वर्षभरात पावसाळ्याचे चार महिने वगळून प्रत्येक महिन्यात थोडा तरी अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे त्याचा फटका शेतकरी, बागायतदारांना बसला आहे.

आंबा डागळला, दरही उतरणार

जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून आंबा हंगामाला सुरूवात होते. यावर्षी अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता त्यामुळे थंडीही लांबली होती. परिणामी आंबा हंगाम उशिराने म्हणजे एप्रिल, मे महिन्यातच सुरू होणार हे निश्चित होते. मात्र, मार्च महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे त्याचा परिणाम आंब्याच्या फळांवर झाला आणि आता आंबा मोठ्या प्रमाणावर डागळला आहे. त्यामुळे सध्या आंब्याचे दरही घसरले आहेत.

कर्जाचे हप्ते कसे फेडायचे ?मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका आंबा व्यवसायाला बसला होता. त्या काळात आंबा व्यावसायिकांनी विक्रीचे नवनवीन प्रयोग करून त्यातून कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांच्या नाकीदम आणले. आंब्याचे फळच खराब झाल्यामुळे आता व्यवसाय कसा होणार? आणि बँकांच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न व्यावसायिकांना सतावत आहे.

शासनाने मदत करण्याची मागणी 

शासनाने आंबा, काजू बागायतदारांना आर्थिक मदत करावी आणि नैसर्गिक आपत्तीमधून वर काढण्यासाठी हातभार लावावा, अशी मागणी आंबा आणि काजू व्यावसायिकांमध्ये होत आहे. हे कोकणातील दोन महत्वाची उत्पन्नाची साधने आहेत. मात्र, तीच साधने निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून गेली आहेत. -प्रा. राजेंद्र मुंबरकर, फळ अभ्यासक, सिंधुदुर्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरीMangoआंबा