शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

आंबा हंगामावर पावसाचे पाणी, शेतकरी-बागायतदार अडचणीत; दर घसरले कर्जाचे हप्ते फेडायचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 19:16 IST

मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका आंबा व्यवसायाला बसला होता. त्या काळात आंबा व्यावसायिकांनी विक्रीचे नवनवीन प्रयोग करून त्यातून कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांच्या नाकीदम आणले.

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसात बदललेल्या नैसर्गिक वातावरणाचा फटका मोठ्या प्रमाणावर सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरूवारी रात्री जिल्ह्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या आंब्याच्या हंगामावर पाणी पडले आहे.गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्यात अवकाळी पाउस पडला आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळून पडलेला अवकाळी पाऊस हा डोकेदुखी ठरतो. गेल्या वर्षभरात पावसाळ्याचे चार महिने वगळून प्रत्येक महिन्यात थोडा तरी अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे त्याचा फटका शेतकरी, बागायतदारांना बसला आहे.

आंबा डागळला, दरही उतरणार

जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून आंबा हंगामाला सुरूवात होते. यावर्षी अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता त्यामुळे थंडीही लांबली होती. परिणामी आंबा हंगाम उशिराने म्हणजे एप्रिल, मे महिन्यातच सुरू होणार हे निश्चित होते. मात्र, मार्च महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे त्याचा परिणाम आंब्याच्या फळांवर झाला आणि आता आंबा मोठ्या प्रमाणावर डागळला आहे. त्यामुळे सध्या आंब्याचे दरही घसरले आहेत.

कर्जाचे हप्ते कसे फेडायचे ?मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका आंबा व्यवसायाला बसला होता. त्या काळात आंबा व्यावसायिकांनी विक्रीचे नवनवीन प्रयोग करून त्यातून कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांच्या नाकीदम आणले. आंब्याचे फळच खराब झाल्यामुळे आता व्यवसाय कसा होणार? आणि बँकांच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न व्यावसायिकांना सतावत आहे.

शासनाने मदत करण्याची मागणी 

शासनाने आंबा, काजू बागायतदारांना आर्थिक मदत करावी आणि नैसर्गिक आपत्तीमधून वर काढण्यासाठी हातभार लावावा, अशी मागणी आंबा आणि काजू व्यावसायिकांमध्ये होत आहे. हे कोकणातील दोन महत्वाची उत्पन्नाची साधने आहेत. मात्र, तीच साधने निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून गेली आहेत. -प्रा. राजेंद्र मुंबरकर, फळ अभ्यासक, सिंधुदुर्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरीMangoआंबा