शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आंबा हंगामावर पावसाचे पाणी, शेतकरी-बागायतदार अडचणीत; दर घसरले कर्जाचे हप्ते फेडायचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 19:16 IST

मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका आंबा व्यवसायाला बसला होता. त्या काळात आंबा व्यावसायिकांनी विक्रीचे नवनवीन प्रयोग करून त्यातून कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांच्या नाकीदम आणले.

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसात बदललेल्या नैसर्गिक वातावरणाचा फटका मोठ्या प्रमाणावर सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरूवारी रात्री जिल्ह्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या आंब्याच्या हंगामावर पाणी पडले आहे.गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्यात अवकाळी पाउस पडला आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळून पडलेला अवकाळी पाऊस हा डोकेदुखी ठरतो. गेल्या वर्षभरात पावसाळ्याचे चार महिने वगळून प्रत्येक महिन्यात थोडा तरी अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे त्याचा फटका शेतकरी, बागायतदारांना बसला आहे.

आंबा डागळला, दरही उतरणार

जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून आंबा हंगामाला सुरूवात होते. यावर्षी अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता त्यामुळे थंडीही लांबली होती. परिणामी आंबा हंगाम उशिराने म्हणजे एप्रिल, मे महिन्यातच सुरू होणार हे निश्चित होते. मात्र, मार्च महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे त्याचा परिणाम आंब्याच्या फळांवर झाला आणि आता आंबा मोठ्या प्रमाणावर डागळला आहे. त्यामुळे सध्या आंब्याचे दरही घसरले आहेत.

कर्जाचे हप्ते कसे फेडायचे ?मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका आंबा व्यवसायाला बसला होता. त्या काळात आंबा व्यावसायिकांनी विक्रीचे नवनवीन प्रयोग करून त्यातून कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांच्या नाकीदम आणले. आंब्याचे फळच खराब झाल्यामुळे आता व्यवसाय कसा होणार? आणि बँकांच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न व्यावसायिकांना सतावत आहे.

शासनाने मदत करण्याची मागणी 

शासनाने आंबा, काजू बागायतदारांना आर्थिक मदत करावी आणि नैसर्गिक आपत्तीमधून वर काढण्यासाठी हातभार लावावा, अशी मागणी आंबा आणि काजू व्यावसायिकांमध्ये होत आहे. हे कोकणातील दोन महत्वाची उत्पन्नाची साधने आहेत. मात्र, तीच साधने निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून गेली आहेत. -प्रा. राजेंद्र मुंबरकर, फळ अभ्यासक, सिंधुदुर्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरीMangoआंबा