शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
3
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
4
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
5
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
6
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
7
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
8
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
9
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
10
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
11
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
12
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
13
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
14
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
15
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
16
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
17
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
18
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
19
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
20
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरात आंब्याचा हंगाम लांबणीवर?

By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST

दुसरीकडे पहाटेच्या दरम्यान वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होत असून, सकाळी दाट धुके पसरल्याचेही पहावयास मिळत आहे.

मार्लेश्वर : सगळीकडे नवरात्रोत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरु होता तेव्हा संगमेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. सद्यस्थितीला तालुक्यात मळभी वातावरणामुळे भातपीक धोक्यात आले असतानाच या वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसण्याची शक्यता असून, यावर्षी आंब्याचा हंगाम लांबणीवर पडण्याची भिती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.तालुक्यात आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीच्या पावसाने थैमान घातले होते. या मुसळधार पडलेल्या पावसाने तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले होते. आताही या पावसाने आपला पवित्रा कायम ठेवला असून, सायंकाळच्या दरम्यान पाऊस बरसायला सुरुवात होत आहे. त्यामुळे सायंकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. भातपीक कापणी झाली आहे. परंतु, पाऊस केव्हाही पडत असल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून नेतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे पहाटेच्या दरम्यान वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होत असून, सकाळी दाट धुके पसरल्याचेही पहावयास मिळत आहे. दरवर्षी आॅक्टोबर हीट सुरु झाली की, पाऊस जाऊन थंडीला सुरुवात होते. याच काळात आंब्याला पालवी धरु लागते. यावर्षी म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे अजून आंब्याला पालवी धरण्यासही सुरुवात झालेली नाही.आंब्याला एकदा का पालवी धरली की ती जुन होण्यास साधारणपणे ५५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. जून - जुलैमध्ये बागायतदार आंबा कलमांना खते घालतात. तर कलमांना लवकर फळ लागवड व्हावी यासाठी कल्टारचा वापर केला जातो. यावर्षी पावसाच्या अनियमीततेमुळे बागायतदारांनी कल्टारचा वापर केलेला नाही. तसेच घातलेली खतेही कलमांना लागू पडलेली नाहीत. परिणामी बागायतदार चिंतेत सापडले आहेत.यावर्षी पालवीचे प्रमाण कमी असल्याने ती येणार कधी? ती वाढून जुनी कधी होणार? व मोहोर कधी येणार? असे प्रश्न बागायतदारांना पडले आहेत. पालवी जुनी झाल्याशिवाय कलमांना मोहोर येत नाही. (वार्ताहर)गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरुवात झाली होती व जानेवारीमध्ये कलमे फळांनी बहरली होती. यंदा मात्र मोठी समस्या निर्माण झाली आहे.