शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मालवण पर्यटकांनी फुलले, हजारोंची गर्दी, सलग सुट्यांमुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीला सर्वाधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 16:06 IST

सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत.

- महेश सरनाईक सिंधुदुर्ग - सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. गेले दोन दिवस शेकडो वाहनांनी मालवण व्यापून गेलेय. परिणामी वाहतूक कोंडीची समस्याही जाणवत आहे.समुद्रकाठचे पर्यटन आता देशभरासह परदेशातही आघाडीवर आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटरच्या किनारपट्टीवर प्रत्येक बिच लोभसवाणे आहे. त्यामुळे या भागात एकदा आलेला पर्यटक आपण स्वतःच पुढच्या आपल्या दौऱ्यात आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना घेऊन यायचं प्लॅन करतो आणि दौऱ्यावर आल्यावर पुढच्या दौऱ्याचे नियोजन केले जाते.तारकर्ली, देवबागाला सर्वाधिक पसंतीपर्यटनात मालवणचे नाव घेतलं की तारकर्ली आणि देवबाग या जोडगोळीचे नाव पुढे येणारच. कारण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे पर्यटक निवास बांधले आहेत. तर स्थानिक तरुण आणि उद्योजकांनी घर तेथे जेवण, राहण्याची व्यवस्था करत पर्यटकांसाठी कमी पैसात समुद्र सान्निध्यात राहण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने पर्यटक या भागाला पसंती देत आहेत.ऑनलाईन बुकिंगला पसंतीसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत आगाऊ बुकिंग केले आहे. अचानक मालवणच्या दौऱ्याचा बेत आखाला तर राहण्यासाठी हॉटेल्स मिळणे कठीण आहे.पर्यटन वाढले, अपेक्षाही वाढल्याफेसाळणाऱ्या लाटा आणि नयनरम्य किनारा अनुभवण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी मालवण किनारपट्टीवर भेट देत आहेत. सिंधुदुर्गात पर्यटकांचा ओढा विचारात घेता स्थानिकांनी शासनाच्या योजनांची वाट न बघता पर्यटन व्यवसायातून रोजगार निर्मितीवर भर देत पदरचे पैसे घालून मोठ्या दिलाने पर्यटन व्यवसाय उभा केला. त्यानंतर प्रत्येक वर्षी व्यापकता वाढत गेली. पर्यटन वाढले, पर्यटकांच्या अपेक्षाही वाढल्या.सिंधुदुर्ग पर्यटनाची पंढरीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वेगळाच आनंद देऊन जाते. येथे असलेली जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण खाद्यसंस्कृती, लोककला आदींची भुरळ पर्यटकांना नेहमीच पडते. पर्यटकांना नानातऱ्हेचे साहसी खेळ उपलब्ध करून स्थानिकांनी पर्यटकांशी नाते निर्माण केले. यातूनच दरवर्षी पर्यटन बहरत आहे. पर्यटकांनी मालवणसह, वेंगुर्ले आणि देवगड तालुक्याला पसंती दिल्याने पर्यटनाच्या बाबतीत सिंधुदुर्ग राज्यात प्रथम क्रमांकांचा जिल्हा ठरत आहे.

टॅग्स :tourismपर्यटनMalvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण