शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मालवण पर्यटकांनी फुलले, हजारोंची गर्दी, सलग सुट्यांमुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीला सर्वाधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 16:06 IST

सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत.

- महेश सरनाईक सिंधुदुर्ग - सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. गेले दोन दिवस शेकडो वाहनांनी मालवण व्यापून गेलेय. परिणामी वाहतूक कोंडीची समस्याही जाणवत आहे.समुद्रकाठचे पर्यटन आता देशभरासह परदेशातही आघाडीवर आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटरच्या किनारपट्टीवर प्रत्येक बिच लोभसवाणे आहे. त्यामुळे या भागात एकदा आलेला पर्यटक आपण स्वतःच पुढच्या आपल्या दौऱ्यात आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना घेऊन यायचं प्लॅन करतो आणि दौऱ्यावर आल्यावर पुढच्या दौऱ्याचे नियोजन केले जाते.तारकर्ली, देवबागाला सर्वाधिक पसंतीपर्यटनात मालवणचे नाव घेतलं की तारकर्ली आणि देवबाग या जोडगोळीचे नाव पुढे येणारच. कारण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे पर्यटक निवास बांधले आहेत. तर स्थानिक तरुण आणि उद्योजकांनी घर तेथे जेवण, राहण्याची व्यवस्था करत पर्यटकांसाठी कमी पैसात समुद्र सान्निध्यात राहण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने पर्यटक या भागाला पसंती देत आहेत.ऑनलाईन बुकिंगला पसंतीसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत आगाऊ बुकिंग केले आहे. अचानक मालवणच्या दौऱ्याचा बेत आखाला तर राहण्यासाठी हॉटेल्स मिळणे कठीण आहे.पर्यटन वाढले, अपेक्षाही वाढल्याफेसाळणाऱ्या लाटा आणि नयनरम्य किनारा अनुभवण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी मालवण किनारपट्टीवर भेट देत आहेत. सिंधुदुर्गात पर्यटकांचा ओढा विचारात घेता स्थानिकांनी शासनाच्या योजनांची वाट न बघता पर्यटन व्यवसायातून रोजगार निर्मितीवर भर देत पदरचे पैसे घालून मोठ्या दिलाने पर्यटन व्यवसाय उभा केला. त्यानंतर प्रत्येक वर्षी व्यापकता वाढत गेली. पर्यटन वाढले, पर्यटकांच्या अपेक्षाही वाढल्या.सिंधुदुर्ग पर्यटनाची पंढरीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वेगळाच आनंद देऊन जाते. येथे असलेली जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण खाद्यसंस्कृती, लोककला आदींची भुरळ पर्यटकांना नेहमीच पडते. पर्यटकांना नानातऱ्हेचे साहसी खेळ उपलब्ध करून स्थानिकांनी पर्यटकांशी नाते निर्माण केले. यातूनच दरवर्षी पर्यटन बहरत आहे. पर्यटकांनी मालवणसह, वेंगुर्ले आणि देवगड तालुक्याला पसंती दिल्याने पर्यटनाच्या बाबतीत सिंधुदुर्ग राज्यात प्रथम क्रमांकांचा जिल्हा ठरत आहे.

टॅग्स :tourismपर्यटनMalvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण