शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
4
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
5
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
6
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
7
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
8
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
9
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
10
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
11
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
12
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
13
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
14
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
15
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

महायुती भक्कम, आरोप-प्रत्यारोप फक्त निवडणुकीपुरते - रवींद्र चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:15 IST

लवकरच महायुतीतील नेते भूमिका ठरवणार

सावंतवाडी : निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. हे निवडणुकीत होणे स्वाभाविक आहे. पण आता राज्यातील व केंद्रातील सरकार योग्य पद्धतीने चालले पाहिजे. अलीकडेच महायुतीतील नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले. त्यांनी घडलेल्या घटनांवर पडदा टाकला पाहिजे. आता विषय जास्त वाढवू नये, असे त्यांचे मत आहे. आम्हीही याच मताचे असून, या सर्व घटनांवर पडदा टाकला जाणार आहे. लवकरच नागपूर अधिवेशनादरम्यान महायुतीतील नेते एकत्र बसून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले.ते शुक्रवारी सावंतवाडीत आले असता येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सावंतवाडीतील धुमश्चक्रीवर निवडणुकीत असे प्रकार घडत असतात. त्यामुळे निवडणुका संपल्यावर हे सगळे विसरून गेले पाहिजे, असे स्पष्ट केले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम सावंत भोसले, रवींद्र मडगावकर, मनोज नाईक, भाजप युवा नेते विशाल परब, श्रद्धा भोसले, बबन साळगावकर, ॲड. अनिल निरवडेकर, सुधीर आडिवरेकर, नीलम नाईक, दीपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, मोहिनी मडगावकर, आनंद नेवगी, राजू बेग, रूजुल पाटणकर, मेहरून शेख, प्रतीक बांदेकर उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वर्षभरात मोठ्या प्रमाणात विकास केला असून, या विकासकामांची माहिती चव्हाण यांनी दिली. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांवर भाष्य केले. निवडणुकीत अशा घटना घडत असतात. आरोप-प्रत्यारोप होणे स्वाभाविक आहे. पण निवडणुका संपल्या की कार्यकर्त्यांनी सर्व विसरून जायचे असते.पक्षप्रवेशावरून शिंदेसेना व भाजप यांच्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण झाला होता. दोन्ही पक्षांत कार्यकर्ते येणे-जाणे सुरू होते. काही महत्त्वाचे पदाधिकारी या ना त्या पक्षात गेल्याने थोडासा दुरावा आणखी वाढला होता. पण आता हा दुरावा कमी करण्यासाठी आपण काम केले पाहिजे, असे सांगितले.निवडणूक संपली, विषय संपलासावंतवाडीत भाजप-शिंदेसेनेच्या राड्यावर चव्हाण म्हणाले, निवडणूक संपली विषय संपला. त्यामुळे आता वाद वाढवण्यात काही अर्थ नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance Strong, Arguments Election-Only: Ravindra Chavan

Web Summary : Ravindra Chavan assures that the ruling alliance is strong, despite election disputes. Leaders will meet during the Nagpur session to resolve issues. He emphasized forgetting disagreements and focusing on development, urging unity between BJP and Shinde's Sena after the elections.