शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Maharashtra Election 2019: नारायण राणेंना उत्तराधिकारी सापडेना? तुल्यबळ समर्थकाचाच अर्ज बाद झाल्याने खळबळ

By हेमंत बावकर | Published: October 08, 2019 1:20 PM

नारायण राणे यांनी वांद्रे पूर्वमधून पोटनिवडणूक लढविली होती. मात्र, तेथेही पराभव झाला.

कणकवली/मुंबई : राज्यभरात कोकणचा वाघ म्हणून ओळख असलेल्या नारायण राणेंना 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पहावा लागला. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी 10 हजार मतांनी पराभव करत राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. यानंतर राणेंनी निवडणूक लढणार नसल्याची प्रतिज्ञा केली होती. आज पाच वर्षांनी या मतदारसंघात नारायण राणेंना तुल्यबळ उत्तराधिकारी सापडत नसल्याचे चित्र आहे. 

गेल्या काही वर्षांत अनेकांनी नारायण राणे यांची साथ सोडली. यामध्ये या मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर यांची नावे घेता येतील. खरेतर नारायण राणे हे कणकवलीचे मात्र, विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेनंतर मालवण हा मतदारसंघ कुडाळला आणि कणकवली देवगडमध्ये जोडला गेला. यामुळे राणे यांनी मालवण-कुडाळ मतदारसंघ निवडला. तर कणकवली राष्ट्रवादीकडे होता. श्रीधर नाईक यांचे पुतणे वैभव नाईक यांनी कणकवलीचे असूनही नारायण राणेंविरोधात मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी मते मिळवली. राणे यांनी त्यांचा जवळपास 35 हजार मतांनी पराभव केला. मात्र, 2014 मध्ये नाईक यांनी राणेंचा 10 हजार मतांनी पराभव करत जायंट किलर ठरले. 

यानंतर नारायण राणे यांनी वांद्रे पूर्वमधून पोटनिवडणूक लढविली होती. मात्र, तेथेही पराभव झाला. यंदा कुडाळ-मालवण मतदारसंघात राणे यांच्या तीन समर्थकांची नावे चर्चेत होती. यामध्ये दत्ता सामंत, अॅड. संग्राम देसाई आणि सतीश सावंत यांची नावे होती. यापैकी दत्ता सामंत आणि सतीश सावंत राजकारणात सक्रीय होते. सतीश सावंत हे राणेंचा अत्यंत जवळचे आणि जिल्ह्यातील नेटवर्क बऱ्यापैकी सांभाळणारे खंदे समर्थक होते. गेली 25 वर्षे ते राणेंसोबत होते. त्यांनीच राणे पूत्रावर गंभीर आरोप करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर मातोश्रीवर जाऊन नितेश राणेंविरोधातच शिवसेनेचा एबी फॉर्म मिळवत आव्हान उभे केले आहे. 

तर दत्ता सामंत यांनी दोन वर्षांपासून मतदारसंघात संपर्क वाढवून शेवटच्या क्षणी त्यांचा अर्ज बाद झाला आहे. सरकारी कंत्राटदार असल्याने त्यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला. यामुळे तुल्यबळ असलेला दुसरा राणे समर्थक बाद झाला. सावधगिरी म्हणून अॅड. संग्राम देसाई यांचा भाऊ आणि सध्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले रणजित देसाई यांनी अपक्ष अर्ज भरला होता. यामुळे आता राणेंची सारी भिस्त देसाई यांच्यावरच आहे. मात्र, देसाई यांची संघटनात्मक ताकद नसल्याने आमदार वैभव नाईकांना कितपत टक्कर देतील याबाबत साशंकताच आहे. 

निलेश राणेंचा पर्याय होता का?कुडाळ-मालवण मतदारसंघ हा राणेंचा मतदार संघ असल्याने त्या ठिकाणी निलेश राणेंच्या नावाचीही चर्चा होती. दत्ता सामंत हे कंत्राटदार आहेत, ही गोष्ट नारायण राणेंसारख्या मुरब्बी नेत्याला माहिती नसेल का? हा प्रश्न उरतोच. वैभव नाईक यांनी खुद्द राणेंचा पराभव केला, तर नितेश राणे यांच्यासाठी विजय किती सुकर असेल याचाही विचार करण्यात आला असणारच. यामुळे निलेश राणेंचा पर्याय योग्य नसल्याचा विचार नारायण राणेंनी केल्याची समर्थकामध्ये चर्चा आहे.

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Vaibhav Naikवैभव नाईक Nitesh Raneनीतेश राणे Nilesh Raneनिलेश राणे Shiv Senaशिवसेनाkudal-acकुडाळ