शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

Maharashtra Election 2019 : आक्रमक नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकवू; मुख्यमंत्र्यांकडून भाजपामध्ये 'स्वागत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:08 IST

'एकूण मतांपैकी 70 टक्के मते नितेश राणे यांना मिळतील'

कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीमध्येभाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंच्या आक्रमकतेविषयी भाष्य केले. 

नितेश राणे आपल्या वडिलांप्रमाणे आक्रमक आहेत. विधानसभेच्या सभागृहात असताना त्यांनी कोकणाचा विषय आक्रमतेने मांडला. आक्रमकता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे आमच्याकडे आल्यानंतर नितेश राणेंच्या रूपात आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व समोर येईल. तसेच, त्यांना आमच्या शाळेत आणल्यानंतर आक्रमकतेबाबत संयम बाळगण्याचे धडे शिकवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. याशिवाय, कणकवली विधानसभा मतदारसंघातील एकूण मतांपैकी 70 टक्के मते नितेश राणे यांना मिळतील. इतर सगळ्या उमेदवारांना मिळून 30 टक्के मते मिळतील. हे माझे भाकीत आहे. तुम्ही डायरीत लिहून घ्या, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपामध्ये विलीनीकरण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तसेच, नारायण राणेंशी सुरुवातीपासूनच माझे चांगले संबंध होते. नारायण राणेंनी विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमक काम केले होते. विरोधी पक्षात असताना त्याचे मार्गदर्शन सुरुवातीपासूनच लाभले. आज राणेंचा संपूर्ण परिवार भाजपावासी झाला आहे, त्याचा खूप आनंद झाला आहे. नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा फायदा पक्षाविस्तारासाठी होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :-- नारायण राणेंसोबत भरपूर काम केले आहे.- आक्रमक विरोध पक्षनेता म्हणून मी त्यांना पाहिले आहे.- स्वाभिमान परिवार आमचा झाला. राणेंच्या नेतृत्वाचा फायदा होईल.- नितेश आक्रमक, संयमी नेतृत्व म्हणून पुढे येतील.  - महाराष्ट्र कुठेही चुरस नाही.- जिंकणारे लोक आहोत शांततेने वागा.- मागील निवडणुकीत ४२ होते आता २४ येतील.- राहुल गांधी लोकसभेत भाषण करायचे तेच करत आहेत.-जनादेश मोदींसोबत आहे.- पाच वर्षांत ३० हजार किलोमीटर रस्ते तयार केले.-रोजगाराचा मार्ग असणार आहे-सिंधुदुर्ग मोठ्या प्रमाणावर काम केले.-चिपी विमानतळ सुरू होईल.- सी वर्ल्ड प्रकल्प येत्या दोन वर्षात काम सुरू करू.-सिंधुदुर्गात मंत्रिमंडळाची बैठक घेऊ-कोकणातील वाहून जाणारे पाणी अडवून कोकण टँकर मुक्त करू.-एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी २०२२ पर्यंत प्रयत्न

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे kankavli-acकणकवली