शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

शुकनदीला सोडलेले पाणी स्थानिकांनी रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 16:51 IST

खांबलवाडी धरणातून शुकनदीत सोडलेले पाणी काहीच तासांनंतर स्थानिक ग्रामस्थांनी बंधारा घालून रोखले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देशुकनदीला सोडलेले पाणी स्थानिकांनी रोखलेबंधारा बांधून नदीला सोडलेले धरणाचे पाणी रोखले

वैभववाडी : खांबलवाडी धरणातून शुकनदीत सोडलेले पाणी काहीच तासांनंतर स्थानिक ग्रामस्थांनी बंधारा घालून रोखले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दरम्यान, पाणीपट्टी भरणारे नापणेतील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी लघुपाटबंधारे विभागाकडे पाण्यासाठी तगादा लावला आहे. या धरणाचे पाणी न सोडल्यास शेकडो एकरवरील ऊसशेती संकटात येणार आहे. याशिवाय काही नळपाणी योजनांनाही फटका बसणार आहे.शुकनदीचे पात्र कोरडे पडल्याने सोनाळी, नापणे, कुसूर, उंबर्डे-नायदेवाडी, दिगशी, तिथवली या गावातील ऊसशेतीवर संकट ओढवले असून नदीकाठच्या नळपाणी योजना अडचणीत आहेत. त्यामुळे नापणे परिसरातील शेतकऱ्यांनी खांबलवाडी धरणाचे पाणी शुकनदीला सोडण्याची मागणी लघुपाटबंधारे विभागाकडे केली होती.

त्यानुसार लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नंदकुमार साळवी यांच्या उपस्थितीत मंगळवारी धरणाचे पाणी शुकनदीत सोडण्यात आले. परंतु खांबलवाडीतील ग्रामस्थांनी अर्धवट स्थितीतील कालवा तातडीने पूर्ण करावा, शेतीला सुलभ पद्धतीने पाणी पोहोचण्यासाठी नाल्यांमध्ये काँक्रीटचा बंधारा बांधावा, अशा मागण्या शाखा अभियंता साळवी यांच्यासमोर ठेवत धरणाचे पाणी थेट नदीत सोडण्यास विरोध दर्शविला.त्यामुळे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये एकमत झाले नाही. तरीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मंगळवारी सायंकाळी धरणाचे पाणी शुकनदीत सोडण्यात आले. परंतु त्यानंतर काही तासांतच स्थानिक ग्रामस्थांनी नाल्यात बंधारा बांधून नदीला सोडलेले धरणाचे पाणी रोखले असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, पाणी बंद झाल्यामुळे पाणीपट्टी भरणारे नापणेतील शेतकरी काहीसे आक्रमक झाले आहेत. पाण्याअभावी शेकडो एकरवरील ऊसशेती संकटात आहे. धरणात पाणीसाठा असताना पाण्याअभावी ऊसशेती करपली तर नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

धरणाच्या पाण्याचा प्रश्न वेगळे वळण घेत असल्याने अधिकाऱ्यांनीही सावध भूमिका घेतली असून त्यासंबंधीचा अहवाल शाखा अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांमार्फत अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या आदेशावर सहा गावातील ऊसशेती आणि नदीकाठच्या नळपाणी योजनांचे भवितव्य अवलंबून आहे.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खांबलवाडी धरणाचे पाणी शुकनदीला सोडण्यात आले होते. परंतु काही ग्रामस्थांनी ते बंद केले आहे. या संदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जसे आदेश येतील त्यानुसार धरणाचे पाणी शुकनदीला सोडण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे फोंडाघाट लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नंदकुमार साळवी यांनी दूरध्वनीवरुन स्पष्ट केले आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरणsindhudurgसिंधुदुर्ग