शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

शुकनदीला सोडलेले पाणी स्थानिकांनी रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 16:51 IST

खांबलवाडी धरणातून शुकनदीत सोडलेले पाणी काहीच तासांनंतर स्थानिक ग्रामस्थांनी बंधारा घालून रोखले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देशुकनदीला सोडलेले पाणी स्थानिकांनी रोखलेबंधारा बांधून नदीला सोडलेले धरणाचे पाणी रोखले

वैभववाडी : खांबलवाडी धरणातून शुकनदीत सोडलेले पाणी काहीच तासांनंतर स्थानिक ग्रामस्थांनी बंधारा घालून रोखले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दरम्यान, पाणीपट्टी भरणारे नापणेतील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी लघुपाटबंधारे विभागाकडे पाण्यासाठी तगादा लावला आहे. या धरणाचे पाणी न सोडल्यास शेकडो एकरवरील ऊसशेती संकटात येणार आहे. याशिवाय काही नळपाणी योजनांनाही फटका बसणार आहे.शुकनदीचे पात्र कोरडे पडल्याने सोनाळी, नापणे, कुसूर, उंबर्डे-नायदेवाडी, दिगशी, तिथवली या गावातील ऊसशेतीवर संकट ओढवले असून नदीकाठच्या नळपाणी योजना अडचणीत आहेत. त्यामुळे नापणे परिसरातील शेतकऱ्यांनी खांबलवाडी धरणाचे पाणी शुकनदीला सोडण्याची मागणी लघुपाटबंधारे विभागाकडे केली होती.

त्यानुसार लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नंदकुमार साळवी यांच्या उपस्थितीत मंगळवारी धरणाचे पाणी शुकनदीत सोडण्यात आले. परंतु खांबलवाडीतील ग्रामस्थांनी अर्धवट स्थितीतील कालवा तातडीने पूर्ण करावा, शेतीला सुलभ पद्धतीने पाणी पोहोचण्यासाठी नाल्यांमध्ये काँक्रीटचा बंधारा बांधावा, अशा मागण्या शाखा अभियंता साळवी यांच्यासमोर ठेवत धरणाचे पाणी थेट नदीत सोडण्यास विरोध दर्शविला.त्यामुळे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये एकमत झाले नाही. तरीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मंगळवारी सायंकाळी धरणाचे पाणी शुकनदीत सोडण्यात आले. परंतु त्यानंतर काही तासांतच स्थानिक ग्रामस्थांनी नाल्यात बंधारा बांधून नदीला सोडलेले धरणाचे पाणी रोखले असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, पाणी बंद झाल्यामुळे पाणीपट्टी भरणारे नापणेतील शेतकरी काहीसे आक्रमक झाले आहेत. पाण्याअभावी शेकडो एकरवरील ऊसशेती संकटात आहे. धरणात पाणीसाठा असताना पाण्याअभावी ऊसशेती करपली तर नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

धरणाच्या पाण्याचा प्रश्न वेगळे वळण घेत असल्याने अधिकाऱ्यांनीही सावध भूमिका घेतली असून त्यासंबंधीचा अहवाल शाखा अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांमार्फत अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या आदेशावर सहा गावातील ऊसशेती आणि नदीकाठच्या नळपाणी योजनांचे भवितव्य अवलंबून आहे.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खांबलवाडी धरणाचे पाणी शुकनदीला सोडण्यात आले होते. परंतु काही ग्रामस्थांनी ते बंद केले आहे. या संदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जसे आदेश येतील त्यानुसार धरणाचे पाणी शुकनदीला सोडण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे फोंडाघाट लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नंदकुमार साळवी यांनी दूरध्वनीवरुन स्पष्ट केले आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरणsindhudurgसिंधुदुर्ग