शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शुकनदीला सोडलेले पाणी स्थानिकांनी रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 16:51 IST

खांबलवाडी धरणातून शुकनदीत सोडलेले पाणी काहीच तासांनंतर स्थानिक ग्रामस्थांनी बंधारा घालून रोखले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देशुकनदीला सोडलेले पाणी स्थानिकांनी रोखलेबंधारा बांधून नदीला सोडलेले धरणाचे पाणी रोखले

वैभववाडी : खांबलवाडी धरणातून शुकनदीत सोडलेले पाणी काहीच तासांनंतर स्थानिक ग्रामस्थांनी बंधारा घालून रोखले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दरम्यान, पाणीपट्टी भरणारे नापणेतील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी लघुपाटबंधारे विभागाकडे पाण्यासाठी तगादा लावला आहे. या धरणाचे पाणी न सोडल्यास शेकडो एकरवरील ऊसशेती संकटात येणार आहे. याशिवाय काही नळपाणी योजनांनाही फटका बसणार आहे.शुकनदीचे पात्र कोरडे पडल्याने सोनाळी, नापणे, कुसूर, उंबर्डे-नायदेवाडी, दिगशी, तिथवली या गावातील ऊसशेतीवर संकट ओढवले असून नदीकाठच्या नळपाणी योजना अडचणीत आहेत. त्यामुळे नापणे परिसरातील शेतकऱ्यांनी खांबलवाडी धरणाचे पाणी शुकनदीला सोडण्याची मागणी लघुपाटबंधारे विभागाकडे केली होती.

त्यानुसार लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नंदकुमार साळवी यांच्या उपस्थितीत मंगळवारी धरणाचे पाणी शुकनदीत सोडण्यात आले. परंतु खांबलवाडीतील ग्रामस्थांनी अर्धवट स्थितीतील कालवा तातडीने पूर्ण करावा, शेतीला सुलभ पद्धतीने पाणी पोहोचण्यासाठी नाल्यांमध्ये काँक्रीटचा बंधारा बांधावा, अशा मागण्या शाखा अभियंता साळवी यांच्यासमोर ठेवत धरणाचे पाणी थेट नदीत सोडण्यास विरोध दर्शविला.त्यामुळे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये एकमत झाले नाही. तरीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मंगळवारी सायंकाळी धरणाचे पाणी शुकनदीत सोडण्यात आले. परंतु त्यानंतर काही तासांतच स्थानिक ग्रामस्थांनी नाल्यात बंधारा बांधून नदीला सोडलेले धरणाचे पाणी रोखले असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, पाणी बंद झाल्यामुळे पाणीपट्टी भरणारे नापणेतील शेतकरी काहीसे आक्रमक झाले आहेत. पाण्याअभावी शेकडो एकरवरील ऊसशेती संकटात आहे. धरणात पाणीसाठा असताना पाण्याअभावी ऊसशेती करपली तर नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

धरणाच्या पाण्याचा प्रश्न वेगळे वळण घेत असल्याने अधिकाऱ्यांनीही सावध भूमिका घेतली असून त्यासंबंधीचा अहवाल शाखा अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांमार्फत अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या आदेशावर सहा गावातील ऊसशेती आणि नदीकाठच्या नळपाणी योजनांचे भवितव्य अवलंबून आहे.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खांबलवाडी धरणाचे पाणी शुकनदीला सोडण्यात आले होते. परंतु काही ग्रामस्थांनी ते बंद केले आहे. या संदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जसे आदेश येतील त्यानुसार धरणाचे पाणी शुकनदीला सोडण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे फोंडाघाट लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नंदकुमार साळवी यांनी दूरध्वनीवरुन स्पष्ट केले आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरणsindhudurgसिंधुदुर्ग