शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्थानिक पातळीवर जैवविविधतेचा

By admin | Updated: January 15, 2015 23:30 IST

दस्तऐवज तयार करणे गरजेचे,,राहुल मुंगीकर : वायरी, तारकर्ली, कोळंब येथे बैठक

मालवण : नैसर्गिक साधनसंपत्तीचा दुरूपयोग होऊ नये व तिचा गावाच्या विकासासाठी उपयोग व्हावा, यासाठी स्थानिक पातळीवर जैवविविधतेचा दस्तऐवज तयार करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे वरिष्ठ संशोधन सल्लागार डॉ. राहुल मुंगीकर यांनी वायरी येथे व्यक्त केले.संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील वायरी, तारकर्ली, कोळंब येथे ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युएनडीपीचे आर्थिक व सामाजिक सल्लागार सुहेल जामदार, सागरी संशोधक मार्विन फर्नांडीस, टेरी संस्थेचे सतीश लेले, अमोल हंजेरे, उमेश असवलकर, युएनडीपीचे दुर्वा ठिगळे, दया पत्की, वायरी सरपंच सुजाता मातोंडकर, जैवविविधता समिती अध्यक्ष हरिश्चंद्र खोबरेकर, ग्रामपंचायत सदस्या अलका मालंडकर, प्रियांका रेवंडकर, महेश लुडबे, अरूण तळगावकर, युवराज चव्हाण, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, अनिता सरमळकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.यावेळी डॉ. राहुल मुंगीकर म्हणाले, सिंधुदुर्गात जैवविविधता रक्षण व संवर्धनासाठी गावागावांमध्ये जैवविविधता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सागरी जैवविविधतेचे महत्त्व लक्षात घेता या समित्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. वनविभाग व युएनडीपीच्या माध्यमातून मालवण, देवगड, वेंगुर्ला येथे जैवविविधता प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाची मुदत २०१६ पर्यंत आहे. यानंतरही या प्रकल्पाचे काम सुरळीत चालू राहण्यासाठी या समित्यांचा उपयोग होणार आहे.राज्य जैवविविधता नियम २००८ नुसार जैवविविधता कायदा २००२च्या अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या निर्देशानुसार जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमुळे जैवविविधता कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येणार आहे. या समित्यांना जैव संसाधनाच्या वापराबाबत परवानगीचा निर्णय घेण्याचा तसेच जैविक स्त्रोताच्या वापरासाठी शुल्क वसुलीचा अधिकार राहणार आहे. (प्रतिनिधी)जैवविविधता व्यवस्थापन समितीने माहितगारांकरवी गावातील उपलब्ध असलेल्या जैविक साधनसंपत्तीची नोंदवही तयार करणे आवश्यक आहे. यात वनस्पती, प्राणी, किटक, पक्षी, जलचर, उभयचर, अष्टपाद, सरीसृप, कवचधारी जीव अशा सर्व प्रकारच्या जैविकतेची नोंद करावयाची आहे. यामुळे जैवविविधता नोंदवही ही स्थानिक जैवविविधतेची नोंद असलेला दस्त तयार होणार आहे, असे डॉ. मुंगीकर म्हणाले.ट्रॉलिंग फिशिंगमुळे मत्स्यबीज संकटात आले आहे. मत्स्यबिजाची वाढ होण्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. किनारपट्टी भागात ७० टक्के जनता मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे, असे जैवविविधता समिती अध्यक्ष हरिश्चंद्र खोबरेकर यांनी यावेळी सांगितले.