शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक पातळीवर जैवविविधतेचा

By admin | Updated: January 15, 2015 23:30 IST

दस्तऐवज तयार करणे गरजेचे,,राहुल मुंगीकर : वायरी, तारकर्ली, कोळंब येथे बैठक

मालवण : नैसर्गिक साधनसंपत्तीचा दुरूपयोग होऊ नये व तिचा गावाच्या विकासासाठी उपयोग व्हावा, यासाठी स्थानिक पातळीवर जैवविविधतेचा दस्तऐवज तयार करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे वरिष्ठ संशोधन सल्लागार डॉ. राहुल मुंगीकर यांनी वायरी येथे व्यक्त केले.संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील वायरी, तारकर्ली, कोळंब येथे ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युएनडीपीचे आर्थिक व सामाजिक सल्लागार सुहेल जामदार, सागरी संशोधक मार्विन फर्नांडीस, टेरी संस्थेचे सतीश लेले, अमोल हंजेरे, उमेश असवलकर, युएनडीपीचे दुर्वा ठिगळे, दया पत्की, वायरी सरपंच सुजाता मातोंडकर, जैवविविधता समिती अध्यक्ष हरिश्चंद्र खोबरेकर, ग्रामपंचायत सदस्या अलका मालंडकर, प्रियांका रेवंडकर, महेश लुडबे, अरूण तळगावकर, युवराज चव्हाण, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, अनिता सरमळकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.यावेळी डॉ. राहुल मुंगीकर म्हणाले, सिंधुदुर्गात जैवविविधता रक्षण व संवर्धनासाठी गावागावांमध्ये जैवविविधता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सागरी जैवविविधतेचे महत्त्व लक्षात घेता या समित्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. वनविभाग व युएनडीपीच्या माध्यमातून मालवण, देवगड, वेंगुर्ला येथे जैवविविधता प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाची मुदत २०१६ पर्यंत आहे. यानंतरही या प्रकल्पाचे काम सुरळीत चालू राहण्यासाठी या समित्यांचा उपयोग होणार आहे.राज्य जैवविविधता नियम २००८ नुसार जैवविविधता कायदा २००२च्या अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या निर्देशानुसार जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमुळे जैवविविधता कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येणार आहे. या समित्यांना जैव संसाधनाच्या वापराबाबत परवानगीचा निर्णय घेण्याचा तसेच जैविक स्त्रोताच्या वापरासाठी शुल्क वसुलीचा अधिकार राहणार आहे. (प्रतिनिधी)जैवविविधता व्यवस्थापन समितीने माहितगारांकरवी गावातील उपलब्ध असलेल्या जैविक साधनसंपत्तीची नोंदवही तयार करणे आवश्यक आहे. यात वनस्पती, प्राणी, किटक, पक्षी, जलचर, उभयचर, अष्टपाद, सरीसृप, कवचधारी जीव अशा सर्व प्रकारच्या जैविकतेची नोंद करावयाची आहे. यामुळे जैवविविधता नोंदवही ही स्थानिक जैवविविधतेची नोंद असलेला दस्त तयार होणार आहे, असे डॉ. मुंगीकर म्हणाले.ट्रॉलिंग फिशिंगमुळे मत्स्यबीज संकटात आले आहे. मत्स्यबिजाची वाढ होण्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. किनारपट्टी भागात ७० टक्के जनता मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे, असे जैवविविधता समिती अध्यक्ष हरिश्चंद्र खोबरेकर यांनी यावेळी सांगितले.