शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

रेल्वे गाड्यांना सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथे थांबे द्या : सुरेश प्रभूंना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 12:24 IST

बारा लांब पल्ल्याच्या गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही थांबा नाही. या गाड्यांना सावंतवाडी, कुडाळ व कणकवली येथे किमान दोन थांबे द्यावेत तसेच मंगला एक्सप्रेस व सीएसटी-मंगलोर या गाड्यांना सावंतवाडीत थांबा देण्याची मागणी सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी संघटनेने केंद्रीय हवाई वाहतूक व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देरेल्वे गाड्यांना सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथे थांबे द्या, प्रवासी संघटनेचे सुरेश प्रभूंना साकडे कोकण रेल्वेवरील विविध गाड्यांबाबत मागणीचे निवेदन

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोचिवली -चंदीगड, एलटीटी-एर्नाकुलम दुरांतो, एनार्कुलम- हजरात निजामुद्दीन, मडगाव-चंदीगड, गोवा संपर्क क्रांती, कोचुवली-अमृतसर, एर्नाकुलम-अजमेर, तिरुनवल्ली-गांधी धाम, तिरुनवल्ली-जामनगर, हिस्सार, कोचुवल्ली-इंदूर, कोचुवल्ली-पोरबंदर आणि तिरुनवल्ली या बारा लांब पल्ल्याच्या गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही थांबा नाही. या गाड्यांना सावंतवाडी, कुडाळ व कणकवली येथे किमान दोन थांबे द्यावेत तसेच मंगला एक्सप्रेस व सीएसटी-मंगलोर या गाड्यांना सावंतवाडीत थांबा देण्याची मागणी सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी संघटनेने केंद्रीय हवाई वाहतूक व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.केंद्र्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत निवेदन दिले. या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत, सचिव सतीश पाटणकर, खजिनदार विनोद रेडकर, उपाध्यक्ष भाई देऊलकर, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, अशोक सावंत आदी उपस्थित होते.दादर-सावंतवाडी ही तुतारी एक्स्प्रेस दादरवरून रात्री ९ वाजता सोडण्यात यावी. गरीब रथ ही गाडी जाता-येता पाच तास अगोदर किंवा उशिरा सोडण्यात यावी, कोकण रेल्वे मार्गावर डहाणू-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी, आणि वांद्र्रा-सावंतवाडी अशा कोकणातील प्रवाशांसाठी गाड्या सोडण्यात याव्यात, तसेच गणेशोत्सव, शिमगा, दिवाळी, ख्रिस्तमस आणि एप्रिल-मे या सुटीच्या काळात दर तीन तासांनी मुंबईवरून गाड्या सोडण्यात याव्यात, मत्स्यगंधा आणि नेत्रावती गाड्या मडगावनंतर प्रत्येक स्थानकावर थांबतात. यासाठी या दोन गाड्यांना सावंतवाडीत आणखी एक थांबा देण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन यावेळी मंत्री प्रभू यांनी दिले.दरम्यान, सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने खासदार विनायक राऊत आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचेही या प्रश्नाकडे लक्ष वेधले. आपण याबाबत लक्ष घालून या मागण्या मान्य करून घेण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार राऊत व पालकमंत्री केसरकर यांनी दिले.

टर्मिनसचे काम मार्गी लावा!सावंतवाडी-टर्मिनसचे काम अर्धवट स्थितीत आहे. या ठिकाणी रेल्वे गाडीत पाणी भरण्याची सोय नाही. केंद्र्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने बांदा- इन्सुली येथून बारमाही वाहणाऱ्या तेरेखोल नदीतून राज्य शासनाच्या मदतीने पाणी उपलब्ध करून घ्यावे किंवा तिलारी प्रकल्पाचे पाणी टर्मिनससाठी उपलब्ध करून घ्यावे, अशीही मागणी या निमित्ताने करण्यात आली. 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूsindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वे