शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा वैभववाडीत शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:17 PM

केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना जिल्हा बँकेमार्फत राबविली जात आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने जिल्हा बँकेच्या वैभववाडी शाखेत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड वितरण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देपशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा वैभववाडीत शुभारंभशेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्यावर भर : सतीश सावंत

वैभववाडी : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून एखाद्या मोठ्या उद्योगपतीला कोट्यवधीचे कर्ज देण्यापेक्षा छोट्या छोट्या शेतकऱ्यांना शेती कर्जपुरवठा करण्यावर बँकेचा अधिक भर आहे, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे व्यक्त केले.

केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना जिल्हा बँकेमार्फत राबविली जात आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने जिल्हा बँकेच्या वैभववाडी शाखेत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड वितरण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बँकेचे संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, रमेश तावडे, संभाजी रावराणे, नंदू शिंदे, प्रमोद गावडे, शरद सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुक्यातील वीसपेक्षा अधिक शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले.सावंत पुढे म्हणाले, केंद्र शासनाची पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजना प्रभावीपणे राबविणारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राज्यातील एकमेव बँक आहे. योजना शासनाची असली तरी ती शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध हेतूने पोहोचविणारी यंत्रणा सक्षम असणे आवश्यक असते. हे काम सध्या जिल्हा बँक करीत आहे. शेतकऱ्यांनी भातशेती, ऊसशेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय करावेत. त्यातून आर्थिक उन्नती साधावी. या उद्देशानेच ही योजना राबविली जात आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी २ लाख व शेतीसाठी १ लाखापर्यंत कर्जाची मर्यादा आहे. ७ टक्के व्याजाने हे कर्ज दिले जाणार आहे. त्यातील ३ टक्के व्याज केंद्रशासन भरणार असून उर्वरित ४ टक्के व्याज शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. हे ४ टक्के व्याजही राज्य शासनाने भरावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सावंत यांनी सांगितले.कोरोनातही ७० टक्के परतफेड केलीकोरोनामुळे गेले चार-पाच महिने लॉकडाऊनची स्थिती आहे. तरीदेखील जिल्हा बँकेचा प्रमुख ग्राहक असलेला शेतकरी कर्जाची परतफेड करण्यात कुठेही कमी पडत नाही. यावर्षी कोरोनाचे संकट असतानाही ७० टक्के शेतकऱ्यांनी शेतीकर्जाची परतफेड केली असल्याचे सतीश सावंत यांनी स्पष्ट केले.योजनेइतकीच तिची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सक्षम हवी. योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची तळमळ संचालक मंडळात हवी. तरच ती योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. हे काम जिल्हा बँक करीत आहे. त्यामुळे विरोधकांनी टीका करू नये, असे आवाहन बँकेचे संचालक दिगंबर पाटील यांनी केले. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग