शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

भविष्यात कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा गेट वे असेल, राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला विश्वास

By अनंत खं.जाधव | Updated: January 18, 2025 21:18 IST

Rahul Narvekar News: येणाऱ्या काळात कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा गेट वे असेल अधिकची गुंतवणूक येईल असा विश्वास महाराष्ट्राचे विधानसभाध्यक्ष  राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.

 सावंतवाडी - येणाऱ्या काळात कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा गेट वे असेल अधिकची गुंतवणूक येईल असा विश्वास महाराष्ट्राचे विधानसभाध्यक्ष  राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला. विधानसभा अध्यक्ष म्हणून योग्य निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मला पत्रकारांनी मोठी साथ दिली. लोकशाहीच्या तीन स्तंभांवर जागृतपणे पत्रकार लक्ष ठेवत आहेत. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट होत असल्याचे गौरवोद्गार ही नार्वेकर यांनी काढले.

सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा सावंतवाडीतील काझीशहाबुददीन हाॅल मध्ये विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे संस्थापक सिताराम गावडे, सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी चे सुपुत्र अँड राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली म्हणून प्रेस क्लबच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. तर  प्रेस क्लब भुषण पुरस्काराने रूपेश हिराप,डिजिटल मिडीयात आर्दश पत्रकार  आनंद धोंड,युवा पत्रकार म्हणून प्रतिक राणे, प्रेस क्लब कर्मचारी पुरस्काराने गुरुनाथ कदम यांचा तर विशेष पत्रकार पुरस्कार शिवप्रसाद देसाई, सिताराम गावडे यांना देऊन गौरविण्यात आले.

यावेळी नार्वेकर म्हणाले, कोकणातील लाल माती गुलालाचा शेंदूर असल्यासारखी वाटते. आम्ही या ठिकाणाहून मुंबई मध्ये गेलो तरी लाल मातीत येत असतो. कुलाबा क्षेत्रात देशातील श्रीमंत, उच्चभ्रू लोक राहतात आणि मंत्रालयासह उच्च न्यायालय देखील आहेत. अशा बहुभाषिक कुलाबा मतदारसंघातून निवडून येतो म्हणजे कोकणी माणूस सर्वांना आपलेसे करतोय. विधानसभा अध्यक्ष हा काटेरी मुकुट माझ्या हातात असला तरी कोकणातील माणूस तो सांभाळत आहे.  पत्रकार हा  चौथा स्तंभ आहे . तो अन्य तिन्ही स्तंभांवर कायमच जागृतपणे लक्ष ठेवत आहे. पत्रकारांनी चांगली साथ दिली म्हणूनच मी अध्यक्ष म्हणून योग्य निर्णय घेतले. देशाला घडविण्यात आणि लोकशाही ला पुढे नेण्यासाठी पत्रकार काम करत आहेत.असे अॅड.नार्वेकर म्हणाले.भविष्यात  कोंकणात रोजगार निर्माण होईल. सावंतवाडी, वेंगुर्ले पर्यटन हब म्हणून विकसित होईल. दिपक केसरकर यांनी जर्मन मध्ये चार लाख लोकांना नोकऱ्या देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.असल्याचे ही गौरवोद्गार काढले.

केसरकर म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श सिंधुदुर्ग जिल्ह्यांला लाभला आहे.येथील पत्रकार नेहमीच जागरूक असतात असे ते म्हणाले. दळवी म्हणाले, महाराष्ट्र, देशात सिंधुदुर्ग जिल्ह्याला अग्रभागी ठेवण्याचे काम जिल्ह्यातील पत्रकार ठेवत आहेत. त्यामुळे जिल्ह्याची उज्वल परंपरा पुढे चालू आहे.असेही दळवी म्हणाले.

यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, सागर साळुंखे,प्रमोद गावडे रवी जाधव अन्नपूर्णा कोरगावकर आनंद नेवगी अभिमन्यू लोढे अशोक दळवी, रमेश बोंद्रे, नारायण राणे,  रवींद्र मडगावकर,दिलीप भालेकर दिपाली भालेकर दिनेश गावडे, हेमंत खानोलकर,संदेश पाटील राकेश परब, राजू तावडे दिपक गावकर शैलेश मयेकर   यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरsindhudurgसिंधुदुर्ग