शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

कोकण रेल्वेच्या ८ एप्रिल पासून  'समर स्पेशल' गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 1:37 PM

प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वेच्या ८ एप्रिल पासून  'समर स्पेशल' गाड्याप्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय 

कणकवली : प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल ते जून या कालावधीसाठी 'समर स्पेशल ' गाड्या रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर या विशेष गाड्या ८ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहेत.त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या 'समर स्पेशल ' गाड्यांमध्ये (०१०५१/५२ )ही गाडी १७ मे ते ७ जून या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री ८.४५ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी ८.३० वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी करमाळीहून १९ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत दर रविवारी दुपारी १२.५० वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री १ वाजता २० मिनिटांनी ती लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. २४ डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकावर थांबणार आहे.दुसरी गाडी(०१०१६/१५) करमाळी लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर १८ मे ते ८ जून या कालावधीत धावणार आहे. ही गाडी करमाळीहून दर शनिवारी १२.५०वा. सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.तिसरी विशेष गाडी (०१०४५/४६) १२ एप्रिल ते ७ जून २०१९ या कालावधीत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता ती गोवा- करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी करमाळीहून दर शुक्रवारी दुपरी १२.५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी ती लोकमान्य टर्मिनसला पोहोचेल.चौथी विशेष गाडी(०१०३७/३८) ही ८ एप्रिल ते ३जून २०१९ या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान धावणार आहे. ही गााडी दर सोमवारी रात्री १ वाजता १०मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी दुपारी ती १ वाजता २० मिनिटांनी ती सावंतवाडीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी दर सोमवारी दुपारी २.१० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री १ वाजून २० मिनिटांनी ती मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. सतरा डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ स्थानकावर थांबणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.दरम्यान, या समर स्पेशल जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांची सोय होणार आहे. उन्हाळी सुट्टी साठी गावी येणाऱ्या मुंबईकर मंडळींना गर्दीच्या हंगामात त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग