शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

सिंधुदुर्ग : कणकवली मनसेचे घ्ंटानाद आंदोलन, प्रांताधिकाऱ्याना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 17:03 IST

भाजप शासन सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्‍या या शासनाने सर्वच घटकांतील लोकांसाठी बुरे दिन आणले आहेत.असा आरोप करीत जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा यासाठी मनसेच्यावतीने मंगळवारी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देत शासनाचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देकणकवली मनसेचे घ्ंटानाद आंदोलनप्रांताधिकाऱ्याना दिले निवेदन

कणकवली: भाजप शासन सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्‍या या शासनाने सर्वच घटकांतील लोकांसाठी बुरे दिन आणले आहेत.असा आरोप करीत जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा यासाठी मनसेच्यावतीने मंगळवारी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देत शासनाचा निषेध करण्यात आला.घ्ंटानाद आंदोलन केल्यानंतर प्रांताधिकारी निता शिंदे- सावंत यांच्याकडे मुख्यमंत्र्याना देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, कणकवली शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर, महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेंडे , मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष अनिल राणे, संतोष कुडाळकर, गुरु भालेकर, शरद सावंत, अरविंद घाडीगावकर , प्रभाकर राणे आदी मनसैनिक उपस्थित होते.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , मुख्यमंत्री तसेच भाजप नेत्यांनी निवडणुकीपूर्वी प्रचार सभेमधून व आपल्या जाहिरनाम्यातून जनतेला विकासाची स्वप्ने दाखविली होती. मात्र, गेल्या चार वर्षात महागाईचा डोंगर दिवसेदीवस वाढत चालला आहे. पण रोजगार देणारा एकही उद्योग हे शासन निर्माण करू शकलेले नाही. नोटबंदीनंतर तर हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. शेतकरीही देशोधडीला लागले आहेत. या धक्क्यातून सर्वसामान्य जनता अजूनही सावरलेली नाही. आता पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे तर सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.शासन मान्य रास्त दराची दुकाने बंद होण्याच्या स्थितीत आहेत. निराधार पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक आणि कलाकारांचीही पेन्शन थकली आहे. शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कामगार आणि अधिकारी देखील शासना विरोधात आंदोलन करीत आहेत. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याना आंदोलने करावी लागत आहेत. हे निषेधार्ह आहे.अनेक अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार केला जात आहे. या अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही. जिल्ह्याबरोबरच संपूर्ण देशातच खून , दरोडे, बलात्कार अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. जनता अगदी मेटाकुटिस आली आहे.सिंधुदर्ग जिल्ह्यात रस्ते खड़ेमय बनले आहेत. धरणांची कामे ठप्प झाली आहेत. शासकीय आरोग्य सेवा जनतेला व्यवस्थित रीत्या न मिळाल्याने काही खासगी डॉक्टरांकडून जनतेची लूट होत आहे. अशा स्थितीत जनतेच्या भावना शासना पर्यन्त पोहचविण्यासाठी तसेच शासनाला जाग आणण्यासाठी हे घ्ंटानाद आंदोलन करण्यात येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.कड़क पोलिस बंदोबस्त !मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सोमवारी जाहिर केल्याप्रमाणे घन्टानाद आंदोलन मंगळवारी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले, हवालदार तावड़े यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर कड़क बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते.

 

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग