शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पुन्हा सत्ता द्या, भव्यदिव्य महोत्सव करू!, नितेश राणेंनी कणकवलीकरांना दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:27 IST

..तर तुम्हाला आम्ही आजचा क्षण देऊ शकलो नसतो. 

कणकवली: कणकवलीच्या जनतेने पाच वर्षांपूर्वी आमच्यावर विश्वास दाखवून नगरपंचायतची सत्ता आमच्या हाती दिली. त्यावेळी जे शब्द आपल्याला दिले ते सगळे आम्ही पाच वर्षांमध्ये पूर्ण करून दाखवले. आपल्याला पुढच्या वर्षीही भव्य कणकवली महोत्सव बघायचा असेल तर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हाती सत्ता आली पाहिजे. तसे झाले तर पुढच्या वर्षीही आगळ्या वेगळ्या पद्धतीचा महोत्सव याठिकाणी साजरा करू. असा शब्द आमदार नितेश राणे यांनी कणकवलीकरांना दिला. कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, अबिद नाईक, विराज भोसले, अभिजीत मुसळे, शिशिर परूळेकर, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे व अन्य मान्यवर उपस्थित होते. नितेश राणे म्हणाले, राजकीय भाषण देऊन तुमच्यामध्ये आणि या कलाकारांमध्ये जास्त वेळ आम्हाला घ्यायचा नाही. पण कणकवली महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही जे काही आपल्यासाठी करू शकलो, जो काही भव्य दिव्य कार्यक्रम आपल्यासाठी आणू शकलो, हे फक्त आमच्या कणकवलीकरांमुळेच आहे. कारण तुम्ही आम्हाला पाच वर्ष अगोदर आशीर्वाद देऊन कणकवलीची धुरा आमच्या हातात दिलात. ते जर केला नसता तर तुम्हाला आम्ही आजचा क्षण देऊ शकलो नसतो. निवडणुकीच्या निमित्ताने एक वेगळा इतिहास घडवला. कणकवलीकरांनी जो विश्वास आमच्यावर टाकला, त्या विश्वासासाठी आम्ही सगळेजण दिवस रात्र मेहनत करू. शिंदे फडणवीस सरकारकडून अल्पावधीत तब्बल २२ कोटी रुपयांचा निधी आमच्या कणकवलीकरांसाठी आणून दाखवलेला आहे. जे शब्द आपल्याला दिले ते सगळे शब्द आम्ही पाच वर्षांमध्ये पूर्ण करून दाखवले. हा उत्साह असाच दरवर्षी आपल्याला आम्ही देऊ. आपल्या सेवेत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आलेल्या सगळ्या कलाकारांना तसेच ज्या कार्यकर्त्यांनी अथवा ज्या लोकांनी आम्हाला हा महोत्सव घेण्यासाठी मदत केली, सहकार्य केले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. समीर नलावडे म्हणाले, कणकवलीवासीयांनी दाखविलेला विश्वास गेल्या पाच वर्षात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आशीर्वादाने आणि आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्थ करून दाखविला आहे. विकासाचे अनेक प्रश्न सुटू शकले याचे कारण आपला आमच्यावर असलेला विश्वास आहे. या पुढच्या काळातही हा विश्वास कायम ठेवा. कणकवलीत विकासाची गंगा आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले. यावेळी सूत्रसंचालक श्याम सावंत व राजेश कदम यांचा सन्मान करण्यात आला.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे