शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

पुन्हा सत्ता द्या, भव्यदिव्य महोत्सव करू!, नितेश राणेंनी कणकवलीकरांना दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:27 IST

..तर तुम्हाला आम्ही आजचा क्षण देऊ शकलो नसतो. 

कणकवली: कणकवलीच्या जनतेने पाच वर्षांपूर्वी आमच्यावर विश्वास दाखवून नगरपंचायतची सत्ता आमच्या हाती दिली. त्यावेळी जे शब्द आपल्याला दिले ते सगळे आम्ही पाच वर्षांमध्ये पूर्ण करून दाखवले. आपल्याला पुढच्या वर्षीही भव्य कणकवली महोत्सव बघायचा असेल तर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हाती सत्ता आली पाहिजे. तसे झाले तर पुढच्या वर्षीही आगळ्या वेगळ्या पद्धतीचा महोत्सव याठिकाणी साजरा करू. असा शब्द आमदार नितेश राणे यांनी कणकवलीकरांना दिला. कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, अबिद नाईक, विराज भोसले, अभिजीत मुसळे, शिशिर परूळेकर, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे व अन्य मान्यवर उपस्थित होते. नितेश राणे म्हणाले, राजकीय भाषण देऊन तुमच्यामध्ये आणि या कलाकारांमध्ये जास्त वेळ आम्हाला घ्यायचा नाही. पण कणकवली महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही जे काही आपल्यासाठी करू शकलो, जो काही भव्य दिव्य कार्यक्रम आपल्यासाठी आणू शकलो, हे फक्त आमच्या कणकवलीकरांमुळेच आहे. कारण तुम्ही आम्हाला पाच वर्ष अगोदर आशीर्वाद देऊन कणकवलीची धुरा आमच्या हातात दिलात. ते जर केला नसता तर तुम्हाला आम्ही आजचा क्षण देऊ शकलो नसतो. निवडणुकीच्या निमित्ताने एक वेगळा इतिहास घडवला. कणकवलीकरांनी जो विश्वास आमच्यावर टाकला, त्या विश्वासासाठी आम्ही सगळेजण दिवस रात्र मेहनत करू. शिंदे फडणवीस सरकारकडून अल्पावधीत तब्बल २२ कोटी रुपयांचा निधी आमच्या कणकवलीकरांसाठी आणून दाखवलेला आहे. जे शब्द आपल्याला दिले ते सगळे शब्द आम्ही पाच वर्षांमध्ये पूर्ण करून दाखवले. हा उत्साह असाच दरवर्षी आपल्याला आम्ही देऊ. आपल्या सेवेत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आलेल्या सगळ्या कलाकारांना तसेच ज्या कार्यकर्त्यांनी अथवा ज्या लोकांनी आम्हाला हा महोत्सव घेण्यासाठी मदत केली, सहकार्य केले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. समीर नलावडे म्हणाले, कणकवलीवासीयांनी दाखविलेला विश्वास गेल्या पाच वर्षात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आशीर्वादाने आणि आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्थ करून दाखविला आहे. विकासाचे अनेक प्रश्न सुटू शकले याचे कारण आपला आमच्यावर असलेला विश्वास आहे. या पुढच्या काळातही हा विश्वास कायम ठेवा. कणकवलीत विकासाची गंगा आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले. यावेळी सूत्रसंचालक श्याम सावंत व राजेश कदम यांचा सन्मान करण्यात आला.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे