शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 17:31 IST

Rain Kankavli Sindhdurug : कणकवली शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत गेले पाच दिवस अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाची संततधार कायम असून सह्याद्री पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी- नाल्यांना पूरसदृश पाणी आले आहे.

ठळक मुद्देकणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायमचचौविस तासात सरासरी १४६ मिलिमीटर पावसाची नोंद

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत गेले पाच दिवस अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाची संततधार कायम असून सह्याद्री पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी- नाल्यांना पूरसदृश पाणी आले आहे. तालुक्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चौविस तासात सरासरी १४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर १ जून पासून आतापर्यंत तालुक्यात १,९३० मिलिमीटर पाऊस झाला आहे.दरम्यान,काही वेळ पाऊस थांबला की, नदी, नाल्यांमधील पाणी बऱ्यापैकी ओसरत आहे.त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. ग्रामीण भागांमधील अनेक नदी- नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.

काही ठिकाणचे पाणी ओसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.सध्या संततधार पाऊस पडत असून अधून मधून मोठ्या सरीही कोसळत आहेत. ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठया अडचणीना सामोरे जावे लागत आहेरविवारी दुपारनंतर पावसाने दमदार सुरुवात केली तर गुरूवारी सकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने अंधार दाटून आला होता. पावसामुळे कणकवली शहरालगतच्या जानवली आणि गडनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. भात शिवारातही पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना लावणीचे काम थांबवावे लागत आहे.

कणकवली शहरात दमदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. तेलीआळी तसेच इतर भागात रस्त्यावर पाणी साचत आहे. पाऊस गेल्यावर हे पाणी ओसरत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारातही पाणी साचत आहे. एक वाहन दुसऱ्या वाहनाला बाजू देत असताना रस्त्याचा पाण्यामुळे अंदाज न आल्याने वाहने गटारात जात आहेत. यामध्ये दुचाकींचे प्रमाण जास्त आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत उभारण्यात आलेल्या सर्व्हिस रस्त्यावरील पाणी निचऱ्याची समस्या कायम आहे. तर उड्डाणपुलाच्या पाणी निचरा पाईपला गळती लागल्याने पुलावरील पाणी थेट रस्त्यावर कोसळत असल्याने पादचाऱ्यांना खालून चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या समस्येकडे कोणी लक्ष देईल का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली