शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कणकवलीत ६ फेब्रुवारी पासून मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्यउत्सव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:48 IST

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने गेली २८ वर्षे रसिकांच्या पाठबळावर सुरू असलेल्या ' कणकवली नाट्यउत्सवाला' ६ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. हा नाट्यउत्सव आता ' मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य उत्सव' या नावाने ओळखला जाणार आहे. या नाट्य उत्सवात अभिनेते अमोल पालेकर यांना रंगमंचावर पाहण्याची दुर्मिळ संधी रसिकांना लाभणार आहे. अशी माहिती वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित यांनी दिली.

ठळक मुद्देकणकवलीत मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्यउत्सव !वामन पंडित यांची माहिती ; ६ फेब्रुवारी पासून प्रारंभ

कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने गेली २८ वर्षे रसिकांच्या पाठबळावर सुरू असलेल्या ' कणकवली नाट्यउत्सवाला' ६ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. हा नाट्यउत्सव आता ' मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य उत्सव' या नावाने ओळखला जाणार आहे. या नाट्य उत्सवात अभिनेते अमोल पालेकर यांना रंगमंचावर पाहण्याची दुर्मिळ संधी रसिकांना लाभणार आहे. अशी माहिती वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित यांनी दिली.येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष ऍड. एन. आर. देसाई, कार्यवाह शरद सावंत, सहकार्यवाह राजेश राजाध्यक्ष,खजिनदार धनराज दळवी, सदस्य मिलिंद बेळेकर, लीना काळसेकर आदी उपस्थित होते.वामन पंडित पुढे म्हणाले, ' कणकवली नाट्यउत्सव' या नावाने सर्वदूर पोहचलेल्या या महोत्सवाचे हे अठ्ठावीसावे वर्ष आहे. सिंधुदुर्गातील रसिकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाची नाटके कणकवलीत पाहता यावीत , त्यांचा आस्वाद घेऊन रंगकर्मींशी थेट संवाद साधता यावा हा उद्देश समोर ठेवून हा नाट्यउत्सव सुरू करण्यात आला आहे.

या नाट्यउत्सवात १६० हुन अधिक दर्जेदार नाटके रसिकांना पाहता आली आहेत. यामध्ये प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील दिग्गज मराठी रंगकर्मीनी हजेरी लावली आहे. नसिरुद्दीन शाह, हबीब तन्वीर, अमोल पालेकर आदी नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली. पगला घोडा, महानिर्वाण, घाशीराम कोतवाल, आईन्स्टाईन, कोपनहेगन अशी रंगभूमीवरील इतिहासात अजरामर झालेली नाटके सादर झाली आहेत.या महोत्सवाच्या २८ व्या वर्षी मालवणीची सांस्कृतिक पताका साता समुद्रापार नेणारे ज्येष्ठ अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांचे नाव या महोत्सवाला द्यायचे निश्चित केले आहे. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी प्रतिष्ठानवर विश्वासाने टाकली होती. या नाट्यउत्सवाबरोबर मच्छिंद्र कांबळी यांची स्मृती चिरंतन जपली जाईल. असा आम्हाला दृढ विश्वास आहे.यावर्षीचा महोत्सव ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांना समर्पित करण्यात आला आहे. या महोत्सवात अमोल पालेकर यांचे दिग्दर्शकीय व अभिनय कौशल्य ' कुसुर' या एकपात्री नाटकात पहावयास मिळणार आहे. याशिवाय ' गुमनाम है कोई' हे व्यावसाईक रंगभूमीवर गाजत असलेले नाटक सादर होणार आहे.

कोकणचे सुपुत्र मामा वरेकर यांनी लिहिलेले ' भूमिकन्या सीता' हे नाटक, 'घटोत्कच',हंडाभर चांदण्या ', रामदास भटकळ लिखित ' जगदंबा' अशी नाटके पहाण्याचा दुर्मिळ योग या महोत्सवामुळे रसिकांना मिळणार आहे. 'जगदंबा' मध्ये भटकळ यांनी महात्मा गांधी विषयी स्वतःचे आकलन मांडले असल्याने, गांधीजींच्या दिडशेव्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून हे नाटक या महोत्सवात समाविष्ट केले आहे. त्याशिवाय राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचे एक रौप्य पदक आणि एक पारितोषिक असे दुहेरी यश मिळविणारे आचरेकर प्रतिष्ठानचे ' चाहूल' हे नाटक देखील सादर करण्यात येणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.नाट्य रसिकांना सुवर्ण संधी !या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्गातील नाट्य रसिकांना सात विविध नाटके बघण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही वामन पंडित यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Natakनाटकsindhudurgसिंधुदुर्ग