शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

धनशक्तीसाठी जठारांची तडजोड --: संजय पडतेंचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:08 IST

राऊत यांना कणकवली मतदारसंघातून ५४ हजार मते मिळाली होती तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६ हजार मते मिळाली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून खासदार राऊत यांना १ लाख ७८ हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. याचे चिंतन अगोदर करावे, असा सल्ला पडते यांनी जठार यांना दिला.

ठळक मुद्देराऊत यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही

कुडाळ : लोकसभा निवडणुकीत महायुती असताना देखील धनशक्तीकरिता भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाबरोबर एका हॉटेलमध्ये तडजोड केली असून याचे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध झाले आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांनी पत्रकार परिषदेत केला. खासदार विनायक राऊत यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार जठार यांना नसल्याचा टोलाही त्यांनी जठार यांना लगावला.

कुडाळ शिवसेना शाखा येथे संजय पडते यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब, जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर, अनुप्रीती खोचरे, राजू गवंडे, सतीश कुडाळकर उपस्थित होते.

संजय पडते म्हणाले, खासदार राऊत यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे सांगण्याचा व राजीनामा मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार प्रमोद जठार यांना नाही. कारण लोकसभा निवडणुकीत खासदार राऊत यांना कणकवली मतदारसंघातून ५४ हजार मते मिळाली होती तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६ हजार मते मिळाली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून खासदार राऊत यांना १ लाख ७८ हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. याचे चिंतन अगोदर करावे, असा सल्ला पडते यांनी जठार यांना दिला.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात धनशक्तीकरिता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाबरोबर जठार यांनी तडजोड केली होती. त्याचे पुरावे आता आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे शिवसेना व खासदार राऊत यांच्या विरोधात जठार यांनी बोलू नये व त्यांना बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना व राऊत यांच्या विरोधात जठार यांच्याकडून टीका अपेक्षित नाही, असा सल्लाही जठार यांना त्यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात शिवसेना व भाजप ही सरळ लढत जाहीर होती. असे असतानाही महायुतीत आहोत असे सांगणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मदत न करता कोणाला मदत केली हे सर्वांना माहीत आहे.

दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांविरोधात टीका करीत आहेत. मात्र, शिवसेनेने कधी पातळी सोडली नाही. युती करण्यासाठी कोण मातोश्रीवर गेले होते? मंत्रीपदांमध्ये सेनेला कोणी फसवले? मुख्यमंत्री अडीच वर्षाचा देण्याचे मान्य करून आता कोण नकार देत आहे? हे सर्व जगजाहीर आहे. त्यामुळे ह्यखोटे बोलावे पण रेटून बोलावेह्ण अशी स्थिती भाजपची असल्याचा टोला पडते यांनी लगावला.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे शिवसेनेचे बालेकिल्ले असून येणाºया सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर विजयी होईल, असा विश्वास पडते यांनी व्यक्त केला.जठारांनी महाविकास आघाडीची चिंता सोडावीशिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पैशाचे सरकार असून तीन वर्षे टिकू शकत नाही, असे बोलणाºया जठारांनी आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारबाबत काळजी करू नये. आमचे सरकार नक्कीच पाच वर्षे व्यवस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जठार राणेंची तळी उचलतातआमदार नीतेश राणे यांनी जठारांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. त्याच राणेंची तळी उचलण्याचे काम जठार करीत असल्याचा टोला पडते यांनी जठार यांना लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणPoliticsराजकारण