शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

जानवलीचा अपघात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे ! ; परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 14:45 IST

mumbaigoa highway, parsaramuparkar, sindhudurg, accident मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढलेली आहे. या सर्वच अपघातांची नोंद होत नसल्यामुळे या महामार्गावरील धोक्याची तीव्रता जाणवत नाही. जानवली येथे झालेला अपघात हा ठेकेदाराचे नियोजनशून्य तसेच निकृष्ट कामामुळे झालेला आहे. तर एकही अपघात झाला नाही असे म्हणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी या अपघाताला जबाबदार कोण ते आता सांगावे. उगाच ठेकेदाराला पाठीशी घालणे सोडावे . असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देजानवलीचा अपघात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे ! ; परशुराम उपरकर विनायक राऊत यांनी याला आता जबाबदार कोण ? ते सांगावे

कणकवली: मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढलेली आहे. या सर्वच अपघातांची नोंद होत नसल्यामुळे या महामार्गावरील धोक्याची तीव्रता जाणवत नाही. जानवली येथे झालेला अपघात हा ठेकेदाराचे नियोजनशून्य तसेच निकृष्ट कामामुळे झालेला आहे. तर एकही अपघात झाला नाही असे म्हणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी या अपघाताला जबाबदार कोण ते आता सांगावे. उगाच ठेकेदाराला पाठीशी घालणे सोडावे . असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, खासदार विनायक राऊत याना हा मार्ग लोकार्पण करण्याची घाई झाली आहे. मात्र या मार्गावर होणाऱ्या अपघातांकडे त्यांचे लक्ष नाही. आज जानवली येथे अपघात होऊन ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता कि दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने या मार्गावर अपघात होत असून, काही अपघातांची नोंद होते तर काहींची होत नाही.

कणकवलीतच या महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग पंचायत समितीजवळ शिवाजी पुतळ्याकडे कोसळला होता. त्या आधी कणकवली एस. एम. हायस्कुल समोर महामार्गाच्या भिंतीला तडे गेलेत. तर ६ ते ७ ठिकाणी भिंत कोसळली. यावेळी सत्ताधारी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी हि भिंत काढून टाकली जाणार असल्याचे सांगितले. अद्यापही याबाबतीत कोणतीही कारवाई झालेली नसताना खासदार राऊत याना लोकार्पणाची एवढी घाई का ? असा प्रश्नही परशुराम उपरकर यांनी विचारला आहे.अपघाताच्या बाबतीत सेफ्टी एजन्सी काहीच पाहत नाही. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात या मार्गावर वाहतूकच नव्हती. जी काही होती ती अत्यंत तुरळक होती. त्यामुळे अशावेळी अपघात होणार कसे. हे आधी खासदार विनायक राऊत यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतरच या मार्गावर अपघात झाले नाहीत किंवा होत नाहीत असे वक्तव्य करावे.

आम्ही या मार्गाच्या विविध प्रश्नांबाबत आधीच मुंबई उच्च न्यायालयात गेलो आहोत. आता या मार्गावर होणारे अपघात आणि मार्गाचे नियोजन शून्य काम. तसेच मार्गाचे काम अपूर्ण असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे लोकार्पण करण्याची झालेली घाई याबाबीही आम्ही आता न्यायालयाच्या लक्षात आणून देणार आहोत असेही परशुराम उपरकर यांनी

टॅग्स :AccidentअपघातParshuram Upkarपरशुराम उपरकर Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग