शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

जानवलीचा अपघात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे ! ; परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 14:45 IST

mumbaigoa highway, parsaramuparkar, sindhudurg, accident मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढलेली आहे. या सर्वच अपघातांची नोंद होत नसल्यामुळे या महामार्गावरील धोक्याची तीव्रता जाणवत नाही. जानवली येथे झालेला अपघात हा ठेकेदाराचे नियोजनशून्य तसेच निकृष्ट कामामुळे झालेला आहे. तर एकही अपघात झाला नाही असे म्हणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी या अपघाताला जबाबदार कोण ते आता सांगावे. उगाच ठेकेदाराला पाठीशी घालणे सोडावे . असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देजानवलीचा अपघात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे ! ; परशुराम उपरकर विनायक राऊत यांनी याला आता जबाबदार कोण ? ते सांगावे

कणकवली: मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढलेली आहे. या सर्वच अपघातांची नोंद होत नसल्यामुळे या महामार्गावरील धोक्याची तीव्रता जाणवत नाही. जानवली येथे झालेला अपघात हा ठेकेदाराचे नियोजनशून्य तसेच निकृष्ट कामामुळे झालेला आहे. तर एकही अपघात झाला नाही असे म्हणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी या अपघाताला जबाबदार कोण ते आता सांगावे. उगाच ठेकेदाराला पाठीशी घालणे सोडावे . असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, खासदार विनायक राऊत याना हा मार्ग लोकार्पण करण्याची घाई झाली आहे. मात्र या मार्गावर होणाऱ्या अपघातांकडे त्यांचे लक्ष नाही. आज जानवली येथे अपघात होऊन ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता कि दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने या मार्गावर अपघात होत असून, काही अपघातांची नोंद होते तर काहींची होत नाही.

कणकवलीतच या महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग पंचायत समितीजवळ शिवाजी पुतळ्याकडे कोसळला होता. त्या आधी कणकवली एस. एम. हायस्कुल समोर महामार्गाच्या भिंतीला तडे गेलेत. तर ६ ते ७ ठिकाणी भिंत कोसळली. यावेळी सत्ताधारी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी हि भिंत काढून टाकली जाणार असल्याचे सांगितले. अद्यापही याबाबतीत कोणतीही कारवाई झालेली नसताना खासदार राऊत याना लोकार्पणाची एवढी घाई का ? असा प्रश्नही परशुराम उपरकर यांनी विचारला आहे.अपघाताच्या बाबतीत सेफ्टी एजन्सी काहीच पाहत नाही. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात या मार्गावर वाहतूकच नव्हती. जी काही होती ती अत्यंत तुरळक होती. त्यामुळे अशावेळी अपघात होणार कसे. हे आधी खासदार विनायक राऊत यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतरच या मार्गावर अपघात झाले नाहीत किंवा होत नाहीत असे वक्तव्य करावे.

आम्ही या मार्गाच्या विविध प्रश्नांबाबत आधीच मुंबई उच्च न्यायालयात गेलो आहोत. आता या मार्गावर होणारे अपघात आणि मार्गाचे नियोजन शून्य काम. तसेच मार्गाचे काम अपूर्ण असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे लोकार्पण करण्याची झालेली घाई याबाबीही आम्ही आता न्यायालयाच्या लक्षात आणून देणार आहोत असेही परशुराम उपरकर यांनी

टॅग्स :AccidentअपघातParshuram Upkarपरशुराम उपरकर Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग