शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

जानवलीचा अपघात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे ! ; परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 14:45 IST

mumbaigoa highway, parsaramuparkar, sindhudurg, accident मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढलेली आहे. या सर्वच अपघातांची नोंद होत नसल्यामुळे या महामार्गावरील धोक्याची तीव्रता जाणवत नाही. जानवली येथे झालेला अपघात हा ठेकेदाराचे नियोजनशून्य तसेच निकृष्ट कामामुळे झालेला आहे. तर एकही अपघात झाला नाही असे म्हणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी या अपघाताला जबाबदार कोण ते आता सांगावे. उगाच ठेकेदाराला पाठीशी घालणे सोडावे . असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देजानवलीचा अपघात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे ! ; परशुराम उपरकर विनायक राऊत यांनी याला आता जबाबदार कोण ? ते सांगावे

कणकवली: मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढलेली आहे. या सर्वच अपघातांची नोंद होत नसल्यामुळे या महामार्गावरील धोक्याची तीव्रता जाणवत नाही. जानवली येथे झालेला अपघात हा ठेकेदाराचे नियोजनशून्य तसेच निकृष्ट कामामुळे झालेला आहे. तर एकही अपघात झाला नाही असे म्हणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी या अपघाताला जबाबदार कोण ते आता सांगावे. उगाच ठेकेदाराला पाठीशी घालणे सोडावे . असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, खासदार विनायक राऊत याना हा मार्ग लोकार्पण करण्याची घाई झाली आहे. मात्र या मार्गावर होणाऱ्या अपघातांकडे त्यांचे लक्ष नाही. आज जानवली येथे अपघात होऊन ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता कि दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने या मार्गावर अपघात होत असून, काही अपघातांची नोंद होते तर काहींची होत नाही.

कणकवलीतच या महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग पंचायत समितीजवळ शिवाजी पुतळ्याकडे कोसळला होता. त्या आधी कणकवली एस. एम. हायस्कुल समोर महामार्गाच्या भिंतीला तडे गेलेत. तर ६ ते ७ ठिकाणी भिंत कोसळली. यावेळी सत्ताधारी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी हि भिंत काढून टाकली जाणार असल्याचे सांगितले. अद्यापही याबाबतीत कोणतीही कारवाई झालेली नसताना खासदार राऊत याना लोकार्पणाची एवढी घाई का ? असा प्रश्नही परशुराम उपरकर यांनी विचारला आहे.अपघाताच्या बाबतीत सेफ्टी एजन्सी काहीच पाहत नाही. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात या मार्गावर वाहतूकच नव्हती. जी काही होती ती अत्यंत तुरळक होती. त्यामुळे अशावेळी अपघात होणार कसे. हे आधी खासदार विनायक राऊत यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतरच या मार्गावर अपघात झाले नाहीत किंवा होत नाहीत असे वक्तव्य करावे.

आम्ही या मार्गाच्या विविध प्रश्नांबाबत आधीच मुंबई उच्च न्यायालयात गेलो आहोत. आता या मार्गावर होणारे अपघात आणि मार्गाचे नियोजन शून्य काम. तसेच मार्गाचे काम अपूर्ण असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे लोकार्पण करण्याची झालेली घाई याबाबीही आम्ही आता न्यायालयाच्या लक्षात आणून देणार आहोत असेही परशुराम उपरकर यांनी

टॅग्स :AccidentअपघातParshuram Upkarपरशुराम उपरकर Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग