शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

जालना लाठीचार्ज प्रकरण: मराठा समाजाला बदनाम करण्याचा कट, नितेश राणेंनी केला गंभीर आरोप

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 2, 2023 13:41 IST

दगड मारणारे कोण?

कणकवली : मराठा समाज आंदोलनावर झालेल्या लाठी चार्ज चे समर्थन केले जाणार नाही. कोणी अधिकाऱ्याने  मस्ती केली आले तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार सोडणार नाही. जालना येथील शिवबा संघटनेचे पाटील हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर जेव्हा चुकीच्या पद्धतीने केसेस दाखल केल्या होत्या तेव्हा माजी खासदार निलेश राणे यांनी सहकार्य करून वाचवले होते. पाटील यांचे शांत पद्धतीने आंदोलन चालू होते प्रशासन आणि अधिकारी यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र तेव्हा दगड कोणी मारले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे खास कार्यकर्ते रघुनाथ शिंदे यांचा सहभाग, दगडफेक आणि एसटी बस जाळपोळ प्रकरणी दिसून आला आहे. याचा अर्थ दंगल घडणार अशी आधी भाकिते करायची आणि नंतर त्यांच्याच लोकांनी जाळपोळ करायची. हा एक प्रकारचा नियोजित कट आहे. मराठा बांधवांनी या चुकीच्या लोकांच्या आवाहनाला बळी पडू नये, कायदा हातात घेऊ नये. केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार आहे. कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही असा विश्वास भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.दगड मारणारे कोण?कणकवली ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी त्यांच्या आंदोलनात घुसून दगडफेक केली गेल्याचा आरोप केला. ते म्हणले मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले कोणाला त्रास दिला नाही. मग पोलिसांवर दगड मराठा समाज बांधव मारणार नाही. आमचा समाज शांत आणि संयमी आहे. त्याने मोर्चातून ते दाखवून दिले. तेव्हा दगड मारणार नाही. मात्र ते दगड मारणारे कोण होते हे शोधले जातील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री, गृहमंत्री ,उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे योग्य ती माहिती समोर येईल.मराठा समाजाला ठाकरे सेनेने बदनाम केलेमराठा समाजाला आता आणि तेव्हा सुद्धा ठाकरे सेनेने बदनाम केले. मराठा आरक्षणावर बाजू  कोर्टात मांडली नाही आणि या केसची वाट लावण्याचे काम उद्धव ठाकरे आणि आताच्या विरोधकांनी केले होते. अशा लोकांनी मराठा आरक्षणावर बोलूनच नये. संजय राऊत आणि त्याचे नेते काय म्हणून टीका करतात. राऊत ने मुका मोर्चाचे कार्टून पेपरमध्ये छापून मराठा आरक्षण मोर्चाची  बदनामी केली. तर विजय वड्डटीवार  हे मंत्री असताना मराठा आणि इतर समाज यांच्यात वाद करण्याचा प्रयत्न केला. दंगली पेटवल्या कोणी, कोणाला हव्या आहेत. दंगल दंगल कोण बोलत होता. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये गाड्या जाळल्या तो शिंदे हा दानवे यांचा कार्यकर्ता आहे.सरकार आपले, अन्याय होणार नाही आता सरकार तुमचेच आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहे. केद्रीय मंत्री नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत त्यामुळे हे सरकार आपले आहे अन्याय होणार नाही याची खात्री देतो. संभाजी महाराज यांनी दगड कोणी मारले याची चौकशी करावी. समाजाची बदनामी होते. शरद पवार यांनी सुद्धा भेटीत दगड मारणारे हात कोणाचे आहेत हे पाहावे असेही राणे म्हणाले. दरम्यान मी स्वतः जालना येथे जावून आंदोलनाला भेट देणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गjalna-acजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणNitesh Raneनीतेश राणे