शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

तुम्हांला सावंतवाडीत फिरणे मुश्किल होईल, अनारोजीन लोबोंचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 4:32 PM

नगराध्यक्ष संजू परब हे नागरिकांची दिशाभूल करण्यात पटाईत आहेत. ते आमच्या पालकमंत्र्यांवर डांबराची टीका करतात. पण ते निविदाने कामे घेतात. तुम्ही जशा मृत माणसाच्या जमिनी लाटता तशी ते कामे लाटत नाहीत. उद्या तुमची सगळी प्रकरणे बाहेर काढायची म्हटले तर तुम्हांला सावंतवाडीत फिरणे मुश्किल होईल, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांनी केली. तसेच गवळी तिठ्यावरच्या टपऱ्या काढण्यासाठी कोणी पत्र दिले? असे सांगत त्यांनी ते पत्र पत्रकारांना दाखविले.

ठळक मुद्देतुम्हांला सावंतवाडीत फिरणे मुश्किल होईल, अनारोजीन लोबोंचा इशारा संजू परब यांच्यावर कडाडून टीका

सावंतवाडी : नगराध्यक्ष संजू परब हे नागरिकांची दिशाभूल करण्यात पटाईत आहेत. ते आमच्या पालकमंत्र्यांवर डांबराची टीका करतात. पण ते निविदाने कामे घेतात. तुम्ही जशा मृत माणसाच्या जमिनी लाटता तशी ते कामे लाटत नाहीत. उद्या तुमची सगळी प्रकरणे बाहेर काढायची म्हटले तर तुम्हांला सावंतवाडीत फिरणे मुश्किल होईल, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांनी केली.नगराध्यक्ष संजू परब यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मंगळवारी येथील केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो, नगरसेविका भारती मोरे, दिपाली सावंत, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शुभांगी दळवी, अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते. 

लोबो यांनी मासिक बैठकीच्या अजेंड्यावरून परब यांच्यावर टीका केली. शासनाचा अध्यादेश आहे. बैठका आॅनलाईन पद्धतीने घ्या, असे असताना परब यांनी आॅफलाईन बैठक कशी काय घेतली. मुख्याधिकारी यांचीही चूक आहे. फक्त दिशाभूल करणारे कागद दाखवायचे एवढेच काम परब करीत आहेत. पण आता जनता हुशार आहे. जे नगरसेवक बैठकीला आले नाहीत त्यांना पक्ष व्हीप काढेल. त्यांनी त्यांची उत्तरे पक्षाकडे द्यावीत. त्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही लोबो यांनी यावेळी सांगितले.ते स्टॉल काढण्याचे पत्र कोणी दिले ?आमची पत्रे सगळ्यांना दाखवता पण आम्ही स्टॉल हटावाबाबत कुठलेही पत्र दिले नाही. उलट नवीन स्टॉल लावण्यात आले आहेत. त्याची कारणे शोधावी लागतील. ते स्टॉल काढा अशीच आमची भूमिका आहे, असे लोबो यांनी सांगितले. मात्र, आमची पत्रे पुढे करता मग गवळी तिठ्यावरचे स्टॉल काढण्यासाठीचे पत्र कोणी दिले याची माहिती सर्व जनतेला आहे. जे आपले अधिकार नाही ते अधिकार वापरायला बघता का? असा सवालही यावेळी लोबो यांनी केला. गवळी तिठ्यावरच्या टपऱ्या काढण्यासाठी कोणी पत्र दिले? असे सांगत त्यांनी ते पत्र पत्रकारांना दाखविले.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग